शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे मानवाचे संरक्षण

By admin | Updated: June 5, 2015 00:56 IST

भारतीय संस्कृतीमध्ये पुर्वजांनी निसर्गाला देवाचे स्थान दिले होते. म्हणून ते निसर्गाबद्दल नितांत आदर बाळगत असत.

भंडारा : भारतीय संस्कृतीमध्ये पुर्वजांनी निसर्गाला देवाचे स्थान दिले होते. म्हणून ते निसर्गाबद्दल नितांत आदर बाळगत असत. झाडे, नद्या, डोंगर, प्राणी पशु, पक्षी या सर्वांनाच भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. वृक्षतोड, ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन, इंधनाचा अंधाधुंद वापर, सीमेंट काँक्रीटच्या जंगलामुळे जलस्तरावरील घट वन्यजीव पशू पक्ष्यांची शिकार, वाढते हवामान, वणवा आदींमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने त्याचे शीघ्र संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रीन हेरिटेज संस्थेतर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. विकासाच्या नावावर प्रकृतीशी छेडछाड केली जात आहे. ग्रामीण क्षेत्रात लोक हातात कुऱ्हाड घेऊन जंगलात जातात. हिरव्याकंच मौल्यवान झाडांची सर्रासपणे कत्तल करतात. रस्ता चौपदरीकरण, नहर बांधकाम, शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जंगले ओसाड होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.पशूपक्षी व वन्यजीवांची अवैध शिकार सुरु आहे. वाढत्या तापमान, वणवा, आगीमुळे जंगले भस्म होऊन वन्य प्राणी जंगले सोडून गाव शहराकडे धावत आहेत. तर काही पाण्याअभावी जीवाला मुकत आहेत. कचरा, घाण, सांडपाणी, दूषित जल जीवनदायी नद्यात टाकून आपणच त्यांना विषनद्या बनवून त्यांचे पावित्र्य संपवित आहोत.बदलत्या हवामान चक्रामुळे पर्यावरण असंतुलनाचे परिणाम मानवाला भोगावे लागतील. तापमान वाढीमुळे नद्या, जलाशय आटत असल्यामुळे जमिनीखाली पाण्याची पातळी खोलवर जात आहे. त्यामुळे भविष्यात नद्या, जलाशय, पाण्याविना राहून जमिनीतील पाणीही अदृष्य होईल, तेव्हा मानवाचे हाल कसे होईल? यासाठी गांभीर्याने नियोजन करण्याची गरज आहे. भविष्यात तीव्र तापमान वृद्धीमुळे जंगलचे जंगल, गवताच्या झोपड्या उष्णतेच्या तीव्रतेने पेटून उठतील. पाण्यासाठी युद्ध व मानवाला गाव शहर सोडून जलाशय, नद्या, समुद्राकाठी आश्रय घेण्याची वेळ येणार आहे.ध्रुवीय प्रदेश व हिमालयातील बर्फ वितळून समुद्र व नद्यांचे जलस्तर वाढून महापूर व भरतीची शक्यता असून वनस्पती, अन्नधान्य, जलचर, वनचर, पशु पक्षी यांचेही अस्तित्व लोक पावण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण जगाचे वाळवंट होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका, चीन या देशात महापूर, बर्फाचे तुफान, जापान येथे भयंकर भूकंप व सुनामीमुळे अतोनात मनुष्यहानी, संपूर्ण युरोपखंडाच्या खाली खदखदत्या ज्वालामुखी शिवाय जगात काही ठिकाणी जागृत ज्वालामुखीमुळे लाखो हेक्टर जंगले आगीत भस्म, काही ठिकाणी भूकंप इ. घटनांनी महाविनाशलीलेची घंटा वाजविलेली आहे. जगात पर्यावरण संरक्षणाकरिता प्रयत्न सुरु आहे. आपण पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता का हातभार लावू नये. विकासाची फळे पर्यावरणाची बळी देवून जर चाखायची असतील तर येणाऱ्या पिढींसाठी देण्याकरिता आपल्यापाशी काहीच उरणार नाही. प्रत्येक क्षेत्रातील गाव व शहरातील प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन व संरक्षण करणे, पशुपक्षी, वन्यजीव, जल आदींच्या संरक्षणाची जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. जल, जंगल, जमीन व वन्यजीव संरक्षण करून मानवही आपले संरक्षण करू शकेल. विश्व पर्यावरण दिवसानिमित्त सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊन हातभार लावावे, असे आवाहन ग्रीेन हेरिटेज या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)