शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत केवळ ८.८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:59 IST

प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देवाढत्या तपमानाचा फटकादीड महिन्यात १० टक्के घट

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये १७.६९ टक्के साठा होता. अवघ्या दीड महिन्यात जलसाठ्यात दहा टक्के घट नोंदविण्यात आली. पावसाळा लांबला तर जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे.नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत ३८४ सिंचन प्रकल्प आहेत. सध्या १६ मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि ३२६ लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये १२.५१ टक्के जलसाठा होता. यंदा झालेला अपुरा पाऊस आणि तापत्या उन्हामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे.नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२७.१९ दलघमी असून एकुण जलसाठा १००१ दलघमी आहे. ४२ मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ९२.०५ दलघमी असून एकुण जलसाठा १६५.०६ दलघमी आहे. ३२६ लघू प्रकल्पात ९०.०८ दलघमी जलसाठा असून एकूण जलसाठा १४३.०२ दलघमी आहे. गतवर्षी मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा होता. यंदा असलेल्या जलसाठ्याच्या तुलनेत ४ टक्के घट आली आहे. दरवर्षी जलसाठ्यात घट येत असून जलपुनर्भरणासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यातच प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून सिंचनाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो.वाढत्या तापमानाने प्रकल्पातील जलस्तर घटत आहे. विदर्भाचे तापमान ४५ अंशाच्या पार पोहचले आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी घटत आहे. यंदा पावसाळा लांबला तर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्रतलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारात सध्या गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गावागावांतील प्रकल्प तळाला जात आहेत. काही प्रकल्प तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे पडले आहे. प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही गावागावांत पाण्यासाठी ओरड सुरु आहे. भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा असल्याने जिल्ह्यात कुठेही टँकर सुरु नाही. परंतु भंडारा शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई