शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 15, 2014 23:59 IST

मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले.

उत्पादनात घट होणार : काही ठिकाणी रोवणीला प्रारंभभंडारा : मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले. परंतु काल रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३३.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात आज मंगळवारला, भंडारा येथे २० मि.मी., मोहाडी १४.६ मि.मी., तुमसर ५७.२ मि.मी., पवनी ४९.५ मि.मी., साकाली ५०.० मि.मी., लाखांदूर ६.२ मि.मी., लाखनी ३६.२ मि.मी. असा सरासरी ३३.४ मि.मी. पाऊस बरसला. यावर्षी केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे. जलाशयात केवळ १९.५६ टक्के जलसाठा असून ४ मध्यम प्रकल्पात १४.८५ टक्के, ३१ लघु प्रकल्पात ४२.८८ टक्के, २८ मामा तलावात ४३.७१ टक्के जलसाठा आहे. आजचा सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात तर कमी पाऊस लाखांदूर तालुक्यात झाला. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. परंतु पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी १५ जुलैपर्यंत ४० टक्के रोवणी होण्याची गरज होती. परंतु मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे रोवणी खोळंबली होती. पऱ्हे सडून गेले होते. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. यावर्षी पावसाअभावी पऱ्हे सुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.तुमसरात धो-धोकाल रात्रीपासून तुमसर शहरात धो-धो पाऊस बरसत आहे. आतापर्यंत बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर पऱ्हे वाचविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा घटता आलेख मागीलवर्षीची अतिवृष्टी वगळल्यास त्यापूर्वीच्या चार वर्षाचा पावसाच्या सरासरीचा आलेख बघितल्यास दुष्काळ सदृष्यस्थिती लक्षात येईल. पावसाच्या अंदाजावर शेतकरी अवलंबून असतो. मात्र यावर्षीचा अंदाज चुकला. चौरास भागात विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचन होते. जलाशयाची स्थिती भीषणभंडारा जिल्ह्यात चार मध्यम, ३१ लघु आणि २८ माजी मालगुजारी असे एकूण ६३ तलाव असले तरी एकही प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. गोसीखुर्द आणि बावनथडी प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असला तरी हा जलसाठा पेरणीसाठी उपयोगी ठरला नाही. प्रकल्पाचे पाणी रोवणीपूर्वी चिखलासाठी आवश्यक असते. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. (लोकमत चमू)