शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल साहित्याकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

'वाचाल तर वाचाल', असे म्हटले जाते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांसहीत युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे.

डिजिटलायझेशनचा प्रभाव : परीक्षांपुरतेच उरले पुस्तकांचे वाचन भंडारा : 'वाचाल तर वाचाल', असे म्हटले जाते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांसहीत युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातही पुस्तकांचे वाचन करीत असलेल्या युवकांची संख्याही नगन्य आहे. परिणामी वाचन संस्कृतीच संकटात सापडली असल्याचे बोलल्या जात आहे. केवळ सोशल मीडियावरील डिजिटल वाचनाकडेच युवकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर जुजबी पुस्तकी वाचन करण्याकडे कल वाढत आहे.देशातील महान कवी, संत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, लेखक आदीनी आपले विचार ग्रंथरुपाने आपल्याला दिले आहे. या पुस्तकांचे युवकांनी वाचन करणे अत्यावश्यक आहे. पूर्वी खेड्यापाड्यातही युवकांचे वाचनाचे प्रमाण हे मोठे होते. परंतु आता वाचनालयात युवा वाचकांची संख्या अत्यंत तोकडी असते. याउलट इंटरनेट कॅफेमध्ये तसेच मोबाइलवर सोशल मीडियावरच युवक मग्न असताना दिसतात. जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत गरजेचे आहे. जगण्याची उमेद निर्माण करणारे साहित्य वाचणे गरजेचे आहे. मात्र हल्ली युवकांना पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या मुले सर्वाधिक काळ दूरचित्रवाणी संचासमोर बसलेले आढळतात. आपला बराच वेळ चित्रपट, मालिका व इतर कार्यक्रम बघण्याकडे घालवितात. केवळ परीक्षा आली की अभ्यासापुरतेच वाचतात परिणामी विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच झाल्याचे निदर्शनास येते. तसेच डिजिटल साहित्याकडे ओढा वाढत आहे. साहित्याचे डिजिटलाझेशन होत असल्याने आॅनलाईन साहित्य वाचनाकडे जिल्ह्यातील युवकांचा कल वाढत आहे. ही बाब चांगली असली तरी नेटवरील साहित्य पुरेसे बरोबर आहे का? याची शहानिशा न करता ते वाचले जाते. त्यामुळे चुकीचे ज्ञानही मिळते. परीक्षा आली की नोट्सरुपी साहित्य वाचले जाते. त्यामुले विद्यार्थी सखोल ज्ञानापासून वंचित राहतात. या कारणाने ते केवळ परीक्षार्थी होत असल्याचे दिसते. यामुळे परीपूर्ण व्यक्तिमत्व विकास होताना अडथळे निर्माण होत असल्याचे जाणवते. (प्रतिनिधी)