शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया

By admin | Updated: September 20, 2014 23:43 IST

सन २००४-०५ मध्ये प्रारंभ झालेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत आतापर्यंतच्या आठ वर्षात जिल्ह्यातील ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष

निधी झाला बंद : यावर्षी बसणार फटकाप्रशांत देसाई - भंडारासन २००४-०५ मध्ये प्रारंभ झालेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत आतापर्यंतच्या आठ वर्षात जिल्ह्यातील ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष या प्रवर्गातील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. शासनाच्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगलाच लाभ झाला. परंतु यावर्षीपासून अशा शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणारा निधी बंद करण्यात आल्यामुळे आता शस्त्रक्रिया कशा होतील, हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे. सन २००४-२००५ मध्ये सर्वशिक्षा अभियानाची सुरूवात झाली. या अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य व अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत दाखल करणे. त्यांच्यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे असा त्यामागील हेतू आहे. मागीलवर्षी सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावर्षी शासनाने हा निधी बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचा प्रकार शिक्षण विभागाला दिसून आला. यातील अनेक विद्यार्थी अपंग प्रवर्गात असल्याने पालकांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक योजना अंमलात आणल्या. त्या अनुषंगाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मदतनिस व दूर अंतरावरील शाळेत त्यांना पोहोचविण्यासाठी मदतनिस देऊन त्यांना ३०० महिन्याकाठी भत्ता देण्यात येत होता. शैक्षणिक सत्राच्या १० महिन्यासाठी हा मदतनिस भत्ता देण्यात येतो. यावर्षी सन २०१४-१५ साठी सर्वशिक्षा अभियानातंर्गत २०६ विद्यार्थ्यांसाठी २०६ मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली. हे मदतनिस अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून शाळेत आणतात. शाळा सुटल्यानंतर परत घरी पोहोचवितात. यासोबतच बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसाठी मदत व्हावी, बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या ६८ विद्यार्थ्यांसाठी मदतनिस नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनाही महिन्याकाठी ३०० रूपये प्रवासभत्ता देण्यात येतो. सर्वशिक्षा अभियानांतर्गत यावर्षी बुध्दीतपासणी करण्यात आली. यात २५० विद्यार्थी कमजोर असल्याचे निष्पन्न झाले.