शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

जलजन्य आजाराची भीती

By admin | Updated: August 6, 2014 23:41 IST

शासन नागरिकाच्या आरोग्यावर कोट्यावधीचा खर्च करीत असतो. मात्र या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे.

लाखनी : शासन नागरिकाच्या आरोग्यावर कोट्यावधीचा खर्च करीत असतो. मात्र या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतु ग्रामीण भागात जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. मात्र ग्रामपंचायतीला दुर्लक्षितपणामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे.ग्रामपंचायत ही गावाची प्रमुख संख्या म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामे केली जातात. ग्रामपंचायतीचाकारभार मुख्यत: ग्रामसेवक सांभाळत असतात. यातही ग्रामसेवकाला अनेक कामे असल्याने ग्रामसेवक सुद्धा दुर्लक्ष करतात तेव्हा पदाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असते. गावातील नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही याची खबरदारी सरपंच व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. अशुद्ध व दुषित पाण्यामुळे जलजन्य आजारात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत टाकीमध्ये येणारे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पावसाळा असून नदी नाले तलावालानी पाण्याची पातळी वाढ झाली आहे. यामुळे विहिरीतील पाणी दूषित येत असते. याचा परिणाम पिण्याकरीता या पाण्याचा वापर ज्या नागरिकांकडून केला जातो. त्याच्या आटोक्यावर निश्चितच पडत असतो. दुषित पाण्यामुळे विषाणू शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीसाठी पिण्याच्या पाण्यात ब्लीचिंग पावडर घालणे आवश्यक आहे. तेही मात्र ग्रामीण भागात कागदावरच असते. यासोबतच जलशुद्धीकरण यंत्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे लाखनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. उपाययोजना न केल्यास आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा तसेच अन्य जलजन्य आजार होत असतात. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये नियमित पाण्याचे शुद्धीकरण होत नसल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. या बाबीकडे सरपंच, सचिव व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)