शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने परिसरातील सर्वात लहान मोठे जलस्रोत पाण्याने तुडुंब भरले होते. याचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी ...

यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने परिसरातील सर्वात लहान मोठे जलस्रोत पाण्याने तुडुंब भरले होते. याचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी फेऱ्यात दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांनी गहू, हरबरा, ज्वारी, मका, कांदा आदी पिकांची पेरणी केलेली आहे. पिकांना मुबलक पाणी असल्याने पिके चांगली आली होती. मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची मळणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पेरणी उशिराने केली अशा शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी आदी पिके आहेत. हवामान खात्याने मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार काही दिवसांपासून वातावरणदेखील बदल झाल्याने शेतकऱ्यांना धास्ती लागली होती. दरम्यान, शुक्रवारी अचानक झालेल्या वादळवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मासरूळ, डोमरूळ, धामणगाव, वरुड, सोयगाव, पांगरखेड, महाड, तराडखेड, गुम्मी या परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांनी शेतात जमा करून ठेवलेल्या हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवार व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे द्यावे व शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दिलीप नामदेव सिनकर यांनी केली आहे.

लवकरात लवकर झालेल्या नुकसानाचा प्राथमिक सर्व्हे करण्यात येईल. त्यानंतर शासनस्तरावर याचा प्रस्ताव दाखल करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देऊ.

डी. एम. मेरत, तालुका कृषी अधिकारी, बुलडाणा.