शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तेंदूपत्ता संकलकांना विमा केव्हा लागू होणार?

By admin | Updated: May 9, 2014 03:05 IST

ग्रामीण भागात तेंदू हंगाम सुरू होताच मजुरांना तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जीव मुठित धरून जावे लागते. काही ठिकाणी जंगलातील हिंस्त्र पशुंचा मजुरांवर हल्ला झाल्याने काहींना जीवसुद्धा गमवावा लागला आहे.

पहेला : ग्रामीण भागात तेंदू हंगाम सुरू होताच मजुरांना तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जीव मुठित धरून जावे लागते. काही ठिकाणी जंगलातील हिंस्त्र पशुंचा मजुरांवर हल्ला झाल्याने काहींना जीवसुद्धा गमवावा लागला आहे. या मजुरांना शासनाकडून अल्प प्रमाणात मोबदला मिळतो. त्यांचे कुटूंब उघड्यावर पडते. यासाठी या मजुरांना विमा लागू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे.साधारणत: वर्षातून वीस ते पंचेवीस दिवस तेंदुपत्ता संकलनाचा व्यवसाय ग्रामीण भागात चालत असतो. तेंदूपत्ता संकलनाच्या व्यवसायाने शासनाला दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा महसूल प्राप्त होतो. आता अवघ्या काही दिवसातच तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होणार आहे.परिसरात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गावोगावी केण फळी उघडण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना चांगला रोजगार मिळत असून नगदी कमाई होते. अल्प कालावधीच्या या कामाकरिता घरातील सर्वच सदस्य गुंतलेले असतात. रखरखत्या उन्हात जीवाची पर्वा न करता उन्हाचे चटके सहन करीत एकेक पानतोडून घरी आणतात व पानाचा पुडा बांधून फळीवर पोहचवली जातात. अनेकदा जीव मुठीत धरून सर्व कामे करावी लागतात. इतर कामाकडे मात्र दुर्लक्ष होते. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्याने पाने तोडणार्‍यांची संख्या सुद्धा वाढत आहे. तसेच पाने तोडण्यासाठी गेलेल्या नागरिकावर वन्यप्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मजुरांच्या जीवीताला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे तेंदूपत्ता मजुरांना विमा लागू करण्याची मागणी मजुरांकडून होत आहे. (वार्ताहर)