शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

दुष्काळाच्या घोषणेवरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांत रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:38 IST

शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभ्रमनिरास : एकाही तालुक्याचा समावेश नाही, दुष्काळसदृशमध्ये होते तीन तालुके

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्यशासनाने १५१ तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यात भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. खरे पाहता भंडारा जिल्हा हा गत काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षीही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुºया पावसाने धानपीक हातचे गेले आहे. शासनाने सुरुवातीला दुष्काळसदृष्य तालुक्याच्या यादीत जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि पवनी या तीन तालुक्यांचा समावेश केला होता. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा अशी मागणी होती. त्यामुळे ३१ आॅक्टोबर रोजी होणाºया निर्णयाकडे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते. परंतु यादीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याचे पाहून शेतकºयांचा भ्रमनिरास झाला.भंडारा हा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. या पीकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. परंतु यंदा सरासरीच्या ७७ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला. पाण्याची आवश्यकता असताना पाऊस च आला नाही. परिणामी शेकडो हेक्टवरील धानपीक करपले. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले जाईल अशी अपेक्षा होती.परंतु आता यादीत एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी शासनाच्या विविध मदतीपासून वंचित राहणार आहे. शासनाने दुष्काळ घोषीत करण्याच्या यादीबाबत फेरविचार करून जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी आहे.दुष्काळाची गरज असताना शासनाने शेतकºयांची क्रूर थट्टा चालविली आहे. यातून धान उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जातील. शेतीपूरक दूध व्यवसायीकांचेही हाल आहेत. २० रुपये लिटर पाणी आणि १९ रुपये लिटर दूध अशी अवस्था आहे. शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.-सुनील फुंडे, अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.शासनाने घोषीत केलेली दुष्काळग्रस्तांची यादी म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. जिल्ह्यात धानशेतीची गंभीर अवस्था असताना दुष्काळ घोषीत झाला नाही. सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यात तीनही आमदार असताना तेही गप्प आहेत.-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार.

टॅग्स :Farmerशेतकरी