शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

‘रेकाॅर्ड ब्रेक' येणार शालान्त परीक्षेचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

राजू बांते मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत ...

राजू बांते

मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत गुणवंत विद्यार्थी नाखुशीत आहेत.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आता शालान्त परीक्षेला निकाल तयार करण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली. नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान केले जात आहे. नववीमधील १०० पैकी प्राप्त गुणांचे ५० टक्के गुणांत रूपांतर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा या परीक्षांतील ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत.

शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मध्ये भंडारा जिल्ह्यात विशेषतः दहावी व बारावीच्या वर्गशाळा सुरू झाल्या होत्या. ऑफलाईन अध्यापनही सुरू झाले होते. अनेक शाळांनी सराव परीक्षा सुरू केल्या होत्या. या वेळी परीक्षा सुखरूप होतील असे वाटत असताना कोविड-१९ ने डोके वर काढले. त्यामुळे शाळा पूर्णतः बंद केल्या गेल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक शाळांनी दहावीचा निकाल तयार केला आहे; पण, सराव परीक्षेचे त्यावेळी मूल्यमापन झाले नाही. त्यामुळे निकाल तयार करण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे.

निकाल तयार करण्याची संधी शाळांना मिळाली तरी विद्यार्थ्यांच्या निकालाची गुणवत्ता घसरणार आहे; कारण नववीच्या परीक्षा विद्यार्थी व शिक्षकही गांभीर्याने घेत नाहीत. फक्त उत्तीर्ण होणे मुलांना महत्त्वाचे वाटते. नववीतील संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाहिजेत ही काळजी विषयशिक्षक घेतात. तसेच विद्यार्थ्यांना खूप गुणांनी उत्तीर्ण झालेच पाहिजे एवढे मनातसुद्धा येत नाही. आता नववीचे नव्याने पेपर घेऊन शिक्षकांना गुण वाढविता येणार नाही. मूल्यमापन पंजीत बदल करता येणार नाही; कारण, सरलसंगणक प्रणालीवर विद्यार्थ्यांचे नववीचे गुण भरले गेले आहेत. तसेच सराव परीक्षेचे ८० पैकी ३० गुणांत रूपांतर करण्यात येणार असल्याने तिथेही फारसे गुण विद्यार्थ्यांना पडणार नाहीत. जे काही गुण वाढविता येतील ते २० गुणांच्या तोंडी परीक्षेत. एवढेच शिक्षकांच्या हाती राहिले आहे. त्यामुळे शाळांना १०० टक्के निकाल लावण्याची संधी प्राप्त झाली. ३५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या मुलांना उत्तीर्ण होणे फार अवघड होणार नाही; पण, ९० टक्क्यांच्या वर येणारी मुले फार कमी दिसणार आहेत. यावेळी १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांची संख्या वाढणार आहे. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी शाळा स्तरावर शिक्षक वस्तुनिष्ठ मूल्यांकन करीत आहेत.

बॉक्स

अभिलेख तपासणी

शिक्षण मंडळाने दिलेली कार्यपद्धती व सूचनांचे उल्लंघन व अभिलेखात गैरप्रकार करणारे कारवाईस पात्र राहणार आहेत. त्यामुळे कारवाईचे कोलित अधिकाऱ्यांच्या हातात देण्याचे टाळले जात आहे. विशेषतः खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील व्यवस्थापन संचालक मंडळही कारवाईची संधी नेहमी शोधत असते. त्यामुळे कुणीही शिक्षक अडचणीत सापडू नये या मानसिकतेत आहेत.

बॉक्स

गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान

जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ते नववीत असताना दहावीच्या अभ्यासाची तयारी करतात. केवळ पास होण्यापुरती नववीची परीक्षा देतात. अशा बऱ्याच मुलांना नववीत गुण कमी पडले आहेत. त्या गुणवंत मुलांच्या गुणांची टक्केवारी कमी येण्याची खूप शक्यता आहे. दोन वर्षे कसून अभ्यास करणारी मुले नाराजीत आहेत. त्यांना निकाल मान्य नसेल तर तशी पुन्हा लेखी परीक्षा देण्याची तरतूद शिक्षण मंडळाने केली आहे. दहावीला फारसे महत्त्व दिले जात नसल्याने पुन्हा परीक्षा देण्याच्या मानसिकतेत सध्या तरी विद्यार्थी दिसून येत नाहीत.

खासगी, पुनर्परीक्षार्थी यांचे फावणार

जे विद्यार्थी यावेळी खासगी, पुनर्परीक्षार्थी व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसले आहेत त्यांना उत्तीर्ण होण्याची खूप मोठी संधी चालून आली आहे.

कोट

या वर्षी गुणवत्तेची कसोटी लागली नाही. निकालाची तेवढी उत्सुकता नाही. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी परीक्षा मंडळ पुन्हा देत आहे; पण आता पुन्हा परीक्षा देण्याची ती मानसिकता नाही.

छबिता भोयर

दहावीची विद्यार्थिनी मोहगाव देवी

कोट

कोविडच्या असामान्य परिस्थितीने निकाल शाळेवर सोपविला. निकाल विद्यार्थ्यांना खुश व नाखुश करून जाणार आहे. निकालाने वस्तुनिष्ठता, शाळांची प्रामाणिकपणाची कसोटी लावली आहे.

- सुनीता तोडकर

पुष्पलताबाई तोडकर विद्यालय, नरसिंहटोला