शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपन्या मालामाल; भरले ३१ कोटी, आले ४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार १९० शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरला. ३१ कोटी ९३ लाख ५ हजार ५८ रुपये यासाठी ...

जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार १९० शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरला. ३१ कोटी ९३ लाख ५ हजार ५८ रुपये यासाठी विमा कंपनीकडे शेतकरी, राज्य शासन केंद्र सरकार यांनी ही रक्कम पीक संरक्षणासाठी कंपन्यांना दिली. त्या बदल्यात कंपन्यांनी ३९ हजार शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी ८ लाख रुपये परत केले आहेत. २८ कोटी रुपये विमा कंपनीला यामध्ये फायदाच झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रत्येक पीकच गतवर्षीच्या खरीप हंगामात हातामधून गेले. धान सोयाबीन, तूर, मूग, उडीद या सर्व पिकांना नुकसानीचा फटका बसला. केलेला खर्चही शेतकऱ्यांना काढता आला नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये हजार शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नाही. असे दुर्दैवी चित्र आहे. नुकसानीच्या या महाप्रकोपात शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच मदत झाल्याने शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे.

बॉक्स

दीड लाख शेतकरी बाद

जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना विमा मिळालाच नाही. कंपनीच्या यादीतून एक लाख ४४ हजार ८३३ शेतकरी बाद झाले आहेत. नैसर्गिक संकटात मदत पुरविण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले होते. याच ठोस आश्वासनावर शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. प्रत्यक्षात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक लाख ४४ हजार शेतकरी बाद झाले आहेत. यामुळे दुहेरी फटका बसला आहे.

विमा न मिळाल्याने संताप

जिल्ह्यातील एक लाख १० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यामधील एक लाख ८४ हजार ०२५ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी विम्याचे कवच निर्माण केले होते. विमा भरूनही मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी संकटाच्या खाईत कोसळले आहे. विम्याची रक्कम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.

विमा भरूनही भरपाई नाही

कोट

संपूर्ण वर्षभर निसर्ग प्रकोपाने शेतकरी गारद झाला आहे. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले होते. यातून शेतकरी बिनधास्त होते. प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही केवळ मोजकेच शेतकरी मदतीला पात्र ठरतात, ही फार मोठी शोकांतिका आहे. यामध्ये कंपन्यांचेच भले झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.

- उमराव मस्के, शेतकरी

यावर्षी धानाचा दाणाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झाले. या परिस्थितीत एक लाख ८४ हजार १०९ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामधील ३९ हजार ३५७ शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. त्यातही कुठल्या सर्कलला किती मदत मिळाली, याची माहिती नाही. विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ दोन टक्के शेतकऱ्यांना ही मदत मिळत आहे.

- बाबुराव भुते, शेतकरी

दरवर्षी शेतकरी मोठ्या आशेने विम्याची रक्कम भरतात. आपले पीक संरक्षित करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड असते. यावर्षी संपूर्ण पीक नष्ट झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती छदामही लागला नाही. हे मोठे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी आणि त्यांची आंदोलने पोकळ होती, नुकसानीनंतरही कंपन्यांचेच भले झाल्याचे पहायला मिळत आहे.

- नरेश भुते

खरीप हंगाम

२०२०-२१ पीकविमा लागवड क्षेत्र ८४०२५

एकूण जमा रक्कम ४०८०००००