शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बनावट स्वाक्षरीच्या आधारे शिष्यवृत्तीची उचल

By admin | Updated: July 23, 2014 23:28 IST

राज्य शासनाच्या माध्यमातून भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आम आदमी विमा योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. मात्र लता युवराज सुर्यवंशी या विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती

मासळ : मासळ: राज्य शासनाच्या माध्यमातून भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आम आदमी विमा योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. मात्र लता युवराज सुर्यवंशी या विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती बनावट स्वाक्षरीच्या आधारे उचल केल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली.भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पाल्यांचे शिक्षण योग्यप्रकारे व्हावे यासाठी शासनाने शिष्यवृत्ती योजना अमलात आणली आहे. यातीलच आम आदमी विमा योजनेअंतर्गत सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून प्राप्त होते.मासळ येथील सुबोध विद्यालयात सन २००८-२००९ मध्ये इयत्ता १० वीत शिक्षण घेणाऱ्या लता सुर्यवंशी या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी संगणकीकृत पद्धतीने अर्ज सादर केला होता. यानुसार एलआयसी कार्यालयाने तिला ६०० रुपयाची शिष्यवृत्ती मंजूर केली. मात्र याबाबत तहसील कार्यालय लाखांदूर येथे चौकशी केली असता तिची बनावट स्वाक्षरी करुन पैशाची उचल केल्याचे उघडकीस आले.यावरुन या शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती खऱ्या लाभार्थ्यांना मिळतेच याचा नेम नाही. त्यामुळे या योजनेतील शिष्यवृत्ती प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गात करण्यात येत आहे (वार्ताहर)