शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग हाच जलयुक्त शिवारचा आत्मा

By admin | Updated: March 5, 2016 00:35 IST

जलयुक्त शिवार ही केवळ शासकीय योजना म्हणून याकडे पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करणासाठीची लोकचळवळ आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय कार्यशाळाभंडारा : जलयुक्त शिवार ही केवळ शासकीय योजना म्हणून याकडे पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करणासाठीची लोकचळवळ आहे. या योजनेत  लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असून यावर्षी निवड झालेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला पुढच्या पिढीसाठी पाण्याची तरतूद करुन ठेवण्याकरिता मिळालेली ही शेवटची संधी आहे, असे समजून यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. अन्यथा आपली पुढची पिढ़ी आपल्याला माफ करणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ६९ गावांची निवड करण्यात आली. या गावात जलयुक्त योजनेचे योग्य नियोजन, अंमलबजावणी आणि लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे येथील मनरेगा उपायुक्त बाळासाहेब शिंदे, अकोला येथील जल व मृद संधारण विभागाचे डॉ. एस.एम. टाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. भोर, पवनीच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आपल्या आधीच जलयुक्त शिवारचे उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी अनेक मामा तलावांच्या निर्मितीतून गावातील पाणी गावातच साठवले. तेव्हा कोणतीही सरकारी योजना नव्हती. हे आपले पाणी आहे हे समजून घेऊन त्यांनी पुढच्या पिढीसाठी काम केले. शेकडो वषार्पुर्वी करुन ठेवलेल्या या साठवण तलावांची क्षमता पुनर्जिवित करण्यासाठी मात्र आता लोकांचा सहभाग मिळत नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे.  आपण आता काम केले नाही तर जी परिस्थिती मराठवाड्याची आहे तशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.  भविष्यातील धोका समजून घेऊन गावातील लोकांनी योग्य नियोजना सोबतच प्रत्यक्ष लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले, शासनाला जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची गरज का पडली याची पार्श्वभूमी समजून सांगितली. जलयुक्तमध्ये पाणलोटच्या कामांना प्राधान्य देताना माथा ते पायथा या तत्वाप्रमाणे काम  करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अस्तित्वातील साठवण  संरचनाचे पुनर्जीवन व दुरुस्तीची कामे पहिल्यांदा हाती घेतली पाहिजे. त्याचबरोबर विहिरींचे पुनर्भरण, स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड आदी कामे घ्यावी, असे सांगितले. मृद व जलसंधारण विभागाचे डॉ.टाले यांनी शेतात पडणाऱ्या पाण्याचे नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. पूर्वीच्या दुष्काळात आणि आताच्या दुष्काळात खुप तफावत आहे. तेव्हा नदी नाल्यांमध्ये पाणी होते आणि अन्नधान्याची टंचाई होती. आता मात्र गावातील नदी, नाले, विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे या दुष्काळाची भीषणता अधिक आहे. यासाठी जागच्या जागी पाणी जिरवणे यावर भर दिला पाहिजे. शेतात कमी पाण्यात अधिक पिक घेणे, पिक पद्धतीत बदल करणे आजच्या काळाची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनासाठी शेततळे घेतले पाहिजे. यामुळे विहिरीचे पुनर्भरण आणि जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी केले. संचालन व आभार सोनवने यांनी केले. (नगर प्रतिनिधी)