शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करीत असते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले व्हावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे.

साकोली : शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करीत असते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले व्हावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतू ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे, पाणीपुरवठा विभागाकडे असते. मात्र ग्रामपंचयत व पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्रच बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना दुक्षित पाणी प्यावे लागते. ग्रामपंचायत ही गावाची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ग्राम पंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामेही केली जातात. त्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायतीने घेणे आवश्यक आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच गावातील नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. दुषित पाण्यामुळे जलजन्य आजाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. बऱ्याच ठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत टाकीमध्ये येणारे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरविणे अवश्यक आहे. सद्यस्थितीत पावसाअभावी पाण्याच्या पातळीत घर झाली आहे. त्यामुळे विहिमध्ये दूषित पाणी येत असते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा हा शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)