शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

बंधाऱ्यांची दुरवस्था

By admin | Updated: August 10, 2014 22:50 IST

अनेक वर्षापूर्वी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याकडे शासन प्रशासनाच्या दुुर्लक्षीतपणामुळे ६०० हेक्टर शेतजमीन, बागायती व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी व सामान्य जनतेला पाण्यावाचून वंचित

जवाहरनगर : अनेक वर्षापूर्वी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याकडे शासन प्रशासनाच्या दुुर्लक्षीतपणामुळे ६०० हेक्टर शेतजमीन, बागायती व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी व सामान्य जनतेला पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. ५० लक्ष रुपयांची ही वास्तु शोभेची बनली आहे. राजेदहेगाव येथील बारा फुट उंचीचे ४२ लोखंडी पत्रे चोरीला तर खराडी बंधारा वाडीत घातल्यागत झालेला आहे.पाणी अडवा, पाणी जिरवा तत्वाचे पालन करुन जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी व राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी राजेदहेगाव हे गाव दत्तक घेतले होते. त्या अनुषंगाने राजेदहेगाव गावापासून बारामाही वाहत असलेल्या नाल्यावर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे अंतर्गत सुमारे २५ लक्ष रुपये किंमतीचा कोल्हापुरी सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. यात १५० फुट लांब व १२ फुट उंच, तीन बाय बारा फुट आकाराचे १३९ लोखंडी पत्रे होते. मात्र मागील काळात पैकी ४२ पत्रे अज्ञात चोरट्यांनी पळविले. त्याचा शोध अजूनही लागलेला नाही. दुसरीकडे खराडी पासून दीड किलोमीटर अंतरावर याच नाल्यावर माजी आयकर आयुक्त धार्मिक यांच्या पुढाकाराने येथील बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. याच ठिकाणी ठाणा-खरबी- खराडी येथील पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहीर तयार करण्यात आली. गावात पाणीपुरवठा करण्यात येत होता. शेतकऱ्याच्या ३०० हेक्टर शेतजमिनी ओलीताखाली आल्या होत्या. मात्र या ठिकाणी बंधाऱ्यालगत रेतीचा ढीग साचल्यामुळे पाणी साठवणुकीवर परिणाम झाला. पावसाळ्यात पाणी असले तरी बंधारे कोरडे पडू लागले. पाणीवाटप समित्या कागदोपत्री कपाटात धुळखात होते. कालांतराने ठाणा-खरबी नळयोजना बंद पडली. शेतकरी शासन दरबारी विवेचना करीत होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. शासन-प्रशासन जनतेच्या कल्याणकारी योजना राबवितो. मात्र त्यावर नियंत्रण व अंमलबजावणीकडे अप्रत्यक्ष दुर्लक्ष करीत असल्याचे हे एक जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. लोकप्रतिनिधीद्वारे मोठ्या थाटात उद्घाटन करतात. मात्र योजना कशी चालत आहे, काम पूर्ण झाले काय? शेतकऱ्यांची आता स्थिती कशी आहे. याकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन साधा पाठपुरावा करीत नाही. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. मागील आॅगस्ट २००८ मध्ये बंधाऱ्यालगत शेतजमीन व शेतीपयोगी अवजारे अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मात्र त्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. (वार्ताहर)