शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रोला ७९ हजारांचा दंड

By admin | Updated: August 3, 2014 23:09 IST

पांढराबोडी येथील शामराव सार्वे यांनी वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रो प्रा.लि. च्या माध्यमातून कृषी केंद्रात आलेले धानाचे वाण शेतात पेरले. मात्र ते निकृष्ट असल्याने सार्वे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ग्राहक मंचचा निर्णय : निकृष्ट बियाणे पुरविल्याचा फटकाभंडारा : पांढराबोडी येथील शामराव सार्वे यांनी वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रो प्रा.लि. च्या माध्यमातून कृषी केंद्रात आलेले धानाचे वाण शेतात पेरले. मात्र ते निकृष्ट असल्याने सार्वे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दप्तरी अ‍ॅग्रोला नुकसान भरपाई पोटी ७९ हजार रुपये देण्याचा दंड ठोठावला आहे. शामराव सार्वे यांची रहणी येथे गट क्रमांक २७ (१), (२) येथे पाच एकर शेतजमीन आहे. या शेतीत त्यांनी पांढराबोडी येथील प्रकाश कृषी सेवा केंद्रातून दप्तरी श्री १००८ चे २०१२ मध्ये वाण घेतले व ते पाच एकर शेतामध्ये २४.६.२०१२ ला १०० किलो बियाण्यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर या बियाण्यांपासून कुठलेही रोप आले नाही. याची तक्रार सार्वे यांनी कृषी केंद्र धारकाला व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे केली. या तक्रारीवरून खंडविकास अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी अहवाल तयार केला. यात सार्वे यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले. या नुकसानीला वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दप्तरी अ‍ॅग्रो प्रा.लि. जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या नुकसानीचे कृषी अधिकारी माकोडे, बी.आर. कोकोडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी ए.डी. कस्तुरे आदींनी शामराव सार्वे यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचा अहवाल बनविला. याबाबत सार्वे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाद मागितली. मंचचे अतुल आळशी, गीता बडवाईक, हेमंतकुमार कटेरिया यांच्या गणपूर्तीत सर्व कागदपत्रे व नुकसानीच्या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला अहवाल व साक्षी पुरावे तपासण्यात आले. यात सेलूची दप्तरी अ‍ॅग्रो जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या नुकसानभरपाईपोटी दप्तरी अ‍ॅग्रोच्या व्यवस्थापकाने शामराव सार्वे यांना ६० हजार रुपये दर साल दर शेकडा ९ टक्के व्याजासह, १० हजार रुपये नुकसान भरपाई, पाच हजार रुपये तक्रारीचा खर्च व ४ हजार रुपये बियाण्याच्या खरेदीच्या बिलाचे असे एकूण ७९ हजार रुपये तीस दिवसाच्या आत देण्याचा आदेश देण्यात आला. तक्रार कर्त्याची बाजू अ‍ॅड.जयेश बोरकर यांनी मांडली. (शहर प्रतिनिधी)