शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

सिंदपुरी तलाव दुरूस्तीचे काम रखडले

By admin | Updated: May 23, 2015 01:11 IST

सिंदपुरी येथील नादुरूस्त तलावाची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याची बोंब राजकीय पुढारी करीत असले तरी, प्रत्यक्षात यंदा तलावाचे बांधकाम पुर्णत्वास जाणार नाही.

रंजित चिंचखेडे सिहोरासिंदपुरी येथील नादुरूस्त तलावाची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याची बोंब राजकीय पुढारी करीत असले तरी, प्रत्यक्षात यंदा तलावाचे बांधकाम पुर्णत्वास जाणार नाही. यामुळे गावकरी आणि शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावा लागणार आहे. निधी अभावी हे संकट गावकऱ्यावंर कोसडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सिंदपुरी गाव शिवारात असणाऱ्या तलावाची पाड २३ जुलै २०१४ ला रात्री अचानक फुटली या तलावाचे पाणी थेट गावात शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. आपातग्रस्त सोय शाळा आणि समाज मंदिरात करण्यात आली. गावात ४८ तास पाणी अडल्याने हक्काचे घर कोसडताना गावकऱ्यांनी अनुभवले. तासाभरात गावात होत्याचे नव्हते झाले. मदतीसाठी गावकऱ्यांनी आक्रोश निर्माण केला. शासकीय मदतीने गावकऱ्यांना झिडकारले तर स्वयंसेवी संस्थांनी गावकऱ्यांना तारले. टिनाचे शेडमध्ये वास्तव्य मिळाले. परंतु शेतकऱ्यांची जनावरे सैरबैर झाली. गावात २११ घरे जीर्ण झाली. ३०० हून अधिक एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या पाण्याचा फटका गावातील रस्त्यांना बसला. तब्बल वर्ष भराचा कालावधी लोटत असताना मायबाप सरकारला गावकऱ्यांनी अनेक निवेदन दिली. परंतु गावकऱ्यांचे जीवन पुर्ववत करण्यास अपयश आले. तलाव दुरूस्तीच्या पुढाकारावरून दोन विभागात चांगलीच हमरी तुमरी झाली. जबाबदारी पासून पडवाट शोधण्यात हे दोन्ही विभाग गुंतले. राज्य आणि स्थानिक असे लघु पाठबंधारे विभागाचे स्वरूप निर्माण झाले. या वादाचा फटका तब्बल सहा महिने गावकऱ्यांना बसला. या कालावधीत साधी फाईल तयार करण्यात आली नाही. मदत वाटपात विलंब झाल्याने कुणाचे वेतन थकविल्या जात नाही. यामुळे विभागांनी टेंशन घेतले नाही. तलाव दुरूस्तीची फाईल तयार करण्यात आली. २ कोटी ४० लाख रूपये निधीचा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला लघु पाठबंधारे विभागाने मंजुरी दिली. ही फाईल मंत्रालयात पोहचली आणि तिथेच मुक्काम ठोकून बसली. निधीच उपलब्ध नसल्याची बोंब थेट गावात पोहोचली.दिल्ली, मुंबई दरबारात या फाईलवर अखेरचा हात फिरवला असल्याचे सांगण्यात येत आहे. कागदी घोडे नाचविल्याने तलावाची पाड दुरूस्त होणार नाही. यंत्रणा नियोजन बद्धरित्या तयार असताना निधीचा थांगपत्ता नाही. यंदा पावसाळा महिना भरात सुरू होणार आहे. तलावाची पाड आणि घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. ६ ते ८ महिने या कामांना आता गती मिळणार नाही. तलावाची पाड फुटली असल्याने पाणी थेट यंदा गावाततून वाहणार आहे. उभ्या जीर्ण घरांना पाणी स्पर्श करणार आहे. हे घरे पुन्हा गावकऱ्यांना अभिशाप ठरणार आहेत.३०० एकरहून अधिक शेती रोवणीला मुकणार आहे. ७० ते ८० शेतकरी व त्यांचे कुटूंब अडचणीत येणार असताना सुद्धा कुण्या लोकप्रतिनिधींना या गावकऱ्यांची दया मया येत नाही. शासन आणि प्रशासनाच्या संवेदा बोथट झाल्याने पुन्हा पावसाळ्यात गावकऱ्यांना पाण्याचा फटका सहन करावा लागणार आहे.