शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

शाळा सुरू होताच धावू लागल्या मानव विकास मिशनच्या बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्यात उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून पुन्हा सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : राज्यात उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून पुन्हा सुरु झाल्याने आता विद्यार्थ्यांसाठी एस. टी. महामंडळाच्या मानव विकास मिशनच्या बसही आता धावू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्याकरिता शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे. विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनच्या बसेस सुरु झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी आगारातून सात मानव विकासच्या बसेस देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गापूर्वी अशा एकूण ३५ बसेस धावत होत्या. आता प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालये सुरू झाली असल्याने जिल्ह्यातील पूर्वी सुरू असलेल्या मानव विकास मिशन अंतर्गत एस. टी. बस पुन्हा धावू लागल्या आहेत. या बसमधून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येतो. प्रत्येक शाळेकडून विद्यार्थिनींची यादी प्राप्त होताच त्यानुसार एस. टी. आगारातून मानव मिशन बसेस मंजूर करण्यात येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना गेल्या अनेक दिवसांपासून या सेवेचा चांगला लाभ होत आहे.

बॉक्स .

कोरोनापूर्वी धावत होत्या मानव विकासच्या ३५ बसेस

ग्रामीण भागातून शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. यामधून नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करु दिला जातो. मात्र, २३ मार्चपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार मानव विकास व एस. टी.च्या इतरही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाआधी मात्र जिल्ह्यातील सर्व बसेस धावत होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एस. टी. बसेस धावत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच मानव विकास मिशनच्या बसेस शाळा सुरू झाल्याने पुन्हा धावू लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे.

कोट

विद्यार्थिनींसाठी सुरु केलेल्या मानव विकास मिशन अंतर्गतच्या एस. टी. बसेस सुरू झाल्या आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, कधी-कधी या बस वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे आम्हाला शाळेत पोहोचण्यास उशीर होतो.

विद्यार्थिनी.

कोटकोट

विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर अशी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा सुरु आहे. अनेक बस सध्या सुरू झाल्या आहेत. पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे पास लवकर काढावेत, त्यामुळे उर्वरित बसेसही लवकरच सुरू करता येतील. - आगारप्रमुख, भंडारा