शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आकाशाकडे नजरा अन् डोळ्यात पाणी

By admin | Updated: July 17, 2015 00:29 IST

पावसासाठी आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी बरसत आहे.

भंडारा : पावसासाठी आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी बरसत आहे. परंतु आकाशातून पावसाची एकही सर कोसळायला तयार नाही. मागील दोन आठवड्यापासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या पिकांची पेरणी झाली त्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. २२ जूनपासून पावसाने दीर्घ दडी मारली आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस न बरसल्यास दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात यावर्षी पीक लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९८ हजार ६३९ हेक्टर आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी समाधानकारक पाऊस झाल्याने केवळ ३२ हजार ५०३ हेक्टरवर खरिपाच्या पेरणी झाली असून रोवणी केवळ ७,१४२ हेक्टरवर झाली आहे. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने ९६ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण होऊ शकलेली नाही. आतापर्यंत १ जून ते १६ जुलैपर्यंत केवळ ३४६.२ मि.मी. पाऊस झाला आहे. या कालावधीत ४२३ मि.मी. पावसाची गरज आहे. हा पाऊस नियमित झाला तर पिकांना लाभदायी ठरतो. मात्र एकाचवेळी पाऊस येणे आणि १५ दिवस उन्ह तापणे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा मात्र जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. ११ ते १७ जूनपर्यंत जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. ज्यांनी पेरणी केली आहे त्यांचे पऱ्हे पाण्याअभावी सुकू लागले आहेत. काही भागात पेरणी केल्यापासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील तीन दिवसांपासून उन्ह तापत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गावागावांत पावसाचीच चर्चायंदा खरिपातील पेरण्या केल्यानंतर वरूणराजाने तब्बल चार आठवड्यापासून पावसाने लांब दडी मारल्यामुळे गावोगावी केवळ पाऊस कधी येणार याचाच अंदाज घेणाऱ्या गप्पागोष्टी रंगत आहेत. मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते पाणी देऊन पिके जगवित आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, अशा शेतातील पिके माना टाकू लागले आहेत. भर पावसाळ्यात उन्हाळ्याचे चटके पारा ३६.५ अंशावरभंडारा : भर पावसाळ्यात उन्हाळ्यातील उन्हाचे चटके भंडारावासियांना सोसावे लागत आहेत. गुरुवारला ३६.५ डिग्री तापमानाची नोंद झाली असून उन्हाच्या तडाख्याने निर्माण झालेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यंदा उन्हाळ्यातील तापमान ४६ अंशापर्यंत गेले होते. साधारणत: ३५ अंशापर्यंत तापमान पोहोचल्यास उन्हाच्या झळा जाणवायला लागतात. जीवाची लाही लाही होणे सुरु होते. उन्हाळ्यात दरवर्षीच असे वातावरण असते. त्यामुळेच लोकांना पावसाळ्याची प्रतीक्षा असते. परंतु यंदा भंडाराकर भर पावसाळ्यातही उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. सुरूवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावले होते. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरण पुरते पालटले आहे. आठवडाभरापासून ३४ ते ३७ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारला ३६.५ अंश तापमान नोंदविण्यात आले आहे. उकाड्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत.