शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

डिजिटल साहित्याकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

'वाचाल तर वाचाल', असे म्हटले जाते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांसहीत युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे.

डिजिटलायझेशनचा प्रभाव : परीक्षांपुरतेच उरले पुस्तकांचे वाचन भंडारा : 'वाचाल तर वाचाल', असे म्हटले जाते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांसहीत युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातही पुस्तकांचे वाचन करीत असलेल्या युवकांची संख्याही नगन्य आहे. परिणामी वाचन संस्कृतीच संकटात सापडली असल्याचे बोलल्या जात आहे. केवळ सोशल मीडियावरील डिजिटल वाचनाकडेच युवकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर जुजबी पुस्तकी वाचन करण्याकडे कल वाढत आहे.देशातील महान कवी, संत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, लेखक आदीनी आपले विचार ग्रंथरुपाने आपल्याला दिले आहे. या पुस्तकांचे युवकांनी वाचन करणे अत्यावश्यक आहे. पूर्वी खेड्यापाड्यातही युवकांचे वाचनाचे प्रमाण हे मोठे होते. परंतु आता वाचनालयात युवा वाचकांची संख्या अत्यंत तोकडी असते. याउलट इंटरनेट कॅफेमध्ये तसेच मोबाइलवर सोशल मीडियावरच युवक मग्न असताना दिसतात. जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत गरजेचे आहे. जगण्याची उमेद निर्माण करणारे साहित्य वाचणे गरजेचे आहे. मात्र हल्ली युवकांना पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या मुले सर्वाधिक काळ दूरचित्रवाणी संचासमोर बसलेले आढळतात. आपला बराच वेळ चित्रपट, मालिका व इतर कार्यक्रम बघण्याकडे घालवितात. केवळ परीक्षा आली की अभ्यासापुरतेच वाचतात परिणामी विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच झाल्याचे निदर्शनास येते. तसेच डिजिटल साहित्याकडे ओढा वाढत आहे. साहित्याचे डिजिटलाझेशन होत असल्याने आॅनलाईन साहित्य वाचनाकडे जिल्ह्यातील युवकांचा कल वाढत आहे. ही बाब चांगली असली तरी नेटवरील साहित्य पुरेसे बरोबर आहे का? याची शहानिशा न करता ते वाचले जाते. त्यामुळे चुकीचे ज्ञानही मिळते. परीक्षा आली की नोट्सरुपी साहित्य वाचले जाते. त्यामुले विद्यार्थी सखोल ज्ञानापासून वंचित राहतात. या कारणाने ते केवळ परीक्षार्थी होत असल्याचे दिसते. यामुळे परीपूर्ण व्यक्तिमत्व विकास होताना अडथळे निर्माण होत असल्याचे जाणवते. (प्रतिनिधी)