शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘रेकाॅर्ड ब्रेक' येणार शालान्त परीक्षेचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

राजू बांते मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत ...

राजू बांते

मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत गुणवंत विद्यार्थी नाखुशीत आहेत.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आता शालान्त परीक्षेला निकाल तयार करण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली. नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान केले जात आहे. नववीमधील १०० पैकी प्राप्त गुणांचे ५० टक्के गुणांत रूपांतर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा या परीक्षांतील ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत.

शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मध्ये भंडारा जिल्ह्यात विशेषतः दहावी व बारावीच्या वर्गशाळा सुरू झाल्या होत्या. ऑफलाईन अध्यापनही सुरू झाले होते. अनेक शाळांनी सराव परीक्षा सुरू केल्या होत्या. या वेळी परीक्षा सुखरूप होतील असे वाटत असताना कोविड-१९ ने डोके वर काढले. त्यामुळे शाळा पूर्णतः बंद केल्या गेल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक शाळांनी दहावीचा निकाल तयार केला आहे; पण, सराव परीक्षेचे त्यावेळी मूल्यमापन झाले नाही. त्यामुळे निकाल तयार करण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे.

निकाल तयार करण्याची संधी शाळांना मिळाली तरी विद्यार्थ्यांच्या निकालाची गुणवत्ता घसरणार आहे; कारण नववीच्या परीक्षा विद्यार्थी व शिक्षकही गांभीर्याने घेत नाहीत. फक्त उत्तीर्ण होणे मुलांना महत्त्वाचे वाटते. नववीतील संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाहिजेत ही काळजी विषयशिक्षक घेतात. तसेच विद्यार्थ्यांना खूप गुणांनी उत्तीर्ण झालेच पाहिजे एवढे मनातसुद्धा येत नाही. आता नववीचे नव्याने पेपर घेऊन शिक्षकांना गुण वाढविता येणार नाही. मूल्यमापन पंजीत बदल करता येणार नाही; कारण, सरलसंगणक प्रणालीवर विद्यार्थ्यांचे नववीचे गुण भरले गेले आहेत. तसेच सराव परीक्षेचे ८० पैकी ३० गुणांत रूपांतर करण्यात येणार असल्याने तिथेही फारसे गुण विद्यार्थ्यांना पडणार नाहीत. जे काही गुण वाढविता येतील ते २० गुणांच्या तोंडी परीक्षेत. एवढेच शिक्षकांच्या हाती राहिले आहे. त्यामुळे शाळांना १०० टक्के निकाल लावण्याची संधी प्राप्त झाली. ३५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या मुलांना उत्तीर्ण होणे फार अवघड होणार नाही; पण, ९० टक्क्यांच्या वर येणारी मुले फार कमी दिसणार आहेत. यावेळी १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांची संख्या वाढणार आहे. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी शाळा स्तरावर शिक्षक वस्तुनिष्ठ मूल्यांकन करीत आहेत.

बॉक्स

अभिलेख तपासणी

शिक्षण मंडळाने दिलेली कार्यपद्धती व सूचनांचे उल्लंघन व अभिलेखात गैरप्रकार करणारे कारवाईस पात्र राहणार आहेत. त्यामुळे कारवाईचे कोलित अधिकाऱ्यांच्या हातात देण्याचे टाळले जात आहे. विशेषतः खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील व्यवस्थापन संचालक मंडळही कारवाईची संधी नेहमी शोधत असते. त्यामुळे कुणीही शिक्षक अडचणीत सापडू नये या मानसिकतेत आहेत.

बॉक्स

गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान

जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ते नववीत असताना दहावीच्या अभ्यासाची तयारी करतात. केवळ पास होण्यापुरती नववीची परीक्षा देतात. अशा बऱ्याच मुलांना नववीत गुण कमी पडले आहेत. त्या गुणवंत मुलांच्या गुणांची टक्केवारी कमी येण्याची खूप शक्यता आहे. दोन वर्षे कसून अभ्यास करणारी मुले नाराजीत आहेत. त्यांना निकाल मान्य नसेल तर तशी पुन्हा लेखी परीक्षा देण्याची तरतूद शिक्षण मंडळाने केली आहे. दहावीला फारसे महत्त्व दिले जात नसल्याने पुन्हा परीक्षा देण्याच्या मानसिकतेत सध्या तरी विद्यार्थी दिसून येत नाहीत.

खासगी, पुनर्परीक्षार्थी यांचे फावणार

जे विद्यार्थी यावेळी खासगी, पुनर्परीक्षार्थी व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसले आहेत त्यांना उत्तीर्ण होण्याची खूप मोठी संधी चालून आली आहे.

कोट

या वर्षी गुणवत्तेची कसोटी लागली नाही. निकालाची तेवढी उत्सुकता नाही. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी परीक्षा मंडळ पुन्हा देत आहे; पण आता पुन्हा परीक्षा देण्याची ती मानसिकता नाही.

छबिता भोयर

दहावीची विद्यार्थिनी मोहगाव देवी

कोट

कोविडच्या असामान्य परिस्थितीने निकाल शाळेवर सोपविला. निकाल विद्यार्थ्यांना खुश व नाखुश करून जाणार आहे. निकालाने वस्तुनिष्ठता, शाळांची प्रामाणिकपणाची कसोटी लावली आहे.

- सुनीता तोडकर

पुष्पलताबाई तोडकर विद्यालय, नरसिंहटोला