शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 8, 2014 23:19 IST

यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली

साकोली : यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली तर कृषी उत्पन्न घटन्यासोबतच पाणी आणि जनावरांचा चारा या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सोकली तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या व रोवण्या रखडल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार साकोली उपविभागातील साकोली, लाखनी व लाखांदूर या तिनही तालुक्यात पावसाअभावी शेतीची कामे रखडली असून आतापर्यंत फक्त पेरणीची कामे उरकली असून तिन्ही तालुक्यात ९० टक्के एवढे पेरण्या झाल्या असून ज्या शेतकऱ्याजवळ पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. हे प्रमाण अत्यल्प आहे. यात साकोली तालुका ९ हेक्टर, लाखनी तालुका १८ हेक्टर तर लाखांदूर तालुका ५ हेक्टर असा आहे. मागील वर्षीच्या मानाने यावर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण नाहीच्या बरोबर आहे व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला पाणी नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक गणितच बिघडली. पेरणी झाल्यानंतर साधारणत: पंधरा ते वीस दिवसानंतर रोवणीची वेळ असते. रोवणी झाल्यानंतर धानाची जात पाहून त्याचे ठराविक दिवस असतात. हलका धान ११० ते १२० दिवस, मध्यम प्रतीची १३५ ते १४० दिवस, भारी प्रतीचा धान १४५ ते १५० दिवस असे असून पिक उत्पादनासाठी जून ते आॅक्टोबर हा कालावधी १५० दिवस भात शेतीसाठी अनुकुल असा समजला जातो. मात्र यावर्षी पावसाच्या प्रतिक्षेत एक महािं असाच उलटल्याने यावर्षी उशिरा पाऊस आला तरी भातपिकाच्या उत्पन्नावर नक्कीच फरक पडणार आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली तर उत्पादनाबरोबर पाणी व गुरांच्या चाऱ्याचीही कमतरता भासेल. यात शंका नाही. तर यावर्षी शासनाने शेतकऱ्यांना महाबिज या बियाण्यावर मिळणारी सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यावर हाही एक ओझाच चढला आहे. यावर्षी साकोली तालुक्यासाठी कृषी केंद्रात ८ हजार ६५३ क्विंटल बियाणे आले असून पैकी ४ हजार ६९९ क्विंटल विक्री झाले तर खत ५ हजार १८२ मॅट्रीक टन पुरवठा झाला. पैकी ५४९ मॅट्रीक टन विक्री झाले व उर्वरीत ४ हजार ६३३ मॅट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे. पंचायत समितीचे कृषी विभाग व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सज्ज असून शेतकऱ्याप्रमाणेच या विभागांनही पावसाची प्रतिक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)