शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजाराची भीती

By admin | Updated: August 6, 2014 23:41 IST

शासन नागरिकाच्या आरोग्यावर कोट्यावधीचा खर्च करीत असतो. मात्र या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे.

लाखनी : शासन नागरिकाच्या आरोग्यावर कोट्यावधीचा खर्च करीत असतो. मात्र या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतु ग्रामीण भागात जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. मात्र ग्रामपंचायतीला दुर्लक्षितपणामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे.ग्रामपंचायत ही गावाची प्रमुख संख्या म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामे केली जातात. ग्रामपंचायतीचाकारभार मुख्यत: ग्रामसेवक सांभाळत असतात. यातही ग्रामसेवकाला अनेक कामे असल्याने ग्रामसेवक सुद्धा दुर्लक्ष करतात तेव्हा पदाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असते. गावातील नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही याची खबरदारी सरपंच व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. अशुद्ध व दुषित पाण्यामुळे जलजन्य आजारात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत टाकीमध्ये येणारे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पावसाळा असून नदी नाले तलावालानी पाण्याची पातळी वाढ झाली आहे. यामुळे विहिरीतील पाणी दूषित येत असते. याचा परिणाम पिण्याकरीता या पाण्याचा वापर ज्या नागरिकांकडून केला जातो. त्याच्या आटोक्यावर निश्चितच पडत असतो. दुषित पाण्यामुळे विषाणू शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीसाठी पिण्याच्या पाण्यात ब्लीचिंग पावडर घालणे आवश्यक आहे. तेही मात्र ग्रामीण भागात कागदावरच असते. यासोबतच जलशुद्धीकरण यंत्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे लाखनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. उपाययोजना न केल्यास आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा तसेच अन्य जलजन्य आजार होत असतात. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये नियमित पाण्याचे शुद्धीकरण होत नसल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. या बाबीकडे सरपंच, सचिव व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)