शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

खंडित वीज पुरवठा समस्या कायमस्वरुपी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:39 IST

तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : पालांदूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी, ३३ केव्ही उपकेंद्रात नवीन वाहिणी जोडण्याची गरज
<p>लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो. येथील उपकेंद्राला सानगडी पालांदूर किंवा पोहारा-पालांदूर मार्गाने दुहेरी पुरवठा करण्यात यावे, उपकेंद्रासाठी नवीन वाहिणी टाकून पालांदूर क्षेत्रातील खंडीत विज पुरवठा समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यावी, अशी मागणी पालांदूरचे सरपंच जितेंद्र कुरेकर, उपसरपंच हेमराज कापसे पदाधिकाºयांनी गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांच्यासह वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पालांदूर येथील ३३ केव्ही उपकेद्राला स्थानिक व परिसरातील सरासरी ३,२०० कृषीपंप, ८ ते ९ हजार घरगुती, आयपी, दिवाबत्ती, नळयोजना तथा अन्य वीजजोडणी आहे. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत सरासरी ७०० पेक्षा अधिक कृषीपंप धारकांनी योजनेचा लाभ घेऊन अन्य कृषीपंपधारक व ग्रामपंचायत अंतर्गत आणि अन्य नळ योजनेतील वीज देयक भरण्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी आहे. घरगुती व उद्योगधंदे वीज ग्राहकांचे वीज देयके भरण्याची प्रक्रीया नियमित आहेत. मात्र येथील उपकेंद्राला मौजा आसगाव येथील १३२ केव्हीवरुन विजपुरवठा केला आहे. या सिंगल वाहिणी विजपुरवठा दरम्यान पालांदूर ते आसगाव हे अंतर २८ किमी एवढे आहे. वादळी पावसात, अवकाळी वादळात आणि अन्य समस्यांमुळे 'इन्सूलेटर' नादुरुस्त होऊन नेहमीच तांत्रिक बिघाड होत असतो. अशावेळी पालांदूर क्षेत्रातील ४० ते ४५ गावांचा विजपुरवठा खंडीत झाल्याने २५ ते ३० हजार लोकांना व विजग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून आर्थिक नुकसानीचा भुर्दंड सोसावा लागतो. रात्री-बेरात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रात्रभर नागरिकांना जागरण करावे लागते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असून ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. विविध समस्या लोकांना होऊ नये म्हणून येथील संबंधित कर्मचाºयांना आसगाववरुन येणाºया ३३ केव्ही वाहिणीला 'बे्रक डाऊन' शोधण्यासाठी तथा लाईन वरील पेट्रोलिंग करुन कारण सापडत नाही. त्यासाठी अनेकदा दोन ते तीन दिवसाचा अवधी लागतो. त्यामुळे गृह उद्योग, कृषीपंपधारक, शासकीय - निमशासकीय कार्यालय, बँका, शाळा- महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, मंडळ कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय यांचे दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण होत ओहत.बारव्हा, सानगडी, लाखनी पिंपळगाव, अड्याळ, कोंढा, शिवणी-मोगरा या गावात दुहेरी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र पालांदूर/चौ. येथील विद्युत केंद्राला अजूनपर्यत 'डबल सप्लाय'ची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या संपूर्ण बाबींचा अवलोकण करुन पालांदूर व परिसरातील जनतेच्या खंडीत वीजपुरवठा समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यावे, अशा मागणीचा ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी मासिक सभेत ठराव घेतला. पुढाकाराने मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ सुखदेव शेरकर यांचेसह, उर्जामंत्री तथा पालकमंत्री, खासदार मधूकर कुकडे आणि वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सरपंच जितेंद्र कुरेकर, दिलीप बडोले, सदस्य भरत घरडे, तुकडू खंडाईत, कोटीराम भूसारी, दिपक ठाकरे, लिपीक राधेश्याम पाथरे उपस्थित होते.