शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत केवळ ८.८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:59 IST

प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देवाढत्या तपमानाचा फटकादीड महिन्यात १० टक्के घट

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये १७.६९ टक्के साठा होता. अवघ्या दीड महिन्यात जलसाठ्यात दहा टक्के घट नोंदविण्यात आली. पावसाळा लांबला तर जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे.नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत ३८४ सिंचन प्रकल्प आहेत. सध्या १६ मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि ३२६ लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये १२.५१ टक्के जलसाठा होता. यंदा झालेला अपुरा पाऊस आणि तापत्या उन्हामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे.नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२७.१९ दलघमी असून एकुण जलसाठा १००१ दलघमी आहे. ४२ मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ९२.०५ दलघमी असून एकुण जलसाठा १६५.०६ दलघमी आहे. ३२६ लघू प्रकल्पात ९०.०८ दलघमी जलसाठा असून एकूण जलसाठा १४३.०२ दलघमी आहे. गतवर्षी मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा होता. यंदा असलेल्या जलसाठ्याच्या तुलनेत ४ टक्के घट आली आहे. दरवर्षी जलसाठ्यात घट येत असून जलपुनर्भरणासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यातच प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून सिंचनाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो.वाढत्या तापमानाने प्रकल्पातील जलस्तर घटत आहे. विदर्भाचे तापमान ४५ अंशाच्या पार पोहचले आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी घटत आहे. यंदा पावसाळा लांबला तर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्रतलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारात सध्या गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गावागावांतील प्रकल्प तळाला जात आहेत. काही प्रकल्प तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे पडले आहे. प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही गावागावांत पाण्यासाठी ओरड सुरु आहे. भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा असल्याने जिल्ह्यात कुठेही टँकर सुरु नाही. परंतु भंडारा शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई