शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

खरीप पिकाची सुधारित आणेवारी ६४ पैसे

By admin | Updated: November 15, 2014 22:41 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची

शेतकरी संकटात : जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न?देवानंद नंदेश्वर - भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ६४ पैसे घोषित केली आहे. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून धान कापणीपर्यंत दृष्काळसदृश्य स्थिती असताना आता पिक परिस्थिती उत्तम कशी राहिल, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.जिल्ह्यात खरीपाचे पीक एक लक्ष ९९ हजार १७९.९४ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. त्यापैकी एक लक्ष ७९ हजार ४६ हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ६५ टक्के पाऊस झालेला आहे. भंडारा तालुक्यात २६ हजार ५८० हेक्टर, मोहाडी तालुक्यात ३२ हजार ११७ हेक्टर, तुमसर तालुक्यात २९ हजार २३३ हेक्टर, लाखनी तालुक्यात २२ हजार ४८८ हेक्टर, साकोली तालुक्यात १८ हजार ०४० हेक्टर, पवनी तालुक्यात २४ हजार ७५७ हेक्टर, लाखांदूर तालुक्यात २५ हजार ८३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची सुधारीत हंगामी आणेवारी ६४ पैसे दर्शविली आहे. यातील ७ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ८४० गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या सात गावांमध्ये मोहाडी तालुक्यातील तीन व तुमसर तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४० गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १७० गावांची पैसेवारी ६५ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०५ गावांची पैसेवारी ६५ पैसे, तुमसर तालुक्यातील १३९ गावांची पैसेवारी ७३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ५७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६६ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६४ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६१ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील ३१ गावे अकृषक पाण्याखाली पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. यामध्ये भंडारा तालुक्यातील चार, तुमसर तालुक्यातील सात, पवनी १६, साकोली दोन, तर लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८५७ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. ८४७ गावापैकी ८४० गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यापुर्वी झालेल्या नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे घोषित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम आणेवारीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.