शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

टपरीचे खाणार.. त्याला आजार जडणार

By admin | Updated: April 2, 2015 00:59 IST

काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.

भंडारा : काही दिवसांपासून जीवघेण्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अस्वच्छता, उघड्यावरील खाणे, दूषित पाणी पिणे यामुळे हे आजार लवकर जडत असून, नागरिकांनी याबाबत अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. रस्त्यावरील टपऱ्या, हॉटेलमधील पाण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच आजारांना निमंत्रण मिळत आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे पाणी किती शुद्ध आहे, याबाबत नेहमीच साशंकता असते. हे माहीती असतानाही शहरवासी त्याकडे काणाडोळा करीत असतात. तर दुसरीकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रत्येक हॉटेलची तपासणी करणे शक्य नाही, असे सांगून प्रशासन हात वर करीत असल्याने टपरीचालकांना एकप्रकारे बळच मिळत आहे. मुख्य मार्गावर अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय आहे; मात्र या भागातच सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री केली जाते. हे पदार्थ झाकलेले नसल्यामुळे यावर माशा तसेच मोठ्या प्रमाणात धूळ बसत असते. ग्राहकदेखील याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे आजारांची लागण होण्याची शक्यता बळावत असते.विविध भागांत रस्त्यावरील हातगाडीवर नास्ता मिळत असतो. तेथील बहुतांश पाणी अशुद्धच असते. एवढेच नव्हे, तर अनेक हॉटेलमध्येही लोखंडी ड्रम, रांजणातील पाणी पिण्यासाठी दिले जाते. रसवंत्यांतही शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे.विशेष म्हणजे पाणी दूषित असल्याचे ग्राहकांना लगेचच लक्षात येते; मात्र तरीही तक्रार केली जात नसल्याने या व्यावसायिकांना बळ मिळत आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचीदेखील पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जात आहे. (शहर प्रतिनिधी)कारवाई करण्याचे धाडस नाहीबसस्थानकांबाहेर असलेल्या हॉटेल्समध्ये सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. काही बसस्थानकात तर बाहेरून आलेल्या प्रवाशांना बळजबरीने खाद्यपदार्थ घेण्यासाठी तगादा लावला जातो. विशेष म्हणजे ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास असतानाही कारवाईचे धाडस केले जात नाही. बनावट बाटल्या उन्हाळा सुरू झाला की, मिनरल वॉटर बाटल्यांचा सुळसुळाट सुरू होतो. मोठ्या कंपन्यांची नक्कल करत अनेक ठिकाणी बनावट बाटल्या बाजारात दिसतात. या बाटल्यांना सील व झाकण लावण्याचे साधे यंत्र बाजारात उपलब्ध असून, पाण्याच्या वापरलेल्या बाटल्यांचा पुन्हा वापर केला जातो. त्यांची विक्री छोट्या टपऱ्या, बसस्थानके, ग्रामीण भागातील हॉटेल्स येथे मोठ्या प्रमाणावर केला जातो. या बाटलीतील पाण्याच्या शुद्धतेचीही कोणतीही शाश्वती नाही. नागरिकांना बंद बाटलीतील पाणी पिल्याचे समाधान मिळते; परंतु हे पाणीही रोगांना निमंत्रण देत असल्याने ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी.छोटी हॉटेल्स, प्रामुख्याने टपऱ्यांवर पिण्यासाठी जे पाणी असते ते अशुद्ध असते व तेच पाणी सर्व खाद्यपदार्थ बनविताना वापरले जाते. टपरी व हॉटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ शिजवणे व ते प्रत्यक्ष तयार करणे या सर्व प्रक्रियेत अशुद्ध पाण्याचा सर्रास वापर केला जातो. तसेच याबरोबर अतिशय अस्वच्छ अवस्थेत हे पदार्थ बनविले जातात. पाण्याची कमतरता असल्याने ग्राहकांनी एकदा जेवण केलेल्या प्लेट अथवा ताट त्याच त्या पाण्यात सायंकाळपर्यंत धुतली जातात. यामुळे अन्नपदार्थ व तेथील स्वच्छता सर्व रामभरोसे आहे. अस्वच्छतेच्या या वातावरणात नागरिक मनसोक्त व्यंजनांचा आस्वाद घेतात. पुढे जाऊन तेच नागरिकांच्या अंगलट येते. आजार जडतात व स्वस्त माल पुढे जाऊन महागात पडतो.