शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभाच्या वेळीही दुकानांमध्ये गर्दी नाही

By admin | Updated: April 28, 2016 00:34 IST

सराफा व्यावसायिकांच्या बंदमुळे वर-वधू पालकांसाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या.

सराफा व्यवसायावर दुष्काळाचे सावट : वधूच्या पालकांची सावध भूमिकाभंडारा : सराफा व्यावसायिकांच्या बंदमुळे वर-वधू पालकांसाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात सराफा व्यवसाय सुरू झाल्याने सराफा दुकानांत गर्दी दिसू लागली आहे. मात्र लग्न सोहळ्याच्या दृष्टीने सराफा व्यवसायात पाहिजे त्या प्रमाणात तेजी नसून, दुष्काळाचे सावट सराफा व्यवसायावर पडले आहे. गत चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्येकच व्यवसायावर दुष्काळाचे सावट आहे. सराफा व्यावसायिकांनी गत दोन महिन्यात ३५ दिवसांचा संप पुकारला. त्यामुळे त्यांना व्यवसायात नुकसान सहन करावे लागले. सराफा व्यवसाय आता सुरळीत सुरू झाल्यानंतरही दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. सराफा व्यवसाय सुरू झाल्याने आता लग्न सोहळ्यांना झळाळी येणार आहे; मात्र पाहिजे तसा व्यवसाय होत नसल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. एक्साइज ड्युटी मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी देशभरात सराफा व्यावसायिकांनी आंदोलन छेडले. २ मार्च सुरू असलेले हे आंदोलन चक्क ११ एप्रिलपर्यंत सुरूच होते. ऐन लग्न सोहळयाच्या काळात सराफा व्यावसायिकांच्या या आंदोलनामुळे मात्र वर-वधू पालकांची चांगलीच फसगत झाली होती. आपल्या मुलामुलीला लग्नातील दागिने द्यायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता; मात्र ११ एप्रिल रोजी सराफा व्यावसायिकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले व सराफा बाजार पुन्हा सुरू झाला. येत्या अक्षय्यतृतीयेपर्यंत लग्नांचा मुहूर्त असल्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. त्यात सराफा व्यावसायिकांचा बंद तात्पुरता मागे घेण्यात आल्याने पालकांकडून आतापासूनच दागिने खरेदी केली जात असल्याचे दिसते. यामुळेच पालकांचे दागिन्यांना घेऊन असलेले टेंशन मिटले आहे. सराफा बाजार सुरू झाल्याने सराफा दुकानांत पुन्हा एकदा गर्दी दिसू लागली आहे. (नगर प्रतिनिधी)वधूच्या पालकांची सावध भूमिकालोकसभेच्या अधिवेशनात सरकार कोणता निर्णय घेतात? त्यानंतर सराफा व्यावसायिक पुन्हा संप करतात की निर्णय मान्य करतात, याकडे सध्या वधूच्या पालकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात सराफा व्यावसायिकांनी संप केला, तर आपल्याला लग्नात अडचण निर्माण होऊ नये, याकरिता पालकांनी सावध भूमिका घेत आतापासूनच सोने खरेदी करण्याला सुरुवात केली आहे.लक्ष आता शासनाच्या भूमिकेकडेसराफा व्यावसायिकांनी त्याचा संप मागे घेतला असला तरी शासन सराफा व्यावसायिकांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते, त्यावर आता पुन्हा बंद पुकारायचा की नाही, हे स्पष्ट होणार आहे. सातत्याने जिल्ह्यात पडत असलेला दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भंडारा जिल्ह्याची बाजारपेठ ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे; मात्र याच व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारपेठेत मरगळ पसरली आहे. ३५ दिवस सराफा बाजार बंद होता. त्यानंतर सुरू करण्यात आला तर त्यावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे. लग्नासाठी काही नागरिक खरेदी करीत असले तरी दरवर्षीच्या तुलनेत खरेदी कमी प्रमाणात होते आहे. - तुषार काळबांधे, सचिव, युवा सराफा असोसिएशन भंडारा