शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सेवाभावी सरसावले, प्रशासन माघारले

By admin | Updated: August 6, 2014 23:40 IST

सिंदपुरी येथील माजी मालगुजारी तलाव फुटल्यानंतर शेकडो गावांना क्षति पोहोचली. अनेक कुटूंब बेघर झाले. या कुटुंबांसाठी सेवाभावी संस्था सरसावल्या असल्या तरी या बेघर कुटुंबांच्या

भंडारा : सिंदपुरी येथील माजी मालगुजारी तलाव फुटल्यानंतर शेकडो गावांना क्षति पोहोचली. अनेक कुटूंब बेघर झाले. या कुटुंबांसाठी सेवाभावी संस्था सरसावल्या असल्या तरी या बेघर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने अद्याप पुढाकार घेतलेला नाही. आम्हाला घरकुल मिळणार की नाही? हा आपादग्रस्तांचा प्रश्न संत्रस्त करणारा आहे. दरम्यान, मदतीत प्रशासन माघारल्यामुळे स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थंनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.सिंदपुरी या तीन हजार लोकवस्तीच्या गावापासून एक कि़मी. अंतरावर उत्तरेला मालगुजारी तलाव आहे. हा तलाव पहाटेच्या सुमारास तलाव ओव्हरफ्लो होऊन तलावाची पाळ गावाच्या दिशेकडून फुटली आणि पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने वाहू लागला, अतिवृष्टी व पहाटेची वेळ असल्याने ग्रामस्थ साखरझोपेत होते. पाण्याच्या लोंढा पश्चिमेकडील शेतातून आला. चांदपुरकडे जाणाऱ्या मार्गावर तीन फूट पाणी होते. काही ग्रामस्थ पहाटे उठल्यावर त्यांना अंगणात पाणीच पाणी दिसले. त्यानंतर आरडाओरड सुरु होताच संपूर्ण गाव जागे झाले. काय करावे, कुणालाही काहीच कळेना, गावातील मोतीलाल ठवकर यांनी सभापती कलाम शेख यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. त्यांनी गावातील काही लोकांना मदतीला घेऊन तलावाची विरुद्ध दिशेची पाळ फोडण्यासाठी सरसावले. तोपर्यंत सखल भागात पाणी साचले होते. सकाळी संपूर्ण गाव उपाशी होते. दुपारनंतर सेवाभावी संस्थांनी त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली. त्यानंतर समाजमंदीर व विष्णू मंदिरात, काहींनी कुंदन बोरकर यांच्या वाड्यात आश्रय घेतला.लहान मुलांचा टाहोया कुटूंबातील लहान मुले आपल्या आई वडिलांना भोजन द्या, भोजन असा टाहो फोडत होते. या संकटाच्यावेळी सेवाभावी संस्था पुढे आल्या. प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली होती. अन्न धान्याचे वाटप येथे झाले नाही. अधिकारी येथे भेट देण्याकरिता आले. सर्व्हेक्षण केले, लाभार्थ्यांची यादी तयार केली. काहींना खावटी म्हणून २,५०० ते ३००० हजाराचा धनादेश दिला. खरी मदत अन्नधान्याची होती. ती पुरविण्यात आली नाही. सभापती शेख यांनी मंदिरातील आश्रीत ग्रामस्थांना अन्नधान्याची व्यवस्था केली. त्यानंतर तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तांदळाची मदत केली. यावेळी तहसीलदार व तलाठी उपस्थित नव्हते. येथे दररोज तलाठ्याने प्रशासनाला माहिती देण्याची गरज आहे, परंतु दररोज तलाठी गावात येत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.दोन विभाग आमने सामनेतलाव नादुरूस्त असून तलावाची मालकी निश्चित कुणाची आहे, हे अधिकाऱ्यांनाच माहित नाही. जिल्हा परिषद व लघु पाटबंधारे स्थानिक स्तर या विभागातील अधिकाऱ्यांची गावातच ग्रामस्थांसमोर जुंपली होती. हा तलाव लघुपाटबंधारे विभाग स्थानिकस्तर या विभागाकडे वर्ग करण्यात आला. परंतु दुरूस्तीकरिता निधीचा नाही केवळ वर्ग करून फायदा काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.येथे चारही गेट नादुरूस्त असल्याची आहे. एकापाठोपाठ चार गेट फुटले असते तर मोठा अनर्थ घडला असता.