शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एनजीओसाठी जागा, ‘आर्थो’ वॉर्डसाठी जागा नाही

By admin | Updated: June 10, 2015 00:28 IST

जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक प्रकरणांमुळे खळबळ सुरू आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेक

आकस्मिक विभागात ओपीडी : जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांसाठी जागेचा अभावगोंदिया : जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक प्रकरणांमुळे खळबळ सुरू आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेक वर्षांपासून एक खासगी स्वयंसेवी संस्था एका ठिकाणी बसून आपले कामकाज पाहत आहे. मात्र रूग्णालयात आर्थो वार्डसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे रूग्णांसह चिकित्सा अधिकाऱ्यांनासुद्धा त्रास सहन करावे लागत आहे.केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या विशाल इमारतीत आर्थो विभागासाठी (अस्थिरोग) आतापर्यंत वॉर्ड तयार करण्यात आले नाही. आकस्मिक विभागाजवळच तीन लहान कक्ष आर्थो विभागाला देण्यात आले आहेत. तेथे १२ खाटांची सोय असून ते एक दुसऱ्याला लागूनच आहेत. महिला-पुरूष रूग्णांना आजूबाजूच्या खाटांवरच ठेवले जाते. रूग्णालयात जागा उपलब्ध असतानासुद्धा आर्थो वार्डसाठी लक्ष दिले जात नाही, असे बोलले जाते. अस्थीरोगासाठी वेगळे वार्ड नसल्यामुळे रूग्णांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. येथे नियुक्त अस्थीरोग विशेषज्ञांनासुद्धा आपली ओपीडी काढण्यासाठी कोणताही कक्ष देण्यात आला नाही. त्यामुळे आकस्मिक विभागात बसूनच त्यांना आपली ओपीडी काढावी लागत आहे. विशेष म्हणजे जेथे आर्थोच्या रूग्णांचा उपचार केला जातो त्याच्या अगदी समोरील भाग एका स्वयंस्वेवी संस्थेला देण्यात आला आहे. सदर स्वयंसेवी संस्था तेथे रूग्णांची तपासणी करते. त्यांचा उपचार करते व उपचाराचा सल्ला देते. सदर स्वयंसेवी संस्था रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांचे कार्य करते, मात्र शेवटी ती एक स्वयंसेवी संस्थाच आहे. या संस्थेवर कृपा दाखविण्यास हर्ज नाही, परंतु अशीच कृपा दुसऱ्या विभागांवर का दाखविली जात नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)दोन तास रूग्णाची भटकंती६ जून रोजी सालेकसा तालुक्याच्या ब्राह्मणी येथील रहिवासी कबीरदास दमाहे (५०) रूग्णालयात उपचारासाठी पोहोचला. त्याने केटीएस रूग्णालयाच्या ओपीडी काऊंटरमधून रसीद बनविली व डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी त्याला भरती होण्याचे दुसरे कागदपत्र बनवून दिले. ते घेवून तो आकस्मिक वार्डात गेला. मात्र तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्याला भरती करण्यास नकार दिला. त्यामुळे तो व त्याचे कुटुंबीय दोन तास डॉक्टरांच्या मागे भटकत होते. त्याला कोठे ठेवावे, ही समस्या डॉक्टरांपुढे होती. आकस्मिक वार्डाच्या बाजूच्या तीन कक्षात १२ रूग्ण भरती होते. एवढ्याच खाटा त्यांना देण्यात आल्या होत्या. आर्थो विभागात १४ रूग्ण दाखल होते. दोन रूग्णांना इतर ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र त्या दोन रूग्णांवर तेथील डॉक्टर तसेच कर्मचारी उपचार करीत नसून त्यांच्याकडे लक्षही देत नव्हते. अशात या रूग्णाला अकारण का त्रास द्यावे? जवळपास दोन तासानंतर आधीच्या दाखल रूग्णाला सुट्टी देण्यात आली. त्यानंतर कबीरदासला दाखल करण्यात आले. कबीरदास एक आठवड्यापूर्वी अपघातात जखमी झाला होता. त्याला फ्रॅक्चर सांगण्यात आले आहे, मात्र उपचारात गैरसोय केली जात आहे.केटीएस रुग्णालयासाठी चार वार्डांचे नियोजन करण्यात आले होते. नवीन इमारतीत तयार करण्यात आलेले चार वार्ड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरीत करण्यात आले. हे सर्व शासकीय पॉलिसीनुसार होत आहे. त्यामुळे आर्थो रुग्णांसाठी सध्या जे कक्ष आहेत, तेथेच उपचार केले जात आहे. मात्र आर्थोचे अधिक रुग्ण असले तर त्यांना इतर ठिकाणी उपलब्ध बेडनुसार हलविले जाते. डॉ. अनिल परियाल,निवासी वैद्यकीय अधिकारी, केटीएस रूग्णालय, गोंदिया.