शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खरीप पिकाची सुधारित आणेवारी ६४ पैसे

By admin | Updated: November 15, 2014 22:41 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची

शेतकरी संकटात : जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न?देवानंद नंदेश्वर - भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ६४ पैसे घोषित केली आहे. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून धान कापणीपर्यंत दृष्काळसदृश्य स्थिती असताना आता पिक परिस्थिती उत्तम कशी राहिल, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.जिल्ह्यात खरीपाचे पीक एक लक्ष ९९ हजार १७९.९४ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. त्यापैकी एक लक्ष ७९ हजार ४६ हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ६५ टक्के पाऊस झालेला आहे. भंडारा तालुक्यात २६ हजार ५८० हेक्टर, मोहाडी तालुक्यात ३२ हजार ११७ हेक्टर, तुमसर तालुक्यात २९ हजार २३३ हेक्टर, लाखनी तालुक्यात २२ हजार ४८८ हेक्टर, साकोली तालुक्यात १८ हजार ०४० हेक्टर, पवनी तालुक्यात २४ हजार ७५७ हेक्टर, लाखांदूर तालुक्यात २५ हजार ८३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची सुधारीत हंगामी आणेवारी ६४ पैसे दर्शविली आहे. यातील ७ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ८४० गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या सात गावांमध्ये मोहाडी तालुक्यातील तीन व तुमसर तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४० गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १७० गावांची पैसेवारी ६५ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०५ गावांची पैसेवारी ६५ पैसे, तुमसर तालुक्यातील १३९ गावांची पैसेवारी ७३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ५७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६६ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६४ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६१ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील ३१ गावे अकृषक पाण्याखाली पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. यामध्ये भंडारा तालुक्यातील चार, तुमसर तालुक्यातील सात, पवनी १६, साकोली दोन, तर लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८५७ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. ८४७ गावापैकी ८४० गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यापुर्वी झालेल्या नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे घोषित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम आणेवारीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.