शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मोहाडीत दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: August 7, 2014 23:46 IST

मोहाडीत सध्या नळाद्वारे चिखल मिश्रीत गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे आजार, गॅस्ट्रो, काविळ, ताप यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले

मोहाडी : मोहाडीत सध्या नळाद्वारे चिखल मिश्रीत गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे आजार, गॅस्ट्रो, काविळ, ताप यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले असून डॉक्टरांकडे रांगाच रांगा पहायला मिळत आहेत.मोहाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मोहगाव व खोडगाव येथील सूर नदी वरुन होतो. पावसाळ्यात नदीला पूर येताच नेहमी मोहाडीला गढूळ पााण्याचा पुरवठा होतो. तसेच गावात मुबलक पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून येथील नागरिकांना चार ते पाच फुट पर्यंतचे खड्डे खोदून नळाचे पाणी घेत आहेत. पावसाळ्यात या खड्यात पावसाचे पाणी साचते व तेच गढूळ पाणी जलवाहिनीमध्ये जाते. त्यामुळे सुद्धा नळांना गढूळ पाणी येते. गढूळ पाण्यात अनेक प्रकारचे विषाणू व जंतू असतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हेच विषाक्त पाणी प्याल्याने नागरिक आजारी पडत आहेत.सर्व मोठ्या गावात जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. मात्र मोहाडीत अजूनपर्यंत जलशुद्धीकरण केंद्र बनविण्यात आले नाही. सात आठ वर्षापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. जलशुद्धीकरण केंद्रसाठी जलवाहिनी टाकण्यात आली होती. मात्र कुठेतरीमाशी शिंकली आणि पुढील बांधकाम बंद करण्यात आले. ते अजूनपर्यंत सुरु करण्यात आले नाही. त्यावेळी खर्च करण्यात आलेला अंदाजे ५ ते १० लष रुपयांचा खर्च पाण्यात गेला. त्यानंतर हे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी किंवा ग्रामपंचायतीने प्रयत्न केले नाही. प्रशासनही येथील हजारो जनतेच्या आरोग्याशी खेळत असून येथे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे पावले उचलताना दिसत नाही. येथील नागरिक पिण्याच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करतात. पाण्यात तुरटी फिरविल्यानंतर काही वेळाने ड्रम अथवा गुंडाच्या बुडाशी गाळाचा थर बसलेला दिसतो व पाणी स्वच्छ दिसते. मात्र याने विषाणू मरत नाही. यासाठी पाणी उकळून पिणेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. परंतु संबंधित विभाग जाणीवपूर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. (शहर प्रतिनिधी)