शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करीत असते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले व्हावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे.

साकोली : शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करीत असते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले व्हावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतू ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे, पाणीपुरवठा विभागाकडे असते. मात्र ग्रामपंचयत व पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्रच बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना दुक्षित पाणी प्यावे लागते. ग्रामपंचायत ही गावाची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ग्राम पंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामेही केली जातात. त्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायतीने घेणे आवश्यक आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच गावातील नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. दुषित पाण्यामुळे जलजन्य आजाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. बऱ्याच ठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत टाकीमध्ये येणारे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरविणे अवश्यक आहे. सद्यस्थितीत पावसाअभावी पाण्याच्या पातळीत घर झाली आहे. त्यामुळे विहिमध्ये दूषित पाणी येत असते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा हा शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)