शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने परिसरातील सर्वात लहान मोठे जलस्रोत पाण्याने तुडुंब भरले होते. याचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी ...

यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने परिसरातील सर्वात लहान मोठे जलस्रोत पाण्याने तुडुंब भरले होते. याचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी फेऱ्यात दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांनी गहू, हरबरा, ज्वारी, मका, कांदा आदी पिकांची पेरणी केलेली आहे. पिकांना मुबलक पाणी असल्याने पिके चांगली आली होती. मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची मळणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पेरणी उशिराने केली अशा शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी आदी पिके आहेत. हवामान खात्याने मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार काही दिवसांपासून वातावरणदेखील बदल झाल्याने शेतकऱ्यांना धास्ती लागली होती. दरम्यान, शुक्रवारी अचानक झालेल्या वादळवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मासरूळ, डोमरूळ, धामणगाव, वरुड, सोयगाव, पांगरखेड, महाड, तराडखेड, गुम्मी या परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांनी शेतात जमा करून ठेवलेल्या हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवार व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे द्यावे व शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दिलीप नामदेव सिनकर यांनी केली आहे.

लवकरात लवकर झालेल्या नुकसानाचा प्राथमिक सर्व्हे करण्यात येईल. त्यानंतर शासनस्तरावर याचा प्रस्ताव दाखल करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देऊ.

डी. एम. मेरत, तालुका कृषी अधिकारी, बुलडाणा.