शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बीची लागवड घटणार

By admin | Updated: November 29, 2014 23:14 IST

खरीप हंगामात पावसाचा अनियमितता व कमी पावसामुळे धानाच्या पेरणीला उशिर झाला. याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. पेरणीच्या हंगामाला उशिर झाल्याने ६० टक्के शेतजमिनीवर

बळीराजावर आर्थिक संकट : ६० टक्के शेतीवर पेरणीची शक्यताभंडारा : खरीप हंगामात पावसाचा अनियमितता व कमी पावसामुळे धानाच्या पेरणीला उशिर झाला. याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. पेरणीच्या हंगामाला उशिर झाल्याने ६० टक्के शेतजमिनीवर रब्बीची पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे ४० टक्के शेतजमीन पडीक राहण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.धानासाठी प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी खरीप हंगामात बसला. पावसाळ्यात खरीप हंगामात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले. पावसाच्या लहरीपणामुळे धान पऱ्हे करपल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यानंतर ओलीताच्या भरवशावर काहींनी पेरणी ओटपल्या. मात्र पेरणीनंतर पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या तर काहींनी शेती पडीत ठेवण्यापेक्षा उशिरा पेरण्या आटोपल्या. यामुळे खरीपाच्या हंगामाच्या अखेरपर्यंत पेरण्या सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र बघायला मिळाले. खरीपाच्या शेतीतील धान कापणी रब्बी पिकाचा हंगाम सुरू होऊनही सुरूच आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीची पेरणी अजुनपर्यंत आटोपली नसल्याने तिला फार विलंब होत आहे. साधारणत: डिसेंबर अखेरपर्यंत रब्बीची पेरणी पूर्ण व्हायला पाहिजे. नोंव्हेंबर अखेरपर्यंत कापणीच सुरू असल्याने जिल्ह्यात रब्बीची पेरणी सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत ४६ टक्क्यांवरच पोहचली आहे.कमी व अनियमित पावसामुळे सध्या जमीनीत ओलावा राहिला नाही. त्यामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या होऊ शकत नाही. मात्र ज्यांच्याकडे ओलीताचे साधन आहे. ते शेतकरी पेरणी आटोपण्यावर भर देत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहु मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यानंतर हरभरा, ज्वारी व गळीतधान्याचे पिक घेतल्या जाते. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने ४५ हजार ११५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणीसाठी निर्धारित केले होते. त्यापैकी २० हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. तृणधान्यासाठी ११ हजार ३० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणी करण्याचे उद्दीष्ट होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ २ हजार ४५२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी पार पडली आहे. हरभरा, लाख, पोपट, वाटाणा, उडीद या धान्यांसाठी ३० हजार २३५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले होते. केवळ १४ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. जवस, सुर्यफुल, करडई, मोहरी, तीळ, एरंडी व अन्य गळीत धान्यासाठी ३ हजार ७५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले होते. त्यापैकी २ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पेरणी निर्धारित केलेल्या क्षेत्रात पूर्णपणे आटोपल्या होत्या. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उशिरा धान पेरणीमुळे उतारीतही घट आली आहे. शासनाने धानाची आधारभुत किंमत जाहीर केली नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. (शहर प्रतिनिधी)