शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

२५८ जोडप्यांचे अनुदान रखडले

By admin | Updated: July 5, 2014 23:47 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या शुभमंगल सामुहिक विवाह योजनेला निधीच प्राप्त न झाल्यामुळे २५८ प्रस्ताव तसेच पडून आहेत.

बुलडाणा : शेतकरी व शेतमजूरांसह आर्थिक परिस्थिती कमकूवत असलेल्या कुटुंबावर मुलीच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शुभमंगल सामुहिक विवाह योजनेचा अशा परिवारांना मोठय़ा प्रमाणात लाभ मिळत असला तरी, मागील दोन वषार्ंपासून या योजनेला निधीच प्राप्त न झाल्यामुळे २५८ प्रस्ताव तसेच पडून आहेत.जिल्हा महिला व बाल विकास विभागाला २0१३-१४ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जांपैकी अर्धे अर्ज अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मागील वर्षी ११५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ५७ अर्ज अद्याप पडून असल्याने, ५७ वधू पिता या योजनेंतर्गत मिळणार्‍या १0 हजार रूपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत.गरीब शेतकरी व शेतमजूर किंवा आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मास येणे म्हणजे त्या आई-वडिलावर बोजा समजल्या जातो. अनेक आई वडिल तर मुलीच्या जन्मास शाप समजतात. अशा आईवडिलांना कर्जबाजारी होऊनच मुलीचे हात पिवळे करावे लागतात. ते कर्ज फेडण्यातच मग त्यांचे आयुष्य सरते.या पार्श्‍वभूमीवर, मुलीचा जन्म हा शाप नसून, मुलगीसुद्धा एक वरदानच असल्याचे दाखवून देण्यासाठी व मुलीच्या लग्नासाठी वडिलांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने २00८ मध्ये शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू केली. पुढे २0११ मध्ये योजनेत काही सुधारणा करून सुधारीत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी प्राप्त झालेले प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, मागणीनुसार त्याच वर्षी अनुदानाचे वाटप व्हायला हवे; मात्र मागील चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात या योजनेसाठी केवळ एकदाच निधी प्राप्त झाल्याचे समजते. सन २0१३-१४ मध्ये ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. ती रक्कम २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षातील प्रलंबीत असलेल्या प्रस्तावांसाठी खर्ची पडली. आता २0१३-१४ या वर्षात प्राप्त झालेले २१५ आणि चालू वर्षातील ४३, असे एकूण २५८ प्रस्ताव मंजुर होऊन पडून आहेत. यासंदर्भात संबंधीत विभागाने प्रारंभी राज्य शासनाकडे ४३ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली असून, पुन्हा पुरवणी मागणीही सादर केली आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची तरतुद झालेली नाही. याची संबंधितांनी दखल घेवून निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.