शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

पूर्व विदर्भातील जुने मालगुजारी तलावांना पुन्हा 'जुने दिवस' येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 11:42 IST

या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले.

ठळक मुद्देदेखभालीसाठी छदामही नाहीअतिक्रमणाचा फास कायम

इंद्रपाल कटकवार

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून देणारे जुने मालगुजारी तलाव भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. गत तीन वर्षांपासून या तलावांच्या देखभालीसाठी शासनाने छदामही दिला नसल्याने हे गोंडकालीन तलाव निरुपयोगी झाले आहेत.

भंडारा व गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. दोन्ही जिल्हे वेगळे झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील तलावांची संख्याही कमी झाली. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात ११५४ मामा तलाव आहेत. पाऊस भरपूर बरसत असला तरी मामा तलावात पाणी साठविण्याच्या योजना कार्यान्वित नाहीत. या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले.

जिल्ह्यातील साकोली, लाखनी व तुमसर तालुक्यात सर्वाधिक तलाव आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हे मिळून तब्बल दोन हजार ६०० पेक्षा जास्त मामा तलाव होते. पूर्वी अशा तलावांची मालकी परिसरातील मालगुजारांकडे होती. मात्र, १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार मामातलाव शासनाकडे हस्तांतरित झाले. यामुळे सामान्य जनता व शेतकऱ्यांची तलावाशी जुळलेली नाळ तुटत गेली.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर शासनाने १९६३ मध्ये मामा तलावांच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरुस्ती व पाणी वाटपावर पाणी कर आकार ठरविण्यात आले. त्यावेळी जनतेने विरोध केला होता. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत मालगुजारी तलाव फक्त रोहयोच्या कामापुरतेच उरले आहेत. पावसाळ्यात भरलेले तलाव अवघ्या दोन ते तीन महिन्यातच रिकामे होतात. जनावरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही.

तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे दुर्लक्ष

गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे संपूर्णतः दुर्लक्ष केले आहे. एक रुपयाचा निधीही तलावांच्या देखभालीसाठी मिळालेला नाही. तसेच गाव तलावांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. मालगुजारी तलावांना अतिक्रमणाच्या कचाट्यातून बाहेर काढण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

यावर्षी ३ कोटींचे नियोजन

जिल्ह्यातील जुन्या मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत तीन कोटी दहा लक्ष रुपयांचे नियोजन असलेला प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शंभर कोटींवर निधीची गरज असताना या तुटपुंज्या निधीत काय भागणार? हाही एक ज्वलंत प्रश्न आहे.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती