शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत २० फुटांची घट

By admin | Updated: March 11, 2017 00:26 IST

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी १५ ते २० फूटाने घटली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे.

विहिरी, तलाव कोरडे : उपाय योजना व बोअरवेलवर बंदीची गरजकरडी (पालोरा) : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी १५ ते २० फूटाने घटली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यावर उपाययोजना न झाल्यास, जलसंसाधनाची कामे न झाल्यास परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. ४०० फुटांपर्यंत खोल खोदल्या जाणाऱ्या बोअरवेलवरही प्रतिबंध लावण्यासाठी विचार करावा लागणार आहे. मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. या परिसरात सुमारे ३२ हजार हेक्टर आर शेती विविध पिकांखाली आहे. खरीपातील भाताचे पीक घेतल्यानंतर जमीन पडीत राहते. वैनगंगा नदीच्या पूर्वेला जवळपास १ ते ७ किमीच्या क्षेत्रात परिसराचा विस्तार आहे. सुमारे २५ गावांतील ४५ हजार लोकसंख्या या भागात असून शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या भागावर निसर्गाने अन्याय केला आहे. वैनगंगा नदी व विस्तीर्ण जंगलाच्या मध्यभागी परिसर असताना भुगर्भात पाण्याचा साठा अत्यल्प आहे. लहान मोठ्या तलाव व बोड्यांची संख्या अधिक असताना गजबजलेल्या आहेत. अतिक्रमणामुळे तलावातील पाण्याची साठवण क्षमता बेताची आहे. वन्यजीव अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीची भिषण समस्या उभी ठाकली आहे. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नसल्याने दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.यावर्षी खरिपात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली. पुरेसा पाऊस पडला, त्यावेळी धान रोपांचा कालावधी दीड ते दोन महिन्यांनी वाढला. पाऊसाच्या खोळंब्यामुळे परिसरातील शेती रोवणी अभावी पडीत राहिली. मध्यंतरी पडलेला पाऊस शेवटी बेपत्ता झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. कर्जाच्या रक्कमेतून मात्र, सक्तीने पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आली. मागील वर्षी सुध्दा शेतीला दुष्काळाचा फटका बसला. यावर्षी कमी पडलेल्या पावसाचा परिणाम आता सर्वांना सहन करावा लागत आहे. तलाव, बोळ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडल्या. शेतातील विहिरी बरोबर गावातील विहिरी आटल्या. गावासभोवती २५० ते ३०० फुटापर्यंत खोदल्या गेलेल्या तसेच अनिर्बंध पाण्याच्या उपस्यामुळे तर परिस्थिती भिषण झाली आहे. महिलांना ३ ते ४ किंमीवरुन पाणी घरी आणावे लागत आहे. (वार्ताहर)एकात्मिक पाणलोट कार्यक्रम थंडबसत्यातदोन वर्षाअगोदर परिसराला एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले. जलसंसाधनाची कामे करण्याची ग्वाही देण्यात आली. परंतू डीपीआर मंजुरीअभावी कामे रखडली आहेत. वर्षभरातून डिपीआर मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते. मोठा गाजावाजा करीत पाणलोट सचिवांच्या निवडीसाठी गावागावात ग्रामसभा गाजल्या. वादविवाद झाले. पंरतू कामाना उशिर का होत आहे, याचा जाब शासन प्रशासनाला विचारण्याची व त्यासाठी कठोर भुमिका घेण्याची काळजी घेण्यात आली नाही. परिणाम कामे थंडबस्त्यात पडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेकडून मोठी अपेक्षाशासनाचा जलसंसाधनाचा साठी तयारी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जाते. कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी यावर्षी शासनाचे वतीने परिसरातील गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेसाठी करण्यात आला. जलयुक्त शिवारातून पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय कृत्रीम तलाव निर्मितीलाही संधी आहे. आवश्यकता आहे ती नागरिकांच्या सुक्ष्म नियोजनाची व आवश्यक गरजांना प्राधान्य देण्याची. त्या दिशेने गावांनी पावले उचलल्यास जलसंसाधनाची मोठी कामे गावात होवून काही प्रमाणात का होईना पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.