शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

भाषिक कौशल्यासाठी नवोपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 00:49 IST

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी भाषण, संभाषण, वाचन व लेखन या चार मूलभूत कौशल्यांचा विकास गरजेचे आहे.

शेवटच्या दोन तासिका राखीव : ध्वनिक्षेपकावरून अभ्यास, शंकांचे होते सामूहिक निरसनगिरीधर चारमोडे मासळबालकांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी भाषण, संभाषण, वाचन व लेखन या चार मूलभूत कौशल्यांचा विकास गरजेचे आहे. कौशल्य आत्मसात केल्यास भाषेवर प्रभुत्व मिळविणे शक्य होते, ही संधी बालकांना उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेवून सुबोध विद्यालयात प्राचार्य जी. एन. टिचकुले यांनी शाळेत नवोपक्रम राबविला आहे.इंग्रजीसारख्या महत्वाच्या भाषेचे ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावे व इंग्रजी विषयाचा अध्ययनातील अडसर दुर व्हावा यासाठी टिचकुले यांनी या नवोपक्रमाची सुरु केली आहे. त्यांनी सुरू केलेला उपक्रम वाखन्याज्योगा आहे.उपरोक्त चारही मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना दररोज शेवटच्या दोन तासीका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यावेळी सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र बसवले जातात. ध्वनिक्षेपणावरुन इंग्रजीमधील १० ते १२ ओळींचा अपठित उतारा, पत्र, कथा, विविध काठिण्य पातळीचे शब्द, शब्दसमूह व वाक्यांचे वाचन केले जाते. विद्यार्थी लक्षपुर्वक ऐकून विद्यार्थी त्यांचे टिपण वहीमध्ये करतात. क्षमतेनुसार विद्यार्थी कमी अधिक लिहिण्याचा प्रयत्न करतात. श्रवण करुन लिहिलेल्या मजकुरावर नंतर विद्यार्थी क्षमतेनुसार प्रश्न विचारतात. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे एकाचवेळी सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली जाते. यामुळे मुलांचे एकाचवेळी श्रवण, कथन, लेखन, वाचन या मुलभूत कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते.वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विशिष्ट पध्दतीने अपठित उतारा व इतर लेखन साहित्याचा वापर केल्या जातो. लिखित उतारा त्यांच्याकडून वाचून घेतल्या जातो. शिक्षकांनी वाचन केलेल्या उताऱ्याचे विद्यार्थी काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रत्येक शब्दाशब्दांचे अनुकरण करतात. शब्दातील विराम, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक भाषा, डोळसपणे वाचणे, वाचनाचा उद्देश उच्चारातील विविधता, मूकअक्षरे आदींचा विचार वाचन कौशल्य विकसित करतांना केल्या जातो. आळीपाळीने सर्वच विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करताना, सर्वांनाच यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.भाषण-संभाषण कौशल्यावर विशेष भर देताना गटागटामध्ये विद्यार्थ्यांना आवडीचे विषय, व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव, इतर विषयांवर संभाषणासाठी प्रोत्साहित केल्या जाते. गटागटातून विद्यार्थी पाच-पाच, दहा-दहा मिनिटाचे सादरीकरण करतात. यावेळी इतर मनोरंजकपणे निरीक्षण करुन अपेक्षित चुका टाळण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे प्रस्थापित पारंपारिक पध्दतीपेक्षा वेगळा मार्ग अनुसरुन हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.यासाठी विद्यालयातील इंग्रजी शिक्षक एस. जी. हुकरे, सी. एस. नामुर्ते, जी. एस. चारमोडे, व्ही. टी. सार्वे, एन. एच. भुरे, डी. के. घुमुसकर, एच. के. वैद्य, व्ही. एल. कुथे यांची मदत आवश्यक ठरत आहे. खासगी महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेत वाढ होण्यासाठी चालविलेला हा प्रयत्न आदर्श प्रयत्न ठरला आहे.