शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

दुष्काळाच्या घोषणेवरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांत रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:38 IST

शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभ्रमनिरास : एकाही तालुक्याचा समावेश नाही, दुष्काळसदृशमध्ये होते तीन तालुके

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्यशासनाने १५१ तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यात भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. खरे पाहता भंडारा जिल्हा हा गत काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षीही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुºया पावसाने धानपीक हातचे गेले आहे. शासनाने सुरुवातीला दुष्काळसदृष्य तालुक्याच्या यादीत जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि पवनी या तीन तालुक्यांचा समावेश केला होता. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा अशी मागणी होती. त्यामुळे ३१ आॅक्टोबर रोजी होणाºया निर्णयाकडे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते. परंतु यादीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याचे पाहून शेतकºयांचा भ्रमनिरास झाला.भंडारा हा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. या पीकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. परंतु यंदा सरासरीच्या ७७ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला. पाण्याची आवश्यकता असताना पाऊस च आला नाही. परिणामी शेकडो हेक्टवरील धानपीक करपले. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले जाईल अशी अपेक्षा होती.परंतु आता यादीत एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी शासनाच्या विविध मदतीपासून वंचित राहणार आहे. शासनाने दुष्काळ घोषीत करण्याच्या यादीबाबत फेरविचार करून जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी आहे.दुष्काळाची गरज असताना शासनाने शेतकºयांची क्रूर थट्टा चालविली आहे. यातून धान उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जातील. शेतीपूरक दूध व्यवसायीकांचेही हाल आहेत. २० रुपये लिटर पाणी आणि १९ रुपये लिटर दूध अशी अवस्था आहे. शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.-सुनील फुंडे, अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.शासनाने घोषीत केलेली दुष्काळग्रस्तांची यादी म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. जिल्ह्यात धानशेतीची गंभीर अवस्था असताना दुष्काळ घोषीत झाला नाही. सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यात तीनही आमदार असताना तेही गप्प आहेत.-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार.

टॅग्स :Farmerशेतकरी