शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पर्यावरणाची पर्वा आहे कुणाला?

By admin | Updated: May 9, 2014 03:10 IST

पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करणे, सोबतच भौतिक सुविधांची निर्माण व्हाव्यात यासाठी ग्रामविकासाची दिशा ठरविणारी पर्यावरण संतुलीत ..

राजू बांते■ मोहाडीपर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करणे, सोबतच भौतिक सुविधांची निर्माण व्हाव्यात यासाठी ग्रामविकासाची दिशा ठरविणारी पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्रामयोजना सुरु करण्यात आली. परंतु ग्रामोत्थानाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासनाला अपयश आले आहे.पर्यावरण संतुलीत गावांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून बहुतांश ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी सचिवांना हाताशी धरून आर्थिक संतुलन साधले. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करूनच समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करणे या ग्रामयोजनेतून सहज शक्य होते. पर्यावरणाचा संतुलन राखून ग्रामस्थांचा जीवनमान सुधारण्यासाठी ग्रामपंचायतींना अपयश आले आहे.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना ग्रामपंचायत निवडीचे व अनुदान वाटपाचे निकष तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने पूर्ण केले नाही. शासनाच्या योजनेची अंमलबजावणी तेवढी केली. परंतु वास्तवात ज्या निकषानुसार ही योजना राबवायची होती. ती योजना केवळ कागदावर पुर्णत्वास आली.पहिल्यावर्षी ग्रामपंचायतीच्या हद्दीत किमान ५0 टक्के झाडे जगवायची होती. पुढील दोन वर्षात उर्वरीत ५0 टक्के आणखी झाडे लावून ती पुन्हा जगवायची होती.दोन वर्षात गावे निर्मल करणे बंधनकारक होते. सुधारित दराने पाणीपट्टी आकारुन ६0 टक्के थकबाकीसह कर वसुल करायचे होते. योजनेनुसार प्लॉस्टीक पिशव्यांवर बंदी आणायची होती.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रभावी अंमलबजावणी करायची होती. दुसर्‍या, तिसर्‍या वर्षी कुटुंबाइतकी ५0 टक्के झाडे लावणे, हागणदारीमुक्त ग्रामपंचायत व निर्मलग्राम पुरस्कारासाठी राज्य शासनाकडे शिफारस करायची. ९0 टक्के थकबाकीसह कर वसुली करणे, प्लॉस्टीक पिशव्यांवर बंदी, २५ टक्के कुटुंबाकडे बायोगॅस असणे, कचर्‍यापासून खत निर्मिती, सांडपाणी व्यवस्था आदी कामे केल्याचा ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेसाठी पात्र ठरवायच्या होत्या.तथापि, या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या गावात नावापुरती झाडे लावण्यात आली. बोटावर मोजण्याइतपत गावे सोडली तर अन्य गाव हागणदारीग्रस्त दिसून येते. याआधीही बरीच गावे निर्मलग्राम झाली. केंद्र शासनाच्या गावांना पुरस्कार प्राप्त झाला. परंतु एक वर्षानंतर ती गावे निर्मल असलेली शोधूनही सापडणार नाही, अशी स्थिती मोहाडी तालुक्यातील गावांची आहे.गावात बायोगॅस नाही. खत निर्मितीची व्यवस्था नाही. ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात नाही. ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहते. गावागावात प्लॉस्टीक पिशव्या जागोजागी दिसून येतात. हा सगळ्या बाबींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत आहे. शासनाची योजना राबवायची. पैसा जिरवायचा. जिरलेल्या पैशातून मुलभुत सुविधा प्राप्त झाल्या नाहीत तरी चालते परंतु निधीसाठी मागणी असते असे चित्र आहे.पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्रामयोजनेअंतर्गत मोहाडी पंचायत समितीने समृद्धीच्या दिशेने उपलब्धी करून दिली. वडगाव हागणदारीमुक्त केले. या गावावर नजर टाकली असता निधी लुटण्याचाच प्रकार समोर आला. ५४ गावात ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणार्‍या प्लॉस्टीक पिशव्यांवर बंदी आणण्यात आली. ७२ ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतच्या हद्दीत १ लक्ष ५४ हजार ३२६ झाडे लावण्याचा पराक्रम केला. लावलेल्या झाडांचे संवर्धन झाले काय? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. यापेक्षा लोकसंख्या इतकी झाडे ग्रामपंचायतने लावली की नाही, हे तपासण्याची वेळ आली आहे. वृक्ष संवर्धनात एकलारीसारख्या लहान गावाने आदर्श पुढे ठेवला आहे. केंद्रापुरतेच बीड (सीतेपार) ग्रामपंचायत खूप मागे पडले आहे.मोहाडी पंचायत समितीच्या अहवालानुसार ९0 टक्के थकबाकी पांजराबोरी, जांभोरा, टाकला, मोहगावदेवी, सालेबर्डी, कान्हळगाव, मुंढरी, पारडी, भोसा, ढिवरवाडा, केसलवाडा, पालोरा, बीड सितेपार या गावांना केली आहे.