शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकाची सुधारित आणेवारी ६४ पैसे

By admin | Updated: November 15, 2014 22:41 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची

शेतकरी संकटात : जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न?देवानंद नंदेश्वर - भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ६४ पैसे घोषित केली आहे. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून धान कापणीपर्यंत दृष्काळसदृश्य स्थिती असताना आता पिक परिस्थिती उत्तम कशी राहिल, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.जिल्ह्यात खरीपाचे पीक एक लक्ष ९९ हजार १७९.९४ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. त्यापैकी एक लक्ष ७९ हजार ४६ हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ६५ टक्के पाऊस झालेला आहे. भंडारा तालुक्यात २६ हजार ५८० हेक्टर, मोहाडी तालुक्यात ३२ हजार ११७ हेक्टर, तुमसर तालुक्यात २९ हजार २३३ हेक्टर, लाखनी तालुक्यात २२ हजार ४८८ हेक्टर, साकोली तालुक्यात १८ हजार ०४० हेक्टर, पवनी तालुक्यात २४ हजार ७५७ हेक्टर, लाखांदूर तालुक्यात २५ हजार ८३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची सुधारीत हंगामी आणेवारी ६४ पैसे दर्शविली आहे. यातील ७ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ८४० गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या सात गावांमध्ये मोहाडी तालुक्यातील तीन व तुमसर तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४० गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १७० गावांची पैसेवारी ६५ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०५ गावांची पैसेवारी ६५ पैसे, तुमसर तालुक्यातील १३९ गावांची पैसेवारी ७३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ५७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६६ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६४ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६१ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील ३१ गावे अकृषक पाण्याखाली पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. यामध्ये भंडारा तालुक्यातील चार, तुमसर तालुक्यातील सात, पवनी १६, साकोली दोन, तर लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८५७ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. ८४७ गावापैकी ८४० गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यापुर्वी झालेल्या नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे घोषित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम आणेवारीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.