शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जुन्याच दागिन्यावर साजरे होतात लग्न सोहळे

By admin | Updated: March 15, 2016 00:50 IST

‘एक्साईज ड्युटी’ला घेऊन मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यवसायिकांच्या बेमुदत बंदमुळे वधू-वरांकडील मंडळीची गैरसोय होत आहे.

बंदचा फटका : वधू-वरांकडील मंडळींची गैरसोय, सराफा दुकाने १४ दिवसांपासून बंदचराहुल भुतांगे तुमसर‘एक्साईज ड्युटी’ला घेऊन मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यवसायिकांच्या बेमुदत बंदमुळे वधू-वरांकडील मंडळीची गैरसोय होत आहे. वेळेवर दागिने मिळू न शकल्याने अनेकांनी जुन्याच दागिन्यांवर लग्न सोहळे साजरे करण्यावर भर दिला आहे. लग्न ठरलेल्या वधू-वरांच्या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.केंद्रीय अर्थ संकल्पात सोन्यावर एक टक्का आबकारी कर लागू करण्यात आला आहे तसेच खरेदीदारांना पॅन कॉर्डची सक्ती करण्यात आल्याच्या विरोधात संपूर्ण भारतातील सराफा व्यवसायीकांनी १ मार्चपासून देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये तुमसर, मोहाडी सराफा संघही झाले आहेत. त्यामुळे झाडून सगळया सराफा दुकाने कुलूप बंद आहेत. थोडक्यात सराफा बाजारावर अवकळा पाहावयास मिळते आहे. तब्बल चौदा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. त्यात आतापर्यंत सराफा व्यवसायीकांनी विविध मार्गाने कधी बाजारात फळे विकून तरी कधी गरम समोसे व चहा विकून सरकारचा निषेध नोंदविला. सुरवातीला सराफा व्यवसायकांनी दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने अबकारी कर मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने बेमुदत बंद केव्हा संपणार हे सांगणे कठिण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका मात्र नववर वधूस बसत आहे.मे महिन्यात विवाह मुहर्त नसल्याने पालकांनी आपल्या उपवर मुलां-मुलींचे नियोजित विवाह मार्च व एप्रिल महिन्यातील मुहर्तावर ठरविलेले आहे. केंद्रीय अर्थ संकल्पात सोने विक्रीवर एक टक्का आबकारी कर लागू केल्याने सराफा व्यवसायीक बेमुदत बंद करतील याची पुसटशीही कल्पना नसल्याने उपवर वधूचे पालक निश्चित होते. मात्र एक मार्चपासून पुकारलेल्या संपामुळे या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहेत. लग्नात सुवर्ण अलंकाराचे कसे हाच प्रश्न आदी विचारात घेतला जात आहे. त्यावर तोडगा म्हणून सासुला आपले सुवर्ण अलंकार सुनेला द्यावे लागत असल्याने लग्न कार्यात पालकांची त्रेधात्रिपिठ उडालेली दिसत आहे. स्वर्ण अलंकाराविना लग्न कार्य कसे करावे, या विवंचनेत ते सापडले आहेत.बंदमुळे १०० कोटींचा फटकामागील १४ दिवसांपासून राज्यभरात व देशात सराफांचे बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यातल्या लहान मोठ्या ज्वेलर्सची संख्या विचारात घेता. दररोज किमान ७ ते ८ कोटी रूपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार या १४ दिवसात दोन्ही तालुक्यातही १०० कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा परिणाम ईतरही व्यवसायीकावर होत असल्याचे जाणवते.