शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

टपरीचे खाणार.. त्याला आजार जडणार

By admin | Updated: April 2, 2015 00:59 IST

काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.

भंडारा : काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अस्वच्छता, उघड्यावरील खाणे, दूषित पाणी पिणे यामुळे हे आजार लवकर जडत असून, नागरिकांनी याबाबत अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. रस्त्यावरील टपऱ्या, हॉटेलमधील पाण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच आजारांना निमंत्रण मिळत आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे पाणी किती शुद्ध आहे, याबाबत नेहमीच साशंकता असते. हे माहीती असतानाही शहरवासी त्याकडे काणाडोळा करीत असतात. तर दुसरीकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रत्येक हॉटेलची तपासणी करणे शक्य नाही, असे सांगून प्रशासन हात वर करीत असल्याने टपरीचालकांना एकप्रकारे बळच मिळत आहे. मुख्य मार्गावर अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय आहे; मात्र या भागातच सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री केली जाते. हे पदार्थ झाकलेले नसल्यामुळे यावर माशा तसेच मोठ्या प्रमाणात धूळ बसत असते. ग्राहकदेखील याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे आजारांची लागण होण्याची शक्यता बळावत असते.विविध भागांत रस्त्यावरील हातगाडीवर नास्ता मिळत असतो. तेथील बहुतांश पाणी अशुद्धच असते. एवढेच नव्हे, तर अनेक हॉटेलमध्येही लोखंडी ड्रम, रांजणातील पाणी पिण्यासाठी दिले जाते. रसवंत्यांतही शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे.विशेष म्हणजे पाणी दूषित असल्याचे ग्राहकांना लगेचच लक्षात येते; मात्र तरीही तक्रार केली जात नसल्याने या व्यावसायिकांना बळ मिळत आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचीदेखील पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जात आहे. (शहर प्रतिनिधी)कारवाई करण्याचे धाडस नाहीबसस्थानकांबाहेर असलेल्या हॉटेल्समध्ये सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. काही बसस्थानकात तर बाहेरून आलेल्या प्रवाशांना बळजबरीने खाद्यपदार्थ घेण्यासाठी तगादा लावला जातो. विशेष म्हणजे ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास असतानाही कारवाईचे धाडस केले जात नाही. बनावट बाटल्या उन्हाळा सुरू झाला की, मिनरल वॉटर बाटल्यांचा सुळसुळाट सुरू होतो. मोठ्या कंपन्यांची नक्कल करत अनेक ठिकाणी बनावट बाटल्या बाजारात दिसतात. या बाटल्यांना सील व झाकण लावण्याचे साधे यंत्र बाजारात उपलब्ध असून, पाण्याच्या वापरलेल्या बाटल्यांचा पुन्हा वापर केला जातो. त्यांची विक्री छोट्या टपऱ्या, बसस्थानके, ग्रामीण भागातील हॉटेल्स येथे मोठ्या प्रमाणावर केला जातो. या बाटलीतील पाण्याच्या शुद्धतेचीही कोणतीही शाश्वती नाही. नागरिकांना बंद बाटलीतील पाणी पिल्याचे समाधान मिळते; परंतु हे पाणीही रोगांना निमंत्रण देत असल्याने ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी.छोटी हॉटेल्स, प्रामुख्याने टपऱ्यांवर पिण्यासाठी जे पाणी असते ते अशुद्ध असते व तेच पाणी सर्व खाद्यपदार्थ बनविताना वापरले जाते. टपरी व हॉटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ शिजवणे व ते प्रत्यक्ष तयार करणे या सर्व प्रक्रियेत अशुद्ध पाण्याचा सर्रास वापर केला जातो. तसेच याबरोबर अतिशय अस्वच्छ अवस्थेत हे पदार्थ बनविले जातात. पाण्याची कमतरता असल्याने ग्राहकांनी एकदा जेवण केलेल्या प्लेट अथवा ताट त्याच त्या पाण्यात सायंकाळपर्यंत धुतली जातात. यामुळे अन्नपदार्थ व तेथील स्वच्छता सर्व रामभरोसे आहे. अस्वच्छतेच्या या वातावरणात नागरिक मनसोक्त व्यंजनांचा आस्वाद घेतात. पुढे जाऊन तेच नागरिकांच्या अंगलट येते. आजार जडतात व स्वस्त माल पुढे जाऊन महागात पडतो.