शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार लघु प्रकल्प तुडूंब

By admin | Updated: August 22, 2015 00:55 IST

आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये वाढ झालेली आहे.

जलसाठ्यात वाढ : ६३ प्रकल्पात ४१.१४ टक्के जलसाठा,देवानंद नंदेश्वर भंडाराआॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये वाढ झालेली आहे. या पावसामुळे चार लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत एकूण ६३ प्रकल्प आहेत. यामध्ये ४ मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. तुडूंब असलेल्या प्रकल्पांमध्ये नागठाणा, मंडनगाव, भूगाव मेंढा, वाकल या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार प्रकल्पांमध्ये १३.७५४ दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ३२.१२ एवढी आहे. यामध्ये चांदपूरमध्ये ३४़५३ टक्के, बघेडा ४४़९३ टक्के, बेटेकर बोथली १६.८८ टक्के आणि सोरणा प्रकल्पामध्ये १९ टक्के जलसाठ्याचा समावेश आहे़भंडारा जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावनवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार येथील तलावांचा समावेश आहे. या लघु प्रकल्पांमध्ये एकूण २३.९५६ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ४४.७४ एवढी आहे. ३१ लघु प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत़ २८ माजी मालगुजारी तलावात सध्यास्थितीत २५ ते ९० टक्के जलसाठा आहे.सध्यस्थितीत १४ प्रकल्पांमध्ये २५ टक्के, २२ प्रकल्पांमध्ये ५० टक्के, १३ प्रकल्पांमध्ये ७५ टक्के, १० प्रकल्पांमध्ये ९० टक्के, चार प्रकल्पांमध्ये ९९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़आॅगस्ट महिन्यापर्यत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पावसाच्या आगमनामुळे रखडलेल्या रोवणी कामाला वेग आला असून रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात ५०़१२४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील वर्षी २१ आॅगस्ट पर्यंत जिल्हयातील ६३ प्रकल्पात ७१.७४९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त जलसाठा होता़ त्याची टक्केवारी ५८.६१ एवढी होती.