कर्तव्यात कसूर : पावसाचे कारण केले पुढेतुमसर : काटेबाम्हणी शिवारात पाच शेतकऱ्यांनी बावनथडी प्रकल्पाचा लघु कालवा क्रमांक पाच फोडला होता. त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्य प्रकल्पातून पाणी देणे सोडणे तात्काळ बंद केल्याची माहिती आहे. येथे केवळ लघु कालवा फोडलेल्या कालव्यातून पाणी देणे बंद करण्याची गरज होती. दुपारनंतर पाऊस आल्यामुळे तसा निर्णय घेतल्याचे कळते, परंतु येथे मुख्य कारण दुसरेच असल्याची माहिती आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धान पऱ्हे वाळू लागले होते. पऱ्हे वाचविण्याकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. खापाजवळ तुमसर-रामटेक राज्य महामार्गाशेजारी काटेबाम्हणी शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे व इतर चार शेतकऱ्यांनी बावनथडी प्रकल्पाचा लघु कालवा क्रमांक पाच फोडून आपल्या शेतात ते पाणी वळते केले. याप्रकरणी उपविभागीय अभियंता निशिकांत पनके यांनी तुमसर पोलीस ठत्तण्यात त्यांच्या विरोधात दि.१२ जुलै रोजी तक्रार नोंदविली होती.दि.१४ जुलै रोजी वरिष्ठ प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकाळी सितेकसा येथील बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडणे बंद केले. यासंदर्भात उपविभागीय अभियंता निशिकांत पनके यांना विचारले असता मला माहिती नाही, असे सांगून पावसाला सुरूवात झाल्याने पाणी सोडणे बंद करण्यात आले असेल असे सांगितले. पाणी सोडणे व बंद करणे याचा निर्णय प्रकल्पाचे कायृकारी अभियंता घेतात, असे सांगितले. येथे जर तर चे उत्तर अभियंता पनके यांनी दिले. प्रकल्पातून पाणी सोडणे बंद केल्याने शेतकऱ्यांत तीव्र रोष असून दि.१४ जुलैचा पाऊस सर्वत्र नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.(तालुका प्रतिनिधी)
बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडणे बंद
By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST