शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

गारवा वाढला; थंडी परतली

By admin | Updated: January 21, 2016 00:51 IST

दोन दिवसांपासून थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी पळाल्याचे जाणवत होते.

शेकोट्या पेटल्या : भंडाऱ्यात पारा १४ अंशावर भंडारा : दोन दिवसांपासून थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी पळाल्याचे जाणवत होते. मात्र दोन दिवसांपासून थंडीने पुन्हा डोके वर काढल्याने शेकट्या पेटू लागल्या असून उबदार कपडे खरेदीसाठी नागरीकांची गर्दी वाढू लागली आहे. आज पारा १४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भातील वातावरणात थंड वारे वाहू लागले असून, मध्यभारतातील तापमान घसरत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात तापमान पुन्हा ४ ते ५ अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या सर्वत्र कमाल तापमान २७ डिग्रीपेक्षा अधिक तर किमान तापमान १४.५ अंशापर्यंत आहे. उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम हळूहळू जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात अचानक घट झाली आहे. थंडीचा जोर वाढल्याने अनेकांनी कपाटात ठेवलेले ऊबदार कपडे बाहेर काढले आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्यातून शरीराला ऊब देण्याचा प्रकार शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र दिसून येत आहे.जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. दिवसाच्या तापमान मोठ्या प्रमाणात घसरले. यावर्षी जानेवारीच्या तापमानातील ही सर्वात मोठी घट आहे. यामुळे दिवसभर नागरिक उबदार कपडे घालून वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चहा टपरीमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली. थंडीच्या लाटेचा फायदा रबी पिकांना होणार आहे. ही लाट किती दिवस कायम राहते, यावर रबीच्या पिकांचे उत्पादन अवलंबून राहणार आहे. वाढलेल्या थंडीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानामध्ये उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. (नगर प्रतिनिधी)आजार बळावले, रुग्णालये फुल्लअकाली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वातावरण बदलामुळे विविध आजार बळावले असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहेत. शहरातील रुग्णालय, दवाखाण्यांमध्ये रुग्णांर्ची गर्दी दिसून आली. जिल्ह्यात १५ दिवसांपासून वातावरण कोरडे होते. मागील दोन दिवसांत रिमझिम पावासाने हजेरी लावली. तर आज दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरु होता. वातावरण बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा वाढता प्रभाव बालक व वृद्धासाठी जीवघेणाही ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, या थंडीमुळे बालक व वृद्धांच्या श्वासनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.