शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

ग्रामीण रस्ते चिखलाने माखले

By admin | Updated: August 5, 2014 23:21 IST

पावसाचा जोर वाढला असल्याने ग्रामीण भागात तात पिकाची रोवणी जोरात सुरू आहे. परंपरागत शेतीला फाटा देत शेतकरी यांत्रिक युगाकडे वळला आहे. त्यामुळे वाढलेल्या पऱ्ह्याची रोवणी

शहापूर : पावसाचा जोर वाढला असल्याने ग्रामीण भागात तात पिकाची रोवणी जोरात सुरू आहे. परंपरागत शेतीला फाटा देत शेतकरी यांत्रिक युगाकडे वळला आहे. त्यामुळे वाढलेल्या पऱ्ह्याची रोवणी करण्याकरीता शेतात करण्यात येणारी चिखलणी लाकडी नांगरी व फणा ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाते.शेतशिवारातून चिखलणी करुन बाहेर पडलेले ट्रॅक्टर मातीसह रस्त्याने नेले जातात. ग्रामीण भागातील बहुतांशी गावे एकमेकांना डांबरी रस्त्यांशी जोडलेले आहेत. शेतातून काढलेले ट्रॅक्टर अशा रस्त्यावरुन नेताना चालकांना वेगळाच आनंद मिळत असावा असे वाटते. मातीसह शेतातून निघालेला ट्रॅक्टर वेगात चालविला की ट्रॅक्टरला लागून असलेली माती एका विशिष्ट गोलाकार आकारात उडत असते. त्यामुळे ट्रॅक्टरची मातीही निघते व चालकाचे मनोरंजनही होते. याचा फटका मात्र अशा रस्त्यावरुन ये-जा करणारे पादचारी, दुचाकी चालक व इतरांना बसत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून जवळपास सर्वच गावात सिमेंट वा डांबराचे रस्ते तयार झाले आहेत. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून इतर गावांना जाणारे रस्ते सुद्धा डांबरीकरण झालेले आहेत. मात्र यातील गावात असणारे मुख्य मार्ग व शेतशिवारातील असे रस्ते चिखलाने माखलेले आहेत. दरवर्षी पेक्षा यावर्षी पावसाची सरासरी कमी असल्याने शेतकरी जसा पाऊस पडतो तशी रोवणी लवकर आटोपण्याच्या घाईत आहे. त्यामुळे पूर्णपणे न जलावलेल्या शेतातून ट्रॅक्टरसोबत माती रस्त्यावर येण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील काही पक्के रस्ते अक्षरश: मातीने व चिखलाने झाकली गेली आहेत. त्याचा फटका मात्र ग्रामस्थांना व आवागमन करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)