शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजपकडून केवळ आश्वासनांची खैरात

By admin | Updated: July 10, 2016 00:25 IST

काँग्रेस पक्षाने भारत देशातील गोरगरीबांना, शोषित, पिडीत, दलित यांचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता कार्य केले आहे.

नितीन राऊत यांचा आरोप : काँग्रेस कार्यकर्ता मेळावा, प्रेमसागर गणव’र यांचा पदग्रहण सोहळाभंडारा : काँग्रेस पक्षाने भारत देशातील गोरगरीबांना, शोषित, पिडीत, दलित यांचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता कार्य केले आहे. देशात व राज्यात असलेले भाजप सरकार खोटे आश्वासन देवून जनतेला स्वप्न दाखवित आहेत. गरीब व भोळ्याभाबळ्या जनतेला भुलथापा देवून फसविण्याचे कार्य जोमात सुरु आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा भंडारा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. नितीन राऊत यांनी केला. येथील मुस्लीम लायब्ररी सभागृहात शुक्रवारी जिल्हा कॉग्रेस कमिटीतर्फे गणविर यांचा पदग्रहण समांरभ तथा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या सोहळ्यात मावळते जिल्हाध्यक्ष जिया पटेल यांच्याकडून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांना पदाचा कारभार सोपविण्यात आला. कार्याध्यक्ष म्हणून मनोहर सिंगनजुडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सेवक वाघाये, अनिल बावनकर, प्रदेश महासचिव प्रफुल गुळदे, जिया पटेल, मुजीब पठाण, आशावरी देवतळे, प्रमिला कुथे, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, रहिमबाबा पटेल, बशीर पटेल, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बिएसपी पक्षातून सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्याला जिल्ह्यातील तीन हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बंडूभाऊ सावरबांधे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पक्षाला बळकटी मिळवून द्यावे व संघटनेला मजबूत करावे. कार्यकर्त्यांशी पक्ष नाही व कार्यकर्त्यांमुळे नेता घडतो. एवढी मोठी शक्ती कार्यकर्त्यांत आहे. जिया पटेल यांनी चार वर्ष तीन महिन्यांचा जिल्हा कमिटीचा प्रभारी अध्यक्षपद सांभाळताना भाजपचा प्रभाव असताना जिल्हा परिषद व लाखनी मोहाडी नगर पंचायतीत काँग्रेस् ापक्षाचे अधिकाधिक पदाधिकारी निवडून आणले, असे सांगितले.सेवक वाघाये यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता कुठेही कमी नाही. इमानेइतबारे पक्षाचे कार्य करुन पक्षाशी निष्ठा ठेवून पक्ष संघटनेत काम करतो. येणारी लोकसभेची निवडणूक मित्रपक्षाला न देता काँग्रेस पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यांने लढावे असे मत मांडले.नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी काँग्रेस पक्षाचा विविध संघटनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. एनएसयुआय, युवक कॉंग्रेस ते जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदापर्यंत कार्य करीत असताना पक्षाने कामाची कार्यकुशलता लक्षात घेवून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी सर्व जाती धर्मातील व प्रवर्गातील ज्येष्ठ व श्रेष्ठ सर्व स्तरातील पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करुन जिल्ह्यातील सक्षम संघटन निर्माण करण्याची हमी दिली. कार्यक्रमाला के. के. पंचबुध्दे, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, अजय गडकरी, रामलाल चौधरी, युवराज वासनिक, विकास राऊत, विजय रायपुरकर, अनिकजमा पटेल, प्रकाश पचारे, सचिन घनमारे, नारायण तितीरमारे, प्रभु मोहतुरे, शंकर राऊत, मानिकराव ब्राम्हणकर, नंदु समरित, सुनिल गिरेपुंजे, भुमेश्वर महावाडे, आशिष पात्रे, डॉ. विनोद भोयर, अभिजित वंजारी, मार्कड भेंडारकर, प्यारेलाल वाघमारे, प्रेम वनवे, निलकंठ कायते, रेखा वासनिक, होमराज कापगते, प्रदिप बुराडे, सुध्दमता नंदागवळी, ज्ञानेश्वर रहांगडाले, केवळाम लांजेवार, उमेश कठाणे, डॉ. अजय तुमसरे, मंदा गणविर, रमेश डोंगरे, चित्रा सावरबांधे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, मंगला बगमारे, अर्चना वैद्य, ज्योती गणविर, पृथ्वी तांडेकर, स्वाती निमजे, कल्पना भिवगडे, धर्मेंद्र नंदरधने, अर्चना वैद्य, अल्का फुंडे, मंजुषा जगनाडे, बंडू ढेंगरे, वनिता सैयाम, मंगेश हुमणे, मुकूंद साखरकर आदी उपस्थित होते.संचालन राजकपूर राऊत तर आभार प्रदर्शन भुषन टेंभुर्णे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)