शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 8, 2014 23:19 IST

यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली

साकोली : यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली तर कृषी उत्पन्न घटन्यासोबतच पाणी आणि जनावरांचा चारा या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सोकली तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या व रोवण्या रखडल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार साकोली उपविभागातील साकोली, लाखनी व लाखांदूर या तिनही तालुक्यात पावसाअभावी शेतीची कामे रखडली असून आतापर्यंत फक्त पेरणीची कामे उरकली असून तिन्ही तालुक्यात ९० टक्के एवढे पेरण्या झाल्या असून ज्या शेतकऱ्याजवळ पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. हे प्रमाण अत्यल्प आहे. यात साकोली तालुका ९ हेक्टर, लाखनी तालुका १८ हेक्टर तर लाखांदूर तालुका ५ हेक्टर असा आहे. मागील वर्षीच्या मानाने यावर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण नाहीच्या बरोबर आहे व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला पाणी नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक गणितच बिघडली. पेरणी झाल्यानंतर साधारणत: पंधरा ते वीस दिवसानंतर रोवणीची वेळ असते. रोवणी झाल्यानंतर धानाची जात पाहून त्याचे ठराविक दिवस असतात. हलका धान ११० ते १२० दिवस, मध्यम प्रतीची १३५ ते १४० दिवस, भारी प्रतीचा धान १४५ ते १५० दिवस असे असून पिक उत्पादनासाठी जून ते आॅक्टोबर हा कालावधी १५० दिवस भात शेतीसाठी अनुकुल असा समजला जातो. मात्र यावर्षी पावसाच्या प्रतिक्षेत एक महािं असाच उलटल्याने यावर्षी उशिरा पाऊस आला तरी भातपिकाच्या उत्पन्नावर नक्कीच फरक पडणार आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली तर उत्पादनाबरोबर पाणी व गुरांच्या चाऱ्याचीही कमतरता भासेल. यात शंका नाही. तर यावर्षी शासनाने शेतकऱ्यांना महाबिज या बियाण्यावर मिळणारी सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यावर हाही एक ओझाच चढला आहे. यावर्षी साकोली तालुक्यासाठी कृषी केंद्रात ८ हजार ६५३ क्विंटल बियाणे आले असून पैकी ४ हजार ६९९ क्विंटल विक्री झाले तर खत ५ हजार १८२ मॅट्रीक टन पुरवठा झाला. पैकी ५४९ मॅट्रीक टन विक्री झाले व उर्वरीत ४ हजार ६३३ मॅट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे. पंचायत समितीचे कृषी विभाग व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सज्ज असून शेतकऱ्याप्रमाणेच या विभागांनही पावसाची प्रतिक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)