शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

नदी तीरावरील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : वैनगंगा नदी तिरावरील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. लालसर व ...

चुल्हाड ( सिहोरा ) : वैनगंगा नदी तिरावरील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. लालसर व गढूळ पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिक हातपंपाच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. धरणात अडविलेल्या पाण्याला जलशुद्धिकरणाची सोय नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक आजार बळावत आहेत.

ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत नळ योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेला जलशुद्धिकरण केंद्राची सोय नसल्याने नदी पात्रातून थेट उपसा करण्यात येतो. पाणी लालसर आणि गढूळ असल्याने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करीत नाहीत. या पाण्याचा वापर आंघोळीसाठी करण्यात येत आहे. वैनगंगा नदीवर कवलेवाडा शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आल्याने गढूळ व दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या धरणात पाणी अडविण्यात आले आहे. दरम्यान नळ योजनांना जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात आले नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट या गावात निर्माण होत आहे. चुल्हाड, सुकळी नकुल, देवरी देव, गोंडीटोला, बपेरा गावात ही समस्या वाढत आहे. या गावात गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक आजाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. परंतु कधी या पाण्याची चौकशी करण्यात येत नाही.

बपेरा गावांचे हद्दीत सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. अडीच लाख लिटर पाणी क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु ही महत्वाकांक्षी योजना भंगारात निघाली आहे. या योजनेचे संचालन योग्य रीतीने करण्यात आले नाही. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करतांना यंत्रणा गंभीर झाली नाही.

कावीळच्या रुग्णांची आयुर्वेदिक उपचाराकडे धाव

गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने कावीळच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. या आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत. गावात प्राप्त होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारासाठी धाव घेत आहेत. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना या आजाराचा गावात प्रसार झाला असल्याची पुसटही कल्पना येत नाही. आयुर्वेदिक औषध उपचाराने कावीळ आजार बरा होतो असा विश्वास नागरिकांत आहे. यामुळे शासन स्तरावर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

गोंडीटोला गावात नळ योजनेने नागरिकांना पाणी पुरवठा होत असला तरी वॉर्ड क्रमांक २ आणि ३ मध्ये योजनेचे पाणी पोहचत नाही. जिल्हा परिषद अंतर्गत सौर ऊर्जेवरील नळ योजना मंजूर करण्याची गरज असून नद्यांचे काठावरील गावांत मिनी जलशुद्धिकरण केंद्राची आवश्यकता आहे.

शीतल चिंचखेडे, वैशाली पटले

सदस्या ग्रामपंचायत गोंडीटोला