शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:39 IST

भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देभूगर्भातील पाणी आटले : ५५ टक्के शेतकºयांची रोवणी थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. सध्या शेतकरी रोवणी व पीक वाचविण्यासाठी केवीलवानी धडपड करीत आहे.कर्जमाफी व अनुदानासाठी बँकेत तसेच आॅनलाईन फार्म भरण्यासाठी महा ई सेवा केंद्रात शेतकरी चकरा मारीत आहे. दिवसभर उपाशी राहून शासनाकडून काही मदत मिळेल या आशेने शेतीचे कामे सोडून शेतकरी बँकेच्या चकरा मारताना दिसून येत आहे. शासनाकडून हा होत असलेला ससेमीरा संपवून जे शेतकरी त्या योजनेत बसत असतील त्यांना कर्जमाफी किंवा सवलतीचा फायदा द्यायला पाहिजे. मात्र सध्यातरी असे होताना दिसत नाही. ज्या शेतकºयांची रोवणी आटोपली त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र पावसाने दगा दिल्याने रोवणी सुकु लागली. त्यामुळे यंदा भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे.महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प असताना शेतकºयांच्या शेतीला अपेक्षेनुसार पाणी मिळत नसेल तर येथील शेतकºयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. दिव्याखाली अंधार अशीच काहीही परिस्थिती पवनी तालुक्यातील शेतकºयांची झाली आहे. त्याचप्रमाणे धरणामुळे भूगर्भात झिरपणारे पाणी पूर्णत: बंद झाल्याने सिंचनाच्या शेतीतील विहिरीतील पाणी आटले असून चौरास भाग वाळवंट होत आहे. धरणाच्या खालील नदीपात्रातील रेतीघाटांवर निर्बंध लावणे अत्यावश्यक आहे. नाहीतर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा भीषण संकट जनतेसमोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. जल हे जीवन असताना याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जनता हैराण झाली आहे. शासनाने जनतेच्या व शेतकºयांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढून शेतकरी वाचला पाहिजे असे धोरण तयार करावे.शेतकºयांच्या मनात यंदा दुष्काळाची प्रचिती होत असून मुख्य डावा कालवा असूनही रेंगाळत चालल्याने शेतीला पाणी देता येत नाही. मिळेल त्या पद्धतीने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे. काही शेतकºयांनी रक्ताच्या कडेचे जेसीबी मशीनद्वारे तयार करून इंजीनच्या माध्यमातून पाणी देण्याचे खर्चिक कार्य सुरु केलेले आहे. रस्त्याच्या कडेच्या नाल्याच गायब झाल्याने पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासना गंभीर दिसून येत नाही.शेतकरी दरवर्षी पिकविमा काढतो. मात्र काही बोटावर मोजण्याऐवढ्या लोकांनाच त्याचा लाभ मिळतो. विम्याबाबत शासनाने लावून दिलेले नियम चुकीचे असल्याची म्हणणे शेतकºयांचे आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात असलेली त्रिस्तरीय समिती कागदावरच कार्य करते की काय अशी भावना शेतकºयांमध्ये उमटत आहे. सध्या शेतकरी नैराश्येच्या गर्तेत असून इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती उद्भवली आहे.