शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

थकीत कृषी वीज बिलाच्या वसुलीकरिता शेतकऱ्यांना विविध सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

गत चार पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. अनाठाई वारेमाप वीज बिल पाठवत असल्याने बळीजाने ...

गत चार पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. अनाठाई वारेमाप वीज बिल पाठवत असल्याने बळीजाने बिल भरण्याचे टाळले. त्यामुळे थकीत वीज बिलाचे प्रमाण आपोआपच वाढत गेले. थकीत वीज बिलाची पालांदूर केंद्रांतर्गत थकीत शेतकरी १७११ ची रक्कम ६.३७ कोटी एवढी वाढलेली आहे. या रकमेची वसुली व्हावी याकरिता कृषी विभागाने वीज बिलात माहे सप्टेंबर २०२० च्या बिलातील ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ करण्याचे जाहीर केले आहे. तसेच माहे सप्टेंबर २०२० पर्यंतचा विलंब आकार पूर्णपणे अर्थात १०० टक्के माफ, माहे सप्टेंबर २०१५ पूर्वी पर्यंत थकीत बाकीवरील व्याज पूर्णपणे माफ, सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील व्याज १८ टक्के न आकारता वीज आयोगाने मान्यता दिलेल्या दराने आकारणीचे नियोजन; परंतु वीज बिलात सवलत मिळविण्याकरिता चालू वीज बिल भरणे बंधनकारक राहील. तसेच या योजनेंतर्गत रोहित्र अर्थात डीपी स्तरावर सर्व कृषी ग्राहकांनी १०० टक्के चालू वीज बिल व थकबाकी भरल्यास कृषी पंपाच्या चालू वीज बिलावर शेतकऱ्यांना १० टक्के सवलत देण्यात येईल, असे शेतकरी बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीला कार्यकारी अभियंता कुमार, अभियंता टेकाम, उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे, तंत्रज्ञ हिरामण बारई, उपसरपंच हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.

चौकट डब्बा

शेतकऱ्यांना मागणीनुसार तत्परतेने नवीन वीज कंनेक्शन पुरविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. ३० मीटरपर्यंतचे अंतरावर शेतकऱ्याला ३० दिवसांच्या आत सर्व्हिस केबलने कनेक्शन मिळेल. २०० मीटरपर्यंत त्यानंतर आला तीन महिन्यात एबी केबलद्वारे कनेक्शन देण्यात येईल. ६०० मीटरपर्यंतचे अंतराला प्रतीक्षा यादीप्रमाणे एचव्हीडीएसद्वारे कनेक्शन पुरविण्यात येईल. त्याचप्रमाणे ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर ऊर्जेवरील सेवा शेतकऱ्यांना पुरवित सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यात येईल.

उत्पन्न वाढीकरिता ग्रामपंचायतला संधी

महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याकरिता महावितरणच्या वीज बिल वसुलीचा आधार घेतले जाणार आहे. ग्रामपंचायतने शेतकऱ्याचे कृषी वीज बिल कार्यालयात जमा केल्यास प्रति बिलाला ५ रुपयांचा कमिशन ग्रामपंचायतला मिळेल. तसेच शेतकऱ्याकडून थकीत वीज बिलाची वसुली केल्यास थकीत वीज बिलाच्या २० टक्के रक्कम ग्रामपंचायतला मिळेल. यातून निश्चितच ग्रामपंचायतच्या उत्पन्नात भर पडून गाव विकासाकरिता नवी संधी शासनाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून राबविलेली आहे.