शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सिंदपुरी तलाव दुरूस्तीचे काम रखडले

By admin | Updated: May 23, 2015 01:11 IST

सिंदपुरी येथील नादुरूस्त तलावाची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याची बोंब राजकीय पुढारी करीत असले तरी, प्रत्यक्षात यंदा तलावाचे बांधकाम पुर्णत्वास जाणार नाही.

रंजित चिंचखेडे सिहोरासिंदपुरी येथील नादुरूस्त तलावाची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याची बोंब राजकीय पुढारी करीत असले तरी, प्रत्यक्षात यंदा तलावाचे बांधकाम पुर्णत्वास जाणार नाही. यामुळे गावकरी आणि शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावा लागणार आहे. निधी अभावी हे संकट गावकऱ्यावंर कोसडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सिंदपुरी गाव शिवारात असणाऱ्या तलावाची पाड २३ जुलै २०१४ ला रात्री अचानक फुटली या तलावाचे पाणी थेट गावात शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. आपातग्रस्त सोय शाळा आणि समाज मंदिरात करण्यात आली. गावात ४८ तास पाणी अडल्याने हक्काचे घर कोसडताना गावकऱ्यांनी अनुभवले. तासाभरात गावात होत्याचे नव्हते झाले. मदतीसाठी गावकऱ्यांनी आक्रोश निर्माण केला. शासकीय मदतीने गावकऱ्यांना झिडकारले तर स्वयंसेवी संस्थांनी गावकऱ्यांना तारले. टिनाचे शेडमध्ये वास्तव्य मिळाले. परंतु शेतकऱ्यांची जनावरे सैरबैर झाली. गावात २११ घरे जीर्ण झाली. ३०० हून अधिक एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या पाण्याचा फटका गावातील रस्त्यांना बसला. तब्बल वर्ष भराचा कालावधी लोटत असताना मायबाप सरकारला गावकऱ्यांनी अनेक निवेदन दिली. परंतु गावकऱ्यांचे जीवन पुर्ववत करण्यास अपयश आले. तलाव दुरूस्तीच्या पुढाकारावरून दोन विभागात चांगलीच हमरी तुमरी झाली. जबाबदारी पासून पडवाट शोधण्यात हे दोन्ही विभाग गुंतले. राज्य आणि स्थानिक असे लघु पाठबंधारे विभागाचे स्वरूप निर्माण झाले. या वादाचा फटका तब्बल सहा महिने गावकऱ्यांना बसला. या कालावधीत साधी फाईल तयार करण्यात आली नाही. मदत वाटपात विलंब झाल्याने कुणाचे वेतन थकविल्या जात नाही. यामुळे विभागांनी टेंशन घेतले नाही. तलाव दुरूस्तीची फाईल तयार करण्यात आली. २ कोटी ४० लाख रूपये निधीचा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला लघु पाठबंधारे विभागाने मंजुरी दिली. ही फाईल मंत्रालयात पोहचली आणि तिथेच मुक्काम ठोकून बसली. निधीच उपलब्ध नसल्याची बोंब थेट गावात पोहोचली.दिल्ली, मुंबई दरबारात या फाईलवर अखेरचा हात फिरवला असल्याचे सांगण्यात येत आहे. कागदी घोडे नाचविल्याने तलावाची पाड दुरूस्त होणार नाही. यंत्रणा नियोजन बद्धरित्या तयार असताना निधीचा थांगपत्ता नाही. यंदा पावसाळा महिना भरात सुरू होणार आहे. तलावाची पाड आणि घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. ६ ते ८ महिने या कामांना आता गती मिळणार नाही. तलावाची पाड फुटली असल्याने पाणी थेट यंदा गावाततून वाहणार आहे. उभ्या जीर्ण घरांना पाणी स्पर्श करणार आहे. हे घरे पुन्हा गावकऱ्यांना अभिशाप ठरणार आहेत.३०० एकरहून अधिक शेती रोवणीला मुकणार आहे. ७० ते ८० शेतकरी व त्यांचे कुटूंब अडचणीत येणार असताना सुद्धा कुण्या लोकप्रतिनिधींना या गावकऱ्यांची दया मया येत नाही. शासन आणि प्रशासनाच्या संवेदा बोथट झाल्याने पुन्हा पावसाळ्यात गावकऱ्यांना पाण्याचा फटका सहन करावा लागणार आहे.