शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

मोफत प्रवास योजनेचा बट्याबोळ

By admin | Updated: July 14, 2016 00:38 IST

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.

कसे शिकणार विद्यार्थी : मुख्याध्यापक व आगारप्रमुखांनी फिरविली पाठ शिवशंकर बावनकुळे साकोली एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. याशिवाय अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सवलत योजनेअंतर्गत शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात किंवा बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एस.टी. बसने मोफत प्रवासाची सोय करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत संबंधित मुख्याध्यापक आणि आगारप्रमुख यांची भूमिका महत्त्वाची आहे. असे असताना त्यांच्या दुर्लक्षामुळे या कल्याणकारी योजनेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. विद्यार्थिनींना बसच्या पाससाठी दर महिन्याला पैसे मोजावे लागतात. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहिल्या होळकर मोफत प्रवास योजना लागू केली. ही योजना १९९६ पासून लागू करण्यात आली असून या योजनेत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाची सोय केली. विद्यार्थिनींना हा प्रवास एस.टी. बसने करावयाचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. त्या सर्व अटी व नियमांची पूर्तता केल्यास संबंधित विद्यार्थिनीला या योजनेचा लाभ मिळतो. यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत संबंधित विभागाकडून माहिती मागण्यात आली. त्यात वेगळेच तथ्य समोर आले. या योजनेअंतर्गत मिळणारी सवलत ही केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी आहे. ज्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय असूनही त्या गावातील विद्यार्थिनी शिक्षणासाठी दुसऱ्या गावात किंवा शहरात जात असल्यास त्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र विद्यार्थिनींचा तपशील संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाकडे पाठवायचा असतो. मुख्याध्यापक या योजनेतील अटीकडे दुर्लक्ष करतात. मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचे लक्ष केवळ शाळेतील पटसंख्या टिकवून ठेवण्यावर असते. त्यातून ग्रामीण भागातील शाळामधील मुख्याध्यापकांकडून आगारप्रमुखांना चुकीचा तपशील पाठविला जातो. या तपशिलाची शहानिशा करण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. दुसरीकडे या योजनेचा विद्यार्थिनींना लाभ न मिळता शासनाच्या शिक्षण विभागाकडून परिवहन मंडळाला निधी दिला जातो. परिणामी ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या कमी होत गेल्याने त्या शाळांमधील शिक्षण अतिरिक्त ठरायला लागले. दुसरीकडे शहरातील शाळांमधील वर्ग तुकड्यांची संख्या वाढू लागली. ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती किमान ७५ टक्के असावी तसेच प्रमाणपत्र आगार व्यवस्थापकाकडे सादर करावे लागते. ही संपूर्ण माहिती शाळेकडून प्राप्त झाल्यानंतर आगार प्रमुख संबंधित विद्यार्थिनींना प्रवासासाठी मोफत तिमाही पास उपलब्ध करून देतात. दुसरीकडे शाळेकडून शिक्षणाधिकारी कार्यालयाला देयके सादर करावी लागतात. शिक्षण विभागाच्या कोषागारास ही देयके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थिनींच्या प्रवास खर्चाच्या रकमेचा धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट परिवहन मंडळाकडे पाठविला जातो. मोफत प्रवासाची ही सोय परिवहन मंडाळकडून नव्हे तर शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिली जात असल्याचे माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे.