शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:39 IST

भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देभूगर्भातील पाणी आटले : ५५ टक्के शेतकºयांची रोवणी थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. सध्या शेतकरी रोवणी व पीक वाचविण्यासाठी केवीलवानी धडपड करीत आहे.कर्जमाफी व अनुदानासाठी बँकेत तसेच आॅनलाईन फार्म भरण्यासाठी महा ई सेवा केंद्रात शेतकरी चकरा मारीत आहे. दिवसभर उपाशी राहून शासनाकडून काही मदत मिळेल या आशेने शेतीचे कामे सोडून शेतकरी बँकेच्या चकरा मारताना दिसून येत आहे. शासनाकडून हा होत असलेला ससेमीरा संपवून जे शेतकरी त्या योजनेत बसत असतील त्यांना कर्जमाफी किंवा सवलतीचा फायदा द्यायला पाहिजे. मात्र सध्यातरी असे होताना दिसत नाही. ज्या शेतकºयांची रोवणी आटोपली त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र पावसाने दगा दिल्याने रोवणी सुकु लागली. त्यामुळे यंदा भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे.महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प असताना शेतकºयांच्या शेतीला अपेक्षेनुसार पाणी मिळत नसेल तर येथील शेतकºयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. दिव्याखाली अंधार अशीच काहीही परिस्थिती पवनी तालुक्यातील शेतकºयांची झाली आहे. त्याचप्रमाणे धरणामुळे भूगर्भात झिरपणारे पाणी पूर्णत: बंद झाल्याने सिंचनाच्या शेतीतील विहिरीतील पाणी आटले असून चौरास भाग वाळवंट होत आहे. धरणाच्या खालील नदीपात्रातील रेतीघाटांवर निर्बंध लावणे अत्यावश्यक आहे. नाहीतर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा भीषण संकट जनतेसमोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. जल हे जीवन असताना याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जनता हैराण झाली आहे. शासनाने जनतेच्या व शेतकºयांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढून शेतकरी वाचला पाहिजे असे धोरण तयार करावे.शेतकºयांच्या मनात यंदा दुष्काळाची प्रचिती होत असून मुख्य डावा कालवा असूनही रेंगाळत चालल्याने शेतीला पाणी देता येत नाही. मिळेल त्या पद्धतीने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे. काही शेतकºयांनी रक्ताच्या कडेचे जेसीबी मशीनद्वारे तयार करून इंजीनच्या माध्यमातून पाणी देण्याचे खर्चिक कार्य सुरु केलेले आहे. रस्त्याच्या कडेच्या नाल्याच गायब झाल्याने पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासना गंभीर दिसून येत नाही.शेतकरी दरवर्षी पिकविमा काढतो. मात्र काही बोटावर मोजण्याऐवढ्या लोकांनाच त्याचा लाभ मिळतो. विम्याबाबत शासनाने लावून दिलेले नियम चुकीचे असल्याची म्हणणे शेतकºयांचे आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात असलेली त्रिस्तरीय समिती कागदावरच कार्य करते की काय अशी भावना शेतकºयांमध्ये उमटत आहे. सध्या शेतकरी नैराश्येच्या गर्तेत असून इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती उद्भवली आहे.