शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बीची लागवड घटणार

By admin | Updated: November 29, 2014 23:14 IST

खरीप हंगामात पावसाचा अनियमितता व कमी पावसामुळे धानाच्या पेरणीला उशिर झाला. याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. पेरणीच्या हंगामाला उशिर झाल्याने ६० टक्के शेतजमिनीवर

बळीराजावर आर्थिक संकट : ६० टक्के शेतीवर पेरणीची शक्यताभंडारा : खरीप हंगामात पावसाचा अनियमितता व कमी पावसामुळे धानाच्या पेरणीला उशिर झाला. याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. पेरणीच्या हंगामाला उशिर झाल्याने ६० टक्के शेतजमिनीवर रब्बीची पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे ४० टक्के शेतजमीन पडीक राहण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.धानासाठी प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी खरीप हंगामात बसला. पावसाळ्यात खरीप हंगामात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले. पावसाच्या लहरीपणामुळे धान पऱ्हे करपल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यानंतर ओलीताच्या भरवशावर काहींनी पेरणी ओटपल्या. मात्र पेरणीनंतर पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या तर काहींनी शेती पडीत ठेवण्यापेक्षा उशिरा पेरण्या आटोपल्या. यामुळे खरीपाच्या हंगामाच्या अखेरपर्यंत पेरण्या सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र बघायला मिळाले. खरीपाच्या शेतीतील धान कापणी रब्बी पिकाचा हंगाम सुरू होऊनही सुरूच आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीची पेरणी अजुनपर्यंत आटोपली नसल्याने तिला फार विलंब होत आहे. साधारणत: डिसेंबर अखेरपर्यंत रब्बीची पेरणी पूर्ण व्हायला पाहिजे. नोंव्हेंबर अखेरपर्यंत कापणीच सुरू असल्याने जिल्ह्यात रब्बीची पेरणी सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत ४६ टक्क्यांवरच पोहचली आहे.कमी व अनियमित पावसामुळे सध्या जमीनीत ओलावा राहिला नाही. त्यामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या होऊ शकत नाही. मात्र ज्यांच्याकडे ओलीताचे साधन आहे. ते शेतकरी पेरणी आटोपण्यावर भर देत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहु मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यानंतर हरभरा, ज्वारी व गळीतधान्याचे पिक घेतल्या जाते. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने ४५ हजार ११५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणीसाठी निर्धारित केले होते. त्यापैकी २० हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. तृणधान्यासाठी ११ हजार ३० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणी करण्याचे उद्दीष्ट होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ २ हजार ४५२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी पार पडली आहे. हरभरा, लाख, पोपट, वाटाणा, उडीद या धान्यांसाठी ३० हजार २३५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले होते. केवळ १४ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. जवस, सुर्यफुल, करडई, मोहरी, तीळ, एरंडी व अन्य गळीत धान्यासाठी ३ हजार ७५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले होते. त्यापैकी २ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पेरणी निर्धारित केलेल्या क्षेत्रात पूर्णपणे आटोपल्या होत्या. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उशिरा धान पेरणीमुळे उतारीतही घट आली आहे. शासनाने धानाची आधारभुत किंमत जाहीर केली नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. (शहर प्रतिनिधी)