शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांच्या गोळीबारात सहा तरूणांना वीरमरण

By admin | Updated: August 9, 2015 00:59 IST

१८९७ मध्ये ब्रिटिशांनी मध्यप्रांत व वऱ्हाडचा भाग म्हणून भंडारा जिल्हा निर्माण केला होता. मध्यप्रांताची राजधानी नागपूर होती.

१८९७ मध्ये ब्रिटिशांनी मध्यप्रांत व वऱ्हाडचा भाग म्हणून भंडारा जिल्हा निर्माण केला होता. मध्यप्रांताची राजधानी नागपूर होती. जबलपूर हे दुसरे केंद्र होते. १८९१ च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनापासून स्वातंत्र्याचे वारे भंडारा जिल्ह्यात पोहोचले. प्रथम भंडारा व तुमसरात सुशिक्षितांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पुढाकार घेतला होता. तिसरे केंद्र गोंदिया बनले होते. १९२० मध्ये नागपूर अधिवेशनाला तरुण उपस्थित राहिल्याने अनेकांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली.गोळीबारापूर्वीची घटनातुमसरला त्यावेळी दररोज प्रभातफेरी काढण्यात येत असे. रात्री गुप्त बैठका होत असत. १० आॅगस्ट १९४२ ला माकडे गुरुजी व भिवाजी लांजेवार यांना ताब्यात घेण्यात आले होते. १० आॅगस्टला रात्री बाबुजी लांजेवार यांच्या राईस मिलमध्ये गुप्त बैठकीला ८० सदस्य उपस्थित होते. ही बैठक रात्री दोनपर्यंत चालली. येथे ‘करेंगे या मरेंगे’ चा निर्धार करण्यात आला. ही माहिती पोलिसांना मिळताच सर्कल इन्स्पेक्टर गोपाल सिंह व तुमसरचे इन्स्पेक्टर रवानी, सहाय्यक दिलावर खान, महंमद शफी यांच्या मदतीला भंडाऱ्यावरुन कुमक मागविण्यात आली होती. त्यामुळे तुमसरचे वातावरण गंभीर झाले होते. भंडाराहून तुमसरला जादा पोलिस कुमक पोहोचू नये, यासाठी मोहाडी नाल्याजवळ रात्रभरात रस्त्यावर खड्डे खणण्यात आले, झाडे तोडून रस्त्यावर अडथळा निर्माण करण्यात आला होता. भंडाऱ्याचे स्पेशल मॅजिस्ट्रेट जयवंत हे अगोदरच तुमसरला पोहचले होते. त्यादिवशी एकीकडे पोलिसांचे भयभीत वातावरण होते. दुसरीकडे घराघरातून निघालेली माणसे जुन्या गंज बाजारातून पोलिस ठाण्याला आग लावण्यासाठी जाऊ लागले. सकाळी ११ वाजता संतप्त जमाव पोलिस ठाणे रिकामे करा, वंदेमातरम, भारत माता की जय अशी घोषणा देत होते. वातावरण प्रक्षुब्ध बनले होते. पहिल्यांदा पोलिसांनी लाठीमार केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून नागरिकांनी दगडफेड सुरू केली. दंगल सुरू झाली. जमाव पोलिस ठाण्याच्या दिशेने जात असताना पोलिसांच्या लाठीमारासोबत ठाणेदार रवानी यांच्या पत्नीने हातात बंदूक घेऊन जमावाला धमकावण्याचा प्रयत्न करीत गोळी चालविली. यात श्रीराम धुर्वे या किशोरवयीन मुलाच्या डोक्यात गोळी शिरली. तिथेच ते गतप्राण झाले. त्यानंतर जमाव भडकला. जनसागर भडकल्याने पोलिसांनी गोळीबार सुरू केला. पोलिस अंधाधुंद गोळीबार करीत आहेत म्हणून मॅजिस्ट्रेट जयवंत यांनी स्वत:च गोळीबार करण्यासाठी सुरुवात केली. ५ ते ६ मिनिटात संतप्त तथा रक्तरंजीत घटना तुमसरात घडली. शहीदांचे मृतदेह एकत्रित करण्याकरीता नागरिक गोळा झाले. सदाशिवराव किटे, नत्थु पहेलवान आदींनी हिंम्मत दाखवून पोलिसांविरुद्ध पुढाकार घेतला. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. हे पाहून दामले गुरुजींनी एसडीओ जयवंतला ठणकाविले. ‘काय केले जयवंतजी’ आपण इंग्रज सत्तेचे नोकर, परंतु देशभक्तांशी अमानुष व्यवहार केला? छाती पुढे करत गोळी चालवा, असे आव्हान दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शहीद श्रीराम धुर्वे यांची अंत्ययात्रा डोंगरला घाटावर नेण्यात आली. त्यावेळी हजारो महिलापुरुष अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी दामले गुरुजी, नारायण कारेमोरे, सदाशिव किटे, वासुदेव कोंडेवार, नारबाजी पाटील, वा.गो. कुळकर्णी आदींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भंडारा, जबलपूर येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. देव्हाडीही अग्रभागीतुमसर रोड येथे मुंबई-हावडा रेल्वेस्थानक होते. चले जाव चळवळीने हे गाव दणानून गेले होते. बाजार चौकातील सभेत रामचंद्र फाये व पन्नालाल यांची भाषणे जोशपूर्ण झाली. यात ब्रिटिशांनी रेल्वे स्थानक जाळण्याचा निर्धार केला. परंतु दोघांनाही पोलिसांनी पकडले. देव्हाडीतून आठ जणांना तुरुंगात जावे लागले होते.