शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पूर्व विदर्भातील जुने मालगुजारी तलावांना पुन्हा 'जुने दिवस' येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 11:42 IST

या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले.

ठळक मुद्देदेखभालीसाठी छदामही नाहीअतिक्रमणाचा फास कायम

इंद्रपाल कटकवार

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून देणारे जुने मालगुजारी तलाव भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. गत तीन वर्षांपासून या तलावांच्या देखभालीसाठी शासनाने छदामही दिला नसल्याने हे गोंडकालीन तलाव निरुपयोगी झाले आहेत.

भंडारा व गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. दोन्ही जिल्हे वेगळे झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील तलावांची संख्याही कमी झाली. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात ११५४ मामा तलाव आहेत. पाऊस भरपूर बरसत असला तरी मामा तलावात पाणी साठविण्याच्या योजना कार्यान्वित नाहीत. या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले.

जिल्ह्यातील साकोली, लाखनी व तुमसर तालुक्यात सर्वाधिक तलाव आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हे मिळून तब्बल दोन हजार ६०० पेक्षा जास्त मामा तलाव होते. पूर्वी अशा तलावांची मालकी परिसरातील मालगुजारांकडे होती. मात्र, १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार मामातलाव शासनाकडे हस्तांतरित झाले. यामुळे सामान्य जनता व शेतकऱ्यांची तलावाशी जुळलेली नाळ तुटत गेली.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर शासनाने १९६३ मध्ये मामा तलावांच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरुस्ती व पाणी वाटपावर पाणी कर आकार ठरविण्यात आले. त्यावेळी जनतेने विरोध केला होता. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत मालगुजारी तलाव फक्त रोहयोच्या कामापुरतेच उरले आहेत. पावसाळ्यात भरलेले तलाव अवघ्या दोन ते तीन महिन्यातच रिकामे होतात. जनावरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही.

तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे दुर्लक्ष

गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे संपूर्णतः दुर्लक्ष केले आहे. एक रुपयाचा निधीही तलावांच्या देखभालीसाठी मिळालेला नाही. तसेच गाव तलावांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. मालगुजारी तलावांना अतिक्रमणाच्या कचाट्यातून बाहेर काढण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

यावर्षी ३ कोटींचे नियोजन

जिल्ह्यातील जुन्या मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत तीन कोटी दहा लक्ष रुपयांचे नियोजन असलेला प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शंभर कोटींवर निधीची गरज असताना या तुटपुंज्या निधीत काय भागणार? हाही एक ज्वलंत प्रश्न आहे.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती