शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

आता कार्डविना मिळणार ‘जीवनदायी’चा लाभ

By admin | Updated: May 11, 2014 00:03 IST

दारिद्र्यरेषेवरील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने २९ नोव्हेंबर २०१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली.

खराशी : दारिद्र्यरेषेवरील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने २९ नोव्हेंबर २०१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. यामागील मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा आहे. मात्र अजुनही कित्येक पात्र लाभार्थ्यांना माहिती अपडेट न होऊ शकल्याने जीवनदायी कार्ड प्राप्त होण्यास विलंब होत आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते. त्यावर उपाय म्हणून आता रेशनकार्ड व आधारकार्ड असल्यासही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा, असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते नागपुरातून या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ तपासणी उपचारांचा लाभ घेता येणार आहे. जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटूंबांना कार्ड वाटप करण्यात आले. या माहितीसाठी शिधापत्रिकेची माहिती ग्राह्य धरण्यात आली. मात्र संबंधित विभागाने अशा कार्डधारकांची माहितीच अपडेट केली नाही. ज्या कुटूंबांचा डेटा अपडेट केला त्यातही घोळ असल्याचे समोर आले. यात एका कुटूंबातील नावे दुसर्‍या कुटूंबात गेल्याचे चित्र आहे. या कारणाने अनेकांना जीवनदायी योजनेपासून वंचित राहावे लागत होते. याची दखल घेत शासनाने अखेर शिधापत्रिका व आधारकार्ड असतानाही योजनेचा लाभ देण्याचा संबंधित कंपनी व जिल्ह्यातील रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालयाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता राशनकार्ड घेवून रुग्णालयात जाणार्‍यांनाही या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेवर नोंदणीची तारीख असणे बंधनकारक आहे. तशी नोंद नसल्यास तहसील कार्यालयात जाऊन नोंदवून घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा महत्वाचा निर्णय असून लाभार्थी असून कार्ड न मिळाल्यामुळे वंचित असणार्‍यांना रेशनकार्ड व आधारकार्डमुळे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल. (वार्ताहर)