शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

‘रेकाॅर्ड ब्रेक' येणार शालान्त परीक्षेचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

राजू बांते मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत ...

राजू बांते

मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत गुणवंत विद्यार्थी नाखुशीत आहेत.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आता शालान्त परीक्षेला निकाल तयार करण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली. नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान केले जात आहे. नववीमधील १०० पैकी प्राप्त गुणांचे ५० टक्के गुणांत रूपांतर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा या परीक्षांतील ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत.

शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मध्ये भंडारा जिल्ह्यात विशेषतः दहावी व बारावीच्या वर्गशाळा सुरू झाल्या होत्या. ऑफलाईन अध्यापनही सुरू झाले होते. अनेक शाळांनी सराव परीक्षा सुरू केल्या होत्या. या वेळी परीक्षा सुखरूप होतील असे वाटत असताना कोविड-१९ ने डोके वर काढले. त्यामुळे शाळा पूर्णतः बंद केल्या गेल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक शाळांनी दहावीचा निकाल तयार केला आहे; पण, सराव परीक्षेचे त्यावेळी मूल्यमापन झाले नाही. त्यामुळे निकाल तयार करण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे.

निकाल तयार करण्याची संधी शाळांना मिळाली तरी विद्यार्थ्यांच्या निकालाची गुणवत्ता घसरणार आहे; कारण नववीच्या परीक्षा विद्यार्थी व शिक्षकही गांभीर्याने घेत नाहीत. फक्त उत्तीर्ण होणे मुलांना महत्त्वाचे वाटते. नववीतील संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाहिजेत ही काळजी विषयशिक्षक घेतात. तसेच विद्यार्थ्यांना खूप गुणांनी उत्तीर्ण झालेच पाहिजे एवढे मनातसुद्धा येत नाही. आता नववीचे नव्याने पेपर घेऊन शिक्षकांना गुण वाढविता येणार नाही. मूल्यमापन पंजीत बदल करता येणार नाही; कारण, सरलसंगणक प्रणालीवर विद्यार्थ्यांचे नववीचे गुण भरले गेले आहेत. तसेच सराव परीक्षेचे ८० पैकी ३० गुणांत रूपांतर करण्यात येणार असल्याने तिथेही फारसे गुण विद्यार्थ्यांना पडणार नाहीत. जे काही गुण वाढविता येतील ते २० गुणांच्या तोंडी परीक्षेत. एवढेच शिक्षकांच्या हाती राहिले आहे. त्यामुळे शाळांना १०० टक्के निकाल लावण्याची संधी प्राप्त झाली. ३५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या मुलांना उत्तीर्ण होणे फार अवघड होणार नाही; पण, ९० टक्क्यांच्या वर येणारी मुले फार कमी दिसणार आहेत. यावेळी १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांची संख्या वाढणार आहे. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी शाळा स्तरावर शिक्षक वस्तुनिष्ठ मूल्यांकन करीत आहेत.

बॉक्स

अभिलेख तपासणी

शिक्षण मंडळाने दिलेली कार्यपद्धती व सूचनांचे उल्लंघन व अभिलेखात गैरप्रकार करणारे कारवाईस पात्र राहणार आहेत. त्यामुळे कारवाईचे कोलित अधिकाऱ्यांच्या हातात देण्याचे टाळले जात आहे. विशेषतः खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील व्यवस्थापन संचालक मंडळही कारवाईची संधी नेहमी शोधत असते. त्यामुळे कुणीही शिक्षक अडचणीत सापडू नये या मानसिकतेत आहेत.

बॉक्स

गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान

जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ते नववीत असताना दहावीच्या अभ्यासाची तयारी करतात. केवळ पास होण्यापुरती नववीची परीक्षा देतात. अशा बऱ्याच मुलांना नववीत गुण कमी पडले आहेत. त्या गुणवंत मुलांच्या गुणांची टक्केवारी कमी येण्याची खूप शक्यता आहे. दोन वर्षे कसून अभ्यास करणारी मुले नाराजीत आहेत. त्यांना निकाल मान्य नसेल तर तशी पुन्हा लेखी परीक्षा देण्याची तरतूद शिक्षण मंडळाने केली आहे. दहावीला फारसे महत्त्व दिले जात नसल्याने पुन्हा परीक्षा देण्याच्या मानसिकतेत सध्या तरी विद्यार्थी दिसून येत नाहीत.

खासगी, पुनर्परीक्षार्थी यांचे फावणार

जे विद्यार्थी यावेळी खासगी, पुनर्परीक्षार्थी व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसले आहेत त्यांना उत्तीर्ण होण्याची खूप मोठी संधी चालून आली आहे.

कोट

या वर्षी गुणवत्तेची कसोटी लागली नाही. निकालाची तेवढी उत्सुकता नाही. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी परीक्षा मंडळ पुन्हा देत आहे; पण आता पुन्हा परीक्षा देण्याची ती मानसिकता नाही.

छबिता भोयर

दहावीची विद्यार्थिनी मोहगाव देवी

कोट

कोविडच्या असामान्य परिस्थितीने निकाल शाळेवर सोपविला. निकाल विद्यार्थ्यांना खुश व नाखुश करून जाणार आहे. निकालाने वस्तुनिष्ठता, शाळांची प्रामाणिकपणाची कसोटी लावली आहे.

- सुनीता तोडकर

पुष्पलताबाई तोडकर विद्यालय, नरसिंहटोला