शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

पीकविमा कंपन्या मालामाल; भरले ३१ कोटी, आले ४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार १९० शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरला. ३१ कोटी ९३ लाख ५ हजार ५८ रुपये यासाठी ...

जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार १९० शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरला. ३१ कोटी ९३ लाख ५ हजार ५८ रुपये यासाठी विमा कंपनीकडे शेतकरी, राज्य शासन केंद्र सरकार यांनी ही रक्कम पीक संरक्षणासाठी कंपन्यांना दिली. त्या बदल्यात कंपन्यांनी ३९ हजार शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी ८ लाख रुपये परत केले आहेत. २८ कोटी रुपये विमा कंपनीला यामध्ये फायदाच झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रत्येक पीकच गतवर्षीच्या खरीप हंगामात हातामधून गेले. धान सोयाबीन, तूर, मूग, उडीद या सर्व पिकांना नुकसानीचा फटका बसला. केलेला खर्चही शेतकऱ्यांना काढता आला नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये हजार शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नाही. असे दुर्दैवी चित्र आहे. नुकसानीच्या या महाप्रकोपात शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच मदत झाल्याने शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे.

बॉक्स

दीड लाख शेतकरी बाद

जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना विमा मिळालाच नाही. कंपनीच्या यादीतून एक लाख ४४ हजार ८३३ शेतकरी बाद झाले आहेत. नैसर्गिक संकटात मदत पुरविण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले होते. याच ठोस आश्वासनावर शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. प्रत्यक्षात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक लाख ४४ हजार शेतकरी बाद झाले आहेत. यामुळे दुहेरी फटका बसला आहे.

विमा न मिळाल्याने संताप

जिल्ह्यातील एक लाख १० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यामधील एक लाख ८४ हजार ०२५ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी विम्याचे कवच निर्माण केले होते. विमा भरूनही मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी संकटाच्या खाईत कोसळले आहे. विम्याची रक्कम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.

विमा भरूनही भरपाई नाही

कोट

संपूर्ण वर्षभर निसर्ग प्रकोपाने शेतकरी गारद झाला आहे. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले होते. यातून शेतकरी बिनधास्त होते. प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही केवळ मोजकेच शेतकरी मदतीला पात्र ठरतात, ही फार मोठी शोकांतिका आहे. यामध्ये कंपन्यांचेच भले झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.

- उमराव मस्के, शेतकरी

यावर्षी धानाचा दाणाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झाले. या परिस्थितीत एक लाख ८४ हजार १०९ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामधील ३९ हजार ३५७ शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. त्यातही कुठल्या सर्कलला किती मदत मिळाली, याची माहिती नाही. विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ दोन टक्के शेतकऱ्यांना ही मदत मिळत आहे.

- बाबुराव भुते, शेतकरी

दरवर्षी शेतकरी मोठ्या आशेने विम्याची रक्कम भरतात. आपले पीक संरक्षित करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड असते. यावर्षी संपूर्ण पीक नष्ट झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती छदामही लागला नाही. हे मोठे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी आणि त्यांची आंदोलने पोकळ होती, नुकसानीनंतरही कंपन्यांचेच भले झाल्याचे पहायला मिळत आहे.

- नरेश भुते

खरीप हंगाम

२०२०-२१ पीकविमा लागवड क्षेत्र ८४०२५

एकूण जमा रक्कम ४०८०००००