शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

पूर्व विदर्भातील जुने मालगुजारी तलावांना पुन्हा 'जुने दिवस' येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 11:42 IST

या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले.

ठळक मुद्देदेखभालीसाठी छदामही नाहीअतिक्रमणाचा फास कायम

इंद्रपाल कटकवार

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून देणारे जुने मालगुजारी तलाव भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. गत तीन वर्षांपासून या तलावांच्या देखभालीसाठी शासनाने छदामही दिला नसल्याने हे गोंडकालीन तलाव निरुपयोगी झाले आहेत.

भंडारा व गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. दोन्ही जिल्हे वेगळे झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील तलावांची संख्याही कमी झाली. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात ११५४ मामा तलाव आहेत. पाऊस भरपूर बरसत असला तरी मामा तलावात पाणी साठविण्याच्या योजना कार्यान्वित नाहीत. या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले.

जिल्ह्यातील साकोली, लाखनी व तुमसर तालुक्यात सर्वाधिक तलाव आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हे मिळून तब्बल दोन हजार ६०० पेक्षा जास्त मामा तलाव होते. पूर्वी अशा तलावांची मालकी परिसरातील मालगुजारांकडे होती. मात्र, १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार मामातलाव शासनाकडे हस्तांतरित झाले. यामुळे सामान्य जनता व शेतकऱ्यांची तलावाशी जुळलेली नाळ तुटत गेली.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर शासनाने १९६३ मध्ये मामा तलावांच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरुस्ती व पाणी वाटपावर पाणी कर आकार ठरविण्यात आले. त्यावेळी जनतेने विरोध केला होता. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत मालगुजारी तलाव फक्त रोहयोच्या कामापुरतेच उरले आहेत. पावसाळ्यात भरलेले तलाव अवघ्या दोन ते तीन महिन्यातच रिकामे होतात. जनावरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही.

तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे दुर्लक्ष

गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे संपूर्णतः दुर्लक्ष केले आहे. एक रुपयाचा निधीही तलावांच्या देखभालीसाठी मिळालेला नाही. तसेच गाव तलावांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. मालगुजारी तलावांना अतिक्रमणाच्या कचाट्यातून बाहेर काढण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

यावर्षी ३ कोटींचे नियोजन

जिल्ह्यातील जुन्या मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत तीन कोटी दहा लक्ष रुपयांचे नियोजन असलेला प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शंभर कोटींवर निधीची गरज असताना या तुटपुंज्या निधीत काय भागणार? हाही एक ज्वलंत प्रश्न आहे.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती