शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी संमेलन!

By admin | Updated: March 27, 2017 02:31 IST

बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनात श्रीपाद भालचंद्र जोशींनी मांडले परखड मत.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २६- केवळ साहित्य व साहित्यिकांचा उदोउदो करणे, कविता आणि गप्पांचे फड रचने, एवढीच जबाबदारी या संमेलनाची नाही. ग्रामीण भागात साहित्य संमेलन आयोजित करण्यामागील उद्देश व्यापक असून, आत्मविश्‍वास गमावलेल्या साहित्यिकांमध्ये आत्मसन्मान निर्माण करण्याचे कार्य संमेलनातून व्हायला हवे, असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शेलसूर यांच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूर आणि विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणाच्या संयुक्त विद्यमाने करवंड येथील स्व. माधवराव देशमुख माध्यमिक आश्रमशाळेत एक दिवसीय जिल्हा मराठी संमेलन २६ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध गजलकार डॉ. गणेश गायकवाड, चिखलीचे आ. राहुल बोंद्रे, स्वागताध्यक्ष तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष प्रा. सुनील देशमुख, महामंडळाचे अध्यक्ष चिंतामण देशपांडे, डॉ. विलास मानेकर, प्रदीप गोते, संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार, प्रा. डॉ. अनंत शिरसाट, प्रा. गोविंद गायकी, बारोमासकार सदानंद देशमुख, जि. प. सदस्य जयश्री शेळके, करवंडचे सरपंच जगन्नाथ देशमुख, संमेलनाचे कार्यवाह गणेश निकम यांच्यासह संमेलन आयोजन समितीचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, की कोणतेही भाषा शुद्ध-अशुद्ध नसते, तर प्रत्येक बोलीभाषा ही पवित्र असून, महाराष्ट्रातील बहुजन जे बोलीभाषा बोलतात तीच खरी मराठी भाषा आहे. परंतु बोलीला अद्याप भाषा म्हणून मान्यता मिळालेली नाही. मराठी भाषा जगवायची असेल, तर समाजाने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. शहरात बसून मराठीच्या नावाने गळा काढणारे दुटप्पी आहेत. भाषिक प्रदूषण शहरात असून, मराठी भाषा ग्रामीण भागातच जिवंत ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. अनंत शिरसाठ यांनी, तर संचालन चंद्रशेखर जोशी यांनी आणि स्वागत समारंभ व प्रकाशन सोहळ्याचे संचालन संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी केले. आभार पंजाबराव गायकवाड यांनी मानले. या मराठी संमेलनासाठी जिल्हाभरातून साहित्यिक, लेखक, कवी पंचक्रोशीतील गावकरी, पत्रकार तथा हजारो रसिकांची उपस्थिती होती.मराठी भाषेचे 'बजेट' चौकाचौकांत जाळायला हवे! मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारने १७ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. यातील सात-आठ कोटी राज्यात फिरण्यासाठीच खर्च होतात. उर्वरित रकमेत मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन कसे करणार? राज्य सरकार मराठी भाषेची थट्टा करत असल्याचा आरोप करत डॉ. जोशी यांनी केला असून, हे बजेट चौकाचौकांत जाळले पाहिजे अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. साहित्य संमेलन न म्हणता मराठी संमेलन म्हणा!आजची संमेलनं साहित्यकेंद्री झाली आहेत. या संमेलनातून भाषा, बोली, संस्कृती बाजूला पडते. त्यामुळे या संमेलनाचं समाजशीलतेशी, मराठी भाषेच्या संस्कृतीशी नातं तुटलं आहे. परिणामी लोक संमेलनांकडे पाठ फिरवतात. त्यामुळे संमेलने व्यापक करण्यासाठी करवंड येथील संमेलनाला साहित्य संमेलन न म्हणता जिल्हा मराठी संमेलन म्हटले असल्याचा खुलासाही जोशी यांनी केला. मराठी भाषेपुढे सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी भाषक अस्मितेचा उद्रेक दाखवल्याशिवाय मराठीच्या संवर्धनासाठी पावले उचलली जाणार नाहीत, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.