शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जाणवणार बियाणांचा तुटवडा

By admin | Updated: May 29, 2014 01:55 IST

येत्या खरीप हंगामासाठी २१ हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यात केवळ १0 हजार क्विंटल

भंडारा

: येत्या खरीप हंगामासाठी २१ हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यात केवळ १0 हजार क्विंटल बियाणांचा साठा असल्याने शेतकर्‍यांना बियाणांची तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. अतवृष्टीमुळे फटका बसलेल्यांना शेतकर्‍यांकडून बियाणांची मागणी वाढली असतानाही कृषी विभागाचे अधिकारी बिनधास्त आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

भंडारा

जिल्ह्यातील दोन लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाचे पीक घेतले जाते. यातील धान पिकाखालील क्षेत्र १ लाख ६५ ते ७५ हजार हेक्टर आहे. कृषी विभागाने २१ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली. मात्र महाबिजने १0 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केला आहे. अन्य कंपन्यांकडूनही बियाणांचा पुरवठा करण्यात येत असला तरी बियाणांची मागणी वाढली आहे. साठय़ाचे प्रमाण कमी असल्याने बियाणांचा तुटवडा सहन करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

महाबिजतर्फे

आर.आर.आर. आणि डी.आर.आर. हे वाण उपलब्ध करून दिले जात आहे. एम.पी.यु. १0१0 वाणांचे बियाणे, एमपीयु १00१, आरआय ६४, श्रीराम आदी वाणांचे बियाणे बाजारात आले आहेत. शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय असलेले जेजीएफ १७९८, सुधारित संबा मुसरी एमटीयू १0७५ आणि एचएमटी हे वाण अनुदानावर उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. महाबीजशिवाय यशोदा, महागुजरात आणि दप्तरी कंपन्यांचे बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध होत आहेत. खरीप हंगामासाठी सोयाबीनचे २१00 क्विंटल आणि तुरीचे ४२१ क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने संबंधित कंपन्यांकडे केली आहे. सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात मिळण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीसाठी महाबिजने ढेंचा व सोनबोरूचे बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे रासायनिक खताचा कमी वापर करणार्‍या शेतकर्‍यांना या बियाणांचा लाभ मिळविता येईल.

बियाणांचा

तुटवडा असल्याने शेतकरी खासगी दुकानातून तूर बियाणे खरेदी करीत आहेत. मागीलवर्षी खासगी कंपन्यांकडून शेतकर्‍यांची फसगत झाल्यामुळे शासनाकडून सवलतीच्या दरात मिळणार्‍या बियाणांवर शेतकर्‍यांची भिस्त होती. परंतु बियाणांचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकर्‍यांची भटकंती सुरु आहे. (नगर प्रतिनिधी)