भंडारा : आदिवासी कुटूंबाची भरीव सुधारने करीता वाडी प्रकल्प सुरू केला आहे. लोकांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विकास कार्यक्रमाला लोक सहभागाची गरज आहे, असे विचार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाडी प्रकल्प उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.तुमसर तालुक्यातील आलेसुर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर नाबार्ड द्वारा पुरस्कृत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे वाडी प्रकल्प उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अरविंद खापर्डे हे होते. प्रमुख पाहुणे ओलसूरचे सरपंच हेमराज मेहर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सजिव गजभिये, अविल बोरकर, पृथ्वीराज शेंडे, प्रकल्प समन्वयक योगेशकुमार टेंभरे, आलेसूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज हाळगे, रामचंद्र करमकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम सलामे उपस्थित होते.द्विवेदी म्हणाले, वाडी हा प्रकल्प नसून दिर्घकाळ विकास साधणारा कार्यक्रम आहे. याची यशस्वीता गाठण्यासाठी लोकांचे योगदान महत्वाचे आहे. सहभागी घटकांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेवून नियोजन करावे, असा सल्ला याप्रसंगी दिला. हा प्रकल्प १० आदिवासी गावात राबविण्यात येत आहे. यासर्व गावात संपूर्ण विकास कर्मीचे समन्वय साधून सर्व योजना एकत्रित राबविण्याचे याप्रसंगी आश्वासन त्यांनी दिले.कार्यक्रमाला गोंडीटोला, चिखली, आसलपाणी, कारली, लेंढेझरी, गणेशपूर, गायमुख, लवादा, विटपूर, खापा या प्रकल्प कार्यक्षेत्रातील १० गावाचे शेतकरी व महिलांची उपस्थिती होती. संचालन पृथ्वीराज शेंडे, प्रास्ताविक अविल बोरकर, आभार टेंभरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जगन्नाथ कटरे, जियालाल रहांगडाले, निखिल सावंतवान, निर्मला उईके, संजय सोनवने, सुरेंद्र पेंदाम, राधेश्याम कंगाले, हरीप्रसाद वाडवे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
सर्वांगीण विकास कार्यक्रमाला लोकसहभागाची गरज
By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST