शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

दूषित पाणीमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: May 11, 2014 00:04 IST

वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडारा तालुक्यातील साहुली येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा करणारी विहिर गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहे़

भंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडारा तालुक्यातील साहुली येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा करणारी विहिर गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहे़ येथे नव्याने पाणीपुरवठा करणे गरजेचे असतानाही गोसेखुर्द विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही़ परिणामी साहुलीवासियांना दुर्गधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे़ शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. साहुली येथे सन १९९८-९९ मध्ये पाणीपुरवठा योेजना सुरु करण्यात आली़ परंतु जिल्हाधिकार्‍यांनी दि़ ८ आॅगस्ट २००७ रोजी पत्र पाठवून सदर योजना ही गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असल्याचे ग्रामपंचायतीला कळविले़ त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी त्या बुडीत क्षेत्राची पाहणी केली़ दोन माहिने लोटून गेले़ मात्र गोसेखुर्द विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही़ जिल्हा परीषदने गावात विहीर, जलकुंभ व जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा तयार करून मंजुरीसाठी गोसेखुर्द विभागाकडे पाठविला आहे़ मात्र याकडेही त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे़ त्यामुळे शासन प्रशासन साहुलीवासीयांच्या जीवनाशी खेळ खेळत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी केला आहे़ भंडारा जिल्ह्यातील पवनी ताालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे़ त्यामध्ये पाणी साठवणे सुरू झाले आहे़ नागपुरातून वाहत येणार्‍या नाग व कन्हान नदीचे घाण पाणी साहुली येथील विहिरीत मिसळते़ या ठिकाणी दोन्ही नद्याचा संगम होतो़ गोसे धरणातील जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी काठावरील गावाचे गुरेढोरे नदीतीलच पाणी पितात. दूषित पाण्यामुळे शेतकर्‍यांचे जनावरांना रोगराई होण्याची संभावना निर्माण झाली आहे. साहुली परिसरात कावीळ आजाराचा प्रादुर्भाव दिसत आहे. या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देऊन साहुली येथे नव्याने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. (नगर प्रतिनिधी)