शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत केवळ ८.८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:59 IST

प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देवाढत्या तपमानाचा फटकादीड महिन्यात १० टक्के घट

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये १७.६९ टक्के साठा होता. अवघ्या दीड महिन्यात जलसाठ्यात दहा टक्के घट नोंदविण्यात आली. पावसाळा लांबला तर जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे.नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत ३८४ सिंचन प्रकल्प आहेत. सध्या १६ मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि ३२६ लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये १२.५१ टक्के जलसाठा होता. यंदा झालेला अपुरा पाऊस आणि तापत्या उन्हामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे.नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२७.१९ दलघमी असून एकुण जलसाठा १००१ दलघमी आहे. ४२ मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ९२.०५ दलघमी असून एकुण जलसाठा १६५.०६ दलघमी आहे. ३२६ लघू प्रकल्पात ९०.०८ दलघमी जलसाठा असून एकूण जलसाठा १४३.०२ दलघमी आहे. गतवर्षी मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा होता. यंदा असलेल्या जलसाठ्याच्या तुलनेत ४ टक्के घट आली आहे. दरवर्षी जलसाठ्यात घट येत असून जलपुनर्भरणासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यातच प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून सिंचनाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो.वाढत्या तापमानाने प्रकल्पातील जलस्तर घटत आहे. विदर्भाचे तापमान ४५ अंशाच्या पार पोहचले आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी घटत आहे. यंदा पावसाळा लांबला तर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्रतलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारात सध्या गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गावागावांतील प्रकल्प तळाला जात आहेत. काही प्रकल्प तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे पडले आहे. प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही गावागावांत पाण्यासाठी ओरड सुरु आहे. भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा असल्याने जिल्ह्यात कुठेही टँकर सुरु नाही. परंतु भंडारा शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई