शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 15, 2014 23:59 IST

मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले.

उत्पादनात घट होणार : काही ठिकाणी रोवणीला प्रारंभभंडारा : मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले. परंतु काल रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३३.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात आज मंगळवारला, भंडारा येथे २० मि.मी., मोहाडी १४.६ मि.मी., तुमसर ५७.२ मि.मी., पवनी ४९.५ मि.मी., साकाली ५०.० मि.मी., लाखांदूर ६.२ मि.मी., लाखनी ३६.२ मि.मी. असा सरासरी ३३.४ मि.मी. पाऊस बरसला. यावर्षी केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे. जलाशयात केवळ १९.५६ टक्के जलसाठा असून ४ मध्यम प्रकल्पात १४.८५ टक्के, ३१ लघु प्रकल्पात ४२.८८ टक्के, २८ मामा तलावात ४३.७१ टक्के जलसाठा आहे. आजचा सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात तर कमी पाऊस लाखांदूर तालुक्यात झाला. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. परंतु पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी १५ जुलैपर्यंत ४० टक्के रोवणी होण्याची गरज होती. परंतु मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे रोवणी खोळंबली होती. पऱ्हे सडून गेले होते. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. यावर्षी पावसाअभावी पऱ्हे सुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.तुमसरात धो-धोकाल रात्रीपासून तुमसर शहरात धो-धो पाऊस बरसत आहे. आतापर्यंत बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर पऱ्हे वाचविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा घटता आलेख मागीलवर्षीची अतिवृष्टी वगळल्यास त्यापूर्वीच्या चार वर्षाचा पावसाच्या सरासरीचा आलेख बघितल्यास दुष्काळ सदृष्यस्थिती लक्षात येईल. पावसाच्या अंदाजावर शेतकरी अवलंबून असतो. मात्र यावर्षीचा अंदाज चुकला. चौरास भागात विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचन होते. जलाशयाची स्थिती भीषणभंडारा जिल्ह्यात चार मध्यम, ३१ लघु आणि २८ माजी मालगुजारी असे एकूण ६३ तलाव असले तरी एकही प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. गोसीखुर्द आणि बावनथडी प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असला तरी हा जलसाठा पेरणीसाठी उपयोगी ठरला नाही. प्रकल्पाचे पाणी रोवणीपूर्वी चिखलासाठी आवश्यक असते. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. (लोकमत चमू)