शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

जुन्याच दागिन्यावर साजरे होतात लग्न सोहळे

By admin | Updated: March 15, 2016 00:50 IST

‘एक्साईज ड्युटी’ला घेऊन मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यवसायिकांच्या बेमुदत बंदमुळे वधू-वरांकडील मंडळीची गैरसोय होत आहे.

बंदचा फटका : वधू-वरांकडील मंडळींची गैरसोय, सराफा दुकाने १४ दिवसांपासून बंदचराहुल भुतांगे तुमसर‘एक्साईज ड्युटी’ला घेऊन मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यवसायिकांच्या बेमुदत बंदमुळे वधू-वरांकडील मंडळीची गैरसोय होत आहे. वेळेवर दागिने मिळू न शकल्याने अनेकांनी जुन्याच दागिन्यांवर लग्न सोहळे साजरे करण्यावर भर दिला आहे. लग्न ठरलेल्या वधू-वरांच्या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.केंद्रीय अर्थ संकल्पात सोन्यावर एक टक्का आबकारी कर लागू करण्यात आला आहे तसेच खरेदीदारांना पॅन कॉर्डची सक्ती करण्यात आल्याच्या विरोधात संपूर्ण भारतातील सराफा व्यवसायीकांनी १ मार्चपासून देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये तुमसर, मोहाडी सराफा संघही झाले आहेत. त्यामुळे झाडून सगळया सराफा दुकाने कुलूप बंद आहेत. थोडक्यात सराफा बाजारावर अवकळा पाहावयास मिळते आहे. तब्बल चौदा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. त्यात आतापर्यंत सराफा व्यवसायीकांनी विविध मार्गाने कधी बाजारात फळे विकून तरी कधी गरम समोसे व चहा विकून सरकारचा निषेध नोंदविला. सुरवातीला सराफा व्यवसायकांनी दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने अबकारी कर मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने बेमुदत बंद केव्हा संपणार हे सांगणे कठिण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका मात्र नववर वधूस बसत आहे.मे महिन्यात विवाह मुहर्त नसल्याने पालकांनी आपल्या उपवर मुलां-मुलींचे नियोजित विवाह मार्च व एप्रिल महिन्यातील मुहर्तावर ठरविलेले आहे. केंद्रीय अर्थ संकल्पात सोने विक्रीवर एक टक्का आबकारी कर लागू केल्याने सराफा व्यवसायीक बेमुदत बंद करतील याची पुसटशीही कल्पना नसल्याने उपवर वधूचे पालक निश्चित होते. मात्र एक मार्चपासून पुकारलेल्या संपामुळे या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहेत. लग्नात सुवर्ण अलंकाराचे कसे हाच प्रश्न आदी विचारात घेतला जात आहे. त्यावर तोडगा म्हणून सासुला आपले सुवर्ण अलंकार सुनेला द्यावे लागत असल्याने लग्न कार्यात पालकांची त्रेधात्रिपिठ उडालेली दिसत आहे. स्वर्ण अलंकाराविना लग्न कार्य कसे करावे, या विवंचनेत ते सापडले आहेत.बंदमुळे १०० कोटींचा फटकामागील १४ दिवसांपासून राज्यभरात व देशात सराफांचे बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यातल्या लहान मोठ्या ज्वेलर्सची संख्या विचारात घेता. दररोज किमान ७ ते ८ कोटी रूपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार या १४ दिवसात दोन्ही तालुक्यातही १०० कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा परिणाम ईतरही व्यवसायीकावर होत असल्याचे जाणवते.