शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

साकोली तालुक्यात ५० टक्के पऱ्हे सुकले

By admin | Updated: July 5, 2014 00:15 IST

साकोली तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून तालुक्यातून चुलबंद नदी वाहते.

साकोली : साकोली तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून तालुक्यातून चुलबंद नदी वाहते. या नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तयार करण्यात आला असला तरी या प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे तालुक्यात ओलीताची सोय नाही व पावसाने पाठफिरविल्याने यंदा शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या साकोली तालुकत शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाले असून पाण्याअभावी ५० टक्के पऱ्हे वाळले सअून एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर उर्वरित संपूर्ण पऱ्हे वाळतील. शेतकरी पऱ्हे वाचविण्यासाठी जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत.साकोली तालुक्यात एकूण १९ हजार ७३७ हेक्टर शेतजमिन असून यात ओलीताखाली १२ हजार ४५१ हेक्टर तर कोरडवाहू क्षेत्रात ५ हजार ४८३ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. ३० जुनपर्यंत साकोली तालुक्यात १ हजार २३१ हेक्टर जमिनीत धानाची पेरणी, ४०५ हेक्टर जमिनीत आवत्या, ५३३ हेक्टर जमिनीत तुर, ११ हेक्टर जमिनीत तीन, ३५ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला तर ७८४ हेक्टर जमिनीत उस पिकाची लागवड करण्यात आली आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने कोरडा दुष्काळ पडण्याची चित्र स्पष्टपणे दिसू लागली आहेत. कृषीपंपावर आधारीत शेती सुद्धा कोरडीच आहे. चुलबंद नदीवर मागील पंधरा वीस वर्षापासून निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी यावर्षी काही प्रमाणात पाणी अडविण्यात आले होते. मात्र या प्रकल्पातील पाणीही आटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यातील भिमलकसा, घानोड प्रकल्प अपूर्ण आहेत जर हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाले असते तर तालुक्यातील शेतीला सिंचनाची सोय झाली असती, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. (तालुका प्रतिनिधी)