शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांची दुरवस्था

By admin | Updated: August 10, 2014 22:50 IST

अनेक वर्षापूर्वी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याकडे शासन प्रशासनाच्या दुुर्लक्षीतपणामुळे ६०० हेक्टर शेतजमीन, बागायती व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी व सामान्य जनतेला पाण्यावाचून वंचित

जवाहरनगर : अनेक वर्षापूर्वी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याकडे शासन प्रशासनाच्या दुुर्लक्षीतपणामुळे ६०० हेक्टर शेतजमीन, बागायती व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी व सामान्य जनतेला पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. ५० लक्ष रुपयांची ही वास्तु शोभेची बनली आहे. राजेदहेगाव येथील बारा फुट उंचीचे ४२ लोखंडी पत्रे चोरीला तर खराडी बंधारा वाडीत घातल्यागत झालेला आहे.पाणी अडवा, पाणी जिरवा तत्वाचे पालन करुन जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी व राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी राजेदहेगाव हे गाव दत्तक घेतले होते. त्या अनुषंगाने राजेदहेगाव गावापासून बारामाही वाहत असलेल्या नाल्यावर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे अंतर्गत सुमारे २५ लक्ष रुपये किंमतीचा कोल्हापुरी सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. यात १५० फुट लांब व १२ फुट उंच, तीन बाय बारा फुट आकाराचे १३९ लोखंडी पत्रे होते. मात्र मागील काळात पैकी ४२ पत्रे अज्ञात चोरट्यांनी पळविले. त्याचा शोध अजूनही लागलेला नाही. दुसरीकडे खराडी पासून दीड किलोमीटर अंतरावर याच नाल्यावर माजी आयकर आयुक्त धार्मिक यांच्या पुढाकाराने येथील बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. याच ठिकाणी ठाणा-खरबी- खराडी येथील पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहीर तयार करण्यात आली. गावात पाणीपुरवठा करण्यात येत होता. शेतकऱ्याच्या ३०० हेक्टर शेतजमिनी ओलीताखाली आल्या होत्या. मात्र या ठिकाणी बंधाऱ्यालगत रेतीचा ढीग साचल्यामुळे पाणी साठवणुकीवर परिणाम झाला. पावसाळ्यात पाणी असले तरी बंधारे कोरडे पडू लागले. पाणीवाटप समित्या कागदोपत्री कपाटात धुळखात होते. कालांतराने ठाणा-खरबी नळयोजना बंद पडली. शेतकरी शासन दरबारी विवेचना करीत होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. शासन-प्रशासन जनतेच्या कल्याणकारी योजना राबवितो. मात्र त्यावर नियंत्रण व अंमलबजावणीकडे अप्रत्यक्ष दुर्लक्ष करीत असल्याचे हे एक जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. लोकप्रतिनिधीद्वारे मोठ्या थाटात उद्घाटन करतात. मात्र योजना कशी चालत आहे, काम पूर्ण झाले काय? शेतकऱ्यांची आता स्थिती कशी आहे. याकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन साधा पाठपुरावा करीत नाही. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. मागील आॅगस्ट २००८ मध्ये बंधाऱ्यालगत शेतजमीन व शेतीपयोगी अवजारे अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मात्र त्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. (वार्ताहर)