शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

डिजिटल साहित्याकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

'वाचाल तर वाचाल', असे म्हटले जाते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांसहीत युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे.

डिजिटलायझेशनचा प्रभाव : परीक्षांपुरतेच उरले पुस्तकांचे वाचन भंडारा : 'वाचाल तर वाचाल', असे म्हटले जाते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांसहीत युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातही पुस्तकांचे वाचन करीत असलेल्या युवकांची संख्याही नगन्य आहे. परिणामी वाचन संस्कृतीच संकटात सापडली असल्याचे बोलल्या जात आहे. केवळ सोशल मीडियावरील डिजिटल वाचनाकडेच युवकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर जुजबी पुस्तकी वाचन करण्याकडे कल वाढत आहे.देशातील महान कवी, संत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, लेखक आदीनी आपले विचार ग्रंथरुपाने आपल्याला दिले आहे. या पुस्तकांचे युवकांनी वाचन करणे अत्यावश्यक आहे. पूर्वी खेड्यापाड्यातही युवकांचे वाचनाचे प्रमाण हे मोठे होते. परंतु आता वाचनालयात युवा वाचकांची संख्या अत्यंत तोकडी असते. याउलट इंटरनेट कॅफेमध्ये तसेच मोबाइलवर सोशल मीडियावरच युवक मग्न असताना दिसतात. जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत गरजेचे आहे. जगण्याची उमेद निर्माण करणारे साहित्य वाचणे गरजेचे आहे. मात्र हल्ली युवकांना पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या मुले सर्वाधिक काळ दूरचित्रवाणी संचासमोर बसलेले आढळतात. आपला बराच वेळ चित्रपट, मालिका व इतर कार्यक्रम बघण्याकडे घालवितात. केवळ परीक्षा आली की अभ्यासापुरतेच वाचतात परिणामी विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच झाल्याचे निदर्शनास येते. तसेच डिजिटल साहित्याकडे ओढा वाढत आहे. साहित्याचे डिजिटलाझेशन होत असल्याने आॅनलाईन साहित्य वाचनाकडे जिल्ह्यातील युवकांचा कल वाढत आहे. ही बाब चांगली असली तरी नेटवरील साहित्य पुरेसे बरोबर आहे का? याची शहानिशा न करता ते वाचले जाते. त्यामुळे चुकीचे ज्ञानही मिळते. परीक्षा आली की नोट्सरुपी साहित्य वाचले जाते. त्यामुले विद्यार्थी सखोल ज्ञानापासून वंचित राहतात. या कारणाने ते केवळ परीक्षार्थी होत असल्याचे दिसते. यामुळे परीपूर्ण व्यक्तिमत्व विकास होताना अडथळे निर्माण होत असल्याचे जाणवते. (प्रतिनिधी)